शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

पाकिस्तानचे 'मिशन काश्मीर'; धुमसता प्रश्न सोडवण्यासाठी चक्क इम्रान खान सरकारचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 13:14 IST

काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी प्रस्ताव तयार केला जात असल्याची पाकिस्तानच्या मंत्र्यांची माहिती

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान होताच इम्रान खान यांनी काश्मीर प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी प्रस्ताव तयार केला जात असल्याची माहिती इम्रान खान सरकारमधील मंत्री शिरीन मजारी यांनी दिली आहे. हा प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू असून तो लवकरच कॅबिनेटमध्ये मांडला जाईल, असंही मजारी यांनी सांगितलं. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाला काश्मीर प्रश्न सोडवायचा आहे. काश्मीरचा तिढा सुटावा, ही पक्षाची इच्छा असल्याचं मानवाधिकार मंत्री शिरीन मजारी यांनी पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. यासाठी प्रस्ताव तयार केला जात असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. 'हा प्रस्ताव जवळपास तयार झाला असून आणखी आठवड्याभरात त्याचं काम पूर्ण होईल. यानंतर हा प्रस्ताव कॅबिनेटसमोर ठेवण्यात येईल. मात्र या प्रस्तावात नेमकं काय आहे, याची माहिती माझ्याकडे नाही,' असं मजारी म्हणाल्या. इम्रान खान यांनी निवडणुकीआधी आणि निवडणुकीनंतर भारतासोबत चांगले संबंध राखण्याची भाषा केली आहे. मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांनी याबद्दल कोणतेही स्पष्ट संकेत दिले नव्हते. सीमारेषेवर शांतता राखण्याची भाषा करणाऱ्या इम्रान यांनी दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी कोणतंही पाऊल उचललेलं नाही. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनी इम्रान खान यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांना दूरध्वनी केला होता. यावेळी त्यांनी दहशतवादी संघटनांना आळा घालण्याचा मुद्दा उपस्थित केला. याबद्दल इम्रान खान यांनी नाराजीदेखील व्यक्त केली होती. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानIndiaभारतTerrorismदहशतवाद