शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय उपखंड युरेशियात उच्चांकी वेगाने कसा घुसला?

By admin | Updated: May 6, 2015 00:02 IST

८० दशलक्ष वर्षांपूर्वी भारतीय प्रतल (टेक्टॉनिक प्लेट) जेव्हा युरेशियाच्या प्रतलात शिरले तेव्हा भारताने खंडीय वेगाचा उच्चांक गाठला.

हिमालय निर्मितीची चित्रकथा : संशोधनातून उकलले गुढ रहस्य; दोन प्रवाहांनी खेचले भारताला उत्तरेकडेवॉशिंग्टन : ८० दशलक्ष वर्षांपूर्वी भारतीय प्रतल (टेक्टॉनिक प्लेट) जेव्हा युरेशियाच्या प्रतलात शिरले तेव्हा भारताने खंडीय वेगाचा उच्चांक गाठला. त्यावेळी दुहेरी प्रतल घर्षणामुळे ही घटना घडली असे अमेरिकेच्या एमआयटी (मॅसच्युसेट्स इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) संस्थेत करण्यात आलेल्या नव्या संशोधनाचा निष्कर्ष आहे. खंड एकमेकाकडे सरकण्याच्या प्रक्रियेत भारताने हा गूढ उच्चांक गाठला आहे. १४० दशलक्ष वर्षांपूर्वी भारत हा सुपरखंडाचा एक भाग होता. गोंडवन या नावाने ओळखला जाणाऱ्या या प्रदेशाने संपूर्ण दक्षिण गोलार्ध व्यापला होता. १२० दशलक्ष वर्षांपूर्वी आता ज्याला आपण भारत म्हणतो तो भूभाग तुटला व उत्तरेकडे दरवर्षी ५ सें. मी. या गतीने सरकू लागला. ८० दशलक्ष वर्षांपूर्वी या सरकण्याचा वेग वाढला व दरवर्षी १५ सें.मी. गतीने हा भाग उत्तरेकडे सरकू लागला. हा वेग प्रतल सरकण्याचा अत्युच्च वेग मानला जातो. ५० दशलक्ष वर्षांपूर्वी भारत युरेशिया यांची टक्कर झाली व त्यातून हिमालयाचा जन्म झाला. भारत युरेशियाकडे जलद गतीने कसा सरकला असेल याचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न संशोधक करत होते. त्याचे उत्तर एमआयटी संस्थेतील भूगर्भतज्ज्ञांना मिळाले असून, त्यानुसार भारताला उत्तरेकडे खेचणारे दोन प्रवाह होते. पृथ्वीवरील प्रतलापैकी एक प्रतल दुसऱ्या प्रतलात घुसतो हा त्यातील एक प्रवाह आहे. एक प्रतल आकुंचित झाल्यामुळे तो आजूबाजूचे सर्व वस्तुमान ओढून घेतो. त्यामुळे दोन प्रतल असे आकुंचित झाल्यास खेचले जाण्याचा वेग वाढतो. (वृत्तसंस्था)लक्षावधी वर्षांपूर्वी घडलेल्या या नैसर्गिक उत्पाताची उकल नेपाळला बसलेल्या ७.९ तीव्रतेच्या भूकंपानंतर झाली आहे. संशोधन करणाऱ्या एमआयटीच्या पथकाला हिमालयाच्या परिसरात अवश्ोष सापडले असून, ते या प्राचीन काळातील उत्पाताचे साक्षीदार असावेत असे मानले जात आहे.नेपाळ भूकंपानंतर झाली उकलया निष्कर्षाला आल्यानंतर शास्त्रज्ञांनी प्रतल खेचण्याच्या या संकल्पनेचे एक मॉडेल बनवले. त्यातील भारताच्या प्रतलाने उच्चांकी वेग कसा गाठला असेल याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. त्यानुसार ज्यावेळी ही खेचाखेच झाली त्यावेळी भारतीय प्रतलावर दोन घटकांचा दबाव होता. आकुंचित होणाऱ्या दोन प्रतलांची रुंदी व त्यांच्यातील अंतर! हे दोन प्रतल कमी रुंद असून व एकमेकांपासून जास्त अंतरावर असतील, तर भारतीय प्रतल जास्त वेगाने खेचला गेला असावा, असे संशोधकांचे म्हणणे आहे.