शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

ही वेळ योग्य नाही! पाकिस्तानच्या विजयानं इम्रान खान भलतेच खूश; भारताबद्दल बोलताना बदलला सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 07:56 IST

पाकिस्तानच्या विजयानं इम्रान खान यांना अत्यानंद; भारताला डिवचलं

इस्लामाबाद: विश्वचषक स्पर्धेत प्रथमच भारतावर मात केल्यानं पाकिस्तानमध्ये आनंदाचं वातावरण आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताननं १० गडी राखून भारतावर मोठा विजय मिळवला. यानंतर लोकांनी गोळीबार करत विजय साजरा केला. त्यात १२ जण जखमी झाले. यानंतर आता पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी संघाच्या विजयावर भाष्य केलं आहे.

भारतासोबतचे संबंध सुधारण्याची आवश्यकता असल्याचं मत इम्रान खान यांनी सौदी अरेबियात व्यक्त केलं. सध्याची वेळ संवाद साधण्यासाठी योग्य नाही. यामागे रविवारी झालेला भारत-पाकिस्तान सामना कारण असल्याचं खान म्हणाले. टी-२० विश्वचषक स्पर्धेत शेजारी देशाचा पराभव झाला आहे. त्यांच्याशी संबंध सुधारावेत म्हणून संवाद साधायला हवा. पण त्यासाठी ही वेळ योग्य नाही. कारण नुकताच त्यांचा पराभव झाला आहे. भारतासोबत संबंध सुधारल्यास ते दोन्ही देशांसाठी चांगलं असेल, असं खान यांनी म्हटलं. खान सध्या पाकिस्तान-सौदी गुंतवणूक परिषदेसाठी रियाधमध्ये आहेत.

रियाधमध्ये असलेल्या खान यांनी पुन्हा एकदा काश्मीर राग आळवला. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये केवळ एकच विषय आहे आणि तो म्हणजे काश्मीर. दोन सभ्य शेजाऱ्यांप्रमाणे हा प्रश्न सोडवावा लागेल. ७२ वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रात काश्मिरींच्या अधिकाऱ्यांबद्दल खात्री देण्यात आली होती. त्याशिवाय कोणताही मुद्दा आम्हाला महत्त्वाचा वाटत नाही, असं खान म्हणाले. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानT20 World Cupट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान