शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

भारत-चीन सीमावाद : ट्रम्प यांनी लक्ष घालताच चीनचा सूर बदलला, सुरू झाली 'हिंदी-चिनी भाई-भाई'ची भाषा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 12:15 IST

ट्रम्प यांनी एका ट्विटमध्ये म्हटले होते, की आम्ही भारत आणि चीन या दोघांनाही सूचित केले आहे, की अमेरिका सीमा वादात मध्यस्थीसाठी तयार, इच्छुक आणि सक्षम आहे.

ठळक मुद्देसध्याचा वाद भारत आणि चीन द्विपक्षीय चर्चेतून सोडवण्यास सक्षम आहेत, असे चीनने म्हटले आहे.भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे, भारत वास्तविक सीमा रेषेवर शांतता कायम ठेवण्यासाठी वचनबद्ध आहे. भारत आणि चीनला एकमेकांना धोका नसल्याचे भारताचे चिनी राजदूत सुन विडोंग यांनी म्हटले आहे.

पेइचिंग : भारत-चीनसीमा वादात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सक्रियता दाखवताच चीन नरमल्याचे दिसते एकीकडे चीनचे भारतातील राजदूत सुन विडोंग यांनी म्हटले आहे, की दोन्ही देशांना एकमेकांचा धोका नाही. तर चीन सरकारच्या प्रॉपगॅन्डा मॅगझीन ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे, की चीन आणि भारताला सध्या सीमेवर सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी अमेरिकेच्या मदतीची आवश्यकता नाही.

काय म्हणाले होते ट्रम्प -ट्रम्प यांनी एका ट्विटमध्ये म्हटले होते, की आम्ही भारत आणि चीन या दोघांनाही सूचित केले आहे, की अमेरिका सीमा वादात मध्यस्थीसाठी तयार, इच्छुक आणि सक्षम आहे. चीनीच्या परराष्ट्र मत्रालयाकडून ट्रम्प यांच्या ट्विटसंदर्भात कसल्याही प्रकारची आधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये छापून आलेल्या एका लेखात म्हणण्यात आले आहे, की दोन्ही देशांना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या, मदतीची आवश्यकता नाही.

केवळ सीमाच नव्हे, 'ही'देखील आहेत भारत-चीन वादाची 8 मुख्य कारणं

भारत-चीन द्विपक्षीय चर्चेतून वाद सोडवण्यास सक्षम -या लेखात म्हणण्यात आले आहे, की सध्याचा वाद भारत आणि चीन द्विपक्षीय चर्चेतून सोडवण्यास सक्षम आहेत. या भागातील शांतता आणि सद्भावना नष्ट करण्याची नेहमीच संधी शोधणाऱ्या अमेरिकेपासून दोन्ही देशांनी सावध रहायला हवे. 

चीनसोबत चर्चा सुरू -परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव म्हणाले, भारत वास्तविक सीमा रेषेवर शांतता आणि स्थैर्य कायम ठेवण्यासाठी वचनबद्ध आहे. तसेच भारतीय सैनिक सीमेवरील व्यवस्थापनासंदर्भात अत्यंत जबाबदारीने कार्य करत आहेत. तसेच सीमावर्ती भागात निर्माण होऊ शकणाऱ्या परिस्थितीवर चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्यासाठी दोघांनीही सैन्य आणि राजकीय स्थरावर एक सिस्टिम तयार केले आहे. या माध्यमाने चर्चा सुरू असते.

कोरोनाने अमेरिकेत घेतले 1 लाखहून अधिक बळी, नेमकी कुठे झाली 'सुपरपावर'ची चूक

भारत आणि चीनला एकमेकांना धोका नाही -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनसंदर्भात कठोर भूमिका घेतल्यानंतर जिनपिंगही काही प्रमाणात नरमल्याचं पाहायला मिळतं आहे. लडाखमधील चीनच्या या हालचाली रोखण्यासाठी मोदींची भूमिका निर्णायक ठरत असल्याची आता चर्चा आहे. भारताकडून कडक संदेश मिळाल्यानंतर आता चीननंही भूमिका बदलली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) तणाव आणि चिनी माध्यमांमधील आक्रमक वक्तृत्वानंतर चीनने आता सौम्य भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे. भारत आणि चीनला एकमेकांना धोका नसल्याचे भारताचे चिनी राजदूत सुन विडोंग यांनी म्हटले आहे. द्विपक्षीय सहकार्याने दोन्ही देशांमधील मतभेद दूर होतील, अशीही त्यांनी आशा व्यक्त केली आहे.

POK : पाकिस्तानने चीनच्या सोबतीने उचलले मोठे पाऊल; भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

टॅग्स :border disputeसीमा वादchinaचीनIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकारAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प