शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

नेपाळच्या पंतप्रधानांनंतर परराष्ट्रमंत्री बरळले, रामाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह लावले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 8:57 AM

नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांनी भगवान श्रीराम हे भारतातील नसून नेपाळचे असल्याचे तसेच भारतातील अयोध्या ही नकली असल्याचे विधान करून वादाला तोंड फोडल्यानंतर आता नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांनी थेट रामाच्या ऐतिहासिक अस्तित्वाबाबतच प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहे.

ठळक मुद्देरामायणकालीन संस्कृतीबाबत अजूनही नेपाळ आणि भारतात अभ्यास सुरू आहेरामायणाच्या पौराणिक अस्तित्वाला दुजोरा देणारे पुरेसे पुरावे सध्यातरी आपल्याकडे नाहीत केवळ विश्वासाच्या आधारावर आपण रामासंबंधीच्या सर्व गोष्टींना मानत आलो आहोत

काठमांडू - हजारो वर्षांपासून भारताशी सांस्कृतिकदृष्ट्या जोडल्या गेलेल्या नेपाळमध्ये सध्या भारतविरोध कमालीचा तीव्र होताना दिसून येत आहेत. त्यामुळेच भारतापासून राजकीय दृष्ट्या दूर जात असतानाचा नेपाळमधील नेते भारत आणि नेपाळमध्ये असलेले समान सांस्कृतिक नातेही तोडण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. परवा नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांनी भगवान श्रीराम हे भारतातील नसून नेपाळचे असल्याचे तसेच भारतातील अयोध्या ही नकली असल्याचे विधान करून वादाला तोंड फोडल्यानंतर आता नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांनी थेट रामाच्या ऐतिहासिक अस्तित्वाबाबतच प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहे.

पंतप्रधान के. पी. ओली यांनी केलेल्या विधानाचा बचाव करताना नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ज्ञावली म्हणाले की, ‘’रामायणकालीन संस्कृतीबाबत अजूनही नेपाळ आणि भारतात अभ्यास सुरू आहे. आतापर्यंत केवळ विश्वासाच्या आधारावर आपण रामासंबंधीच्या सर्व गोष्टींना मानत आलो आहोत.’’

‘’जिथपर्यंत मला माहिती आहे त्यानुसार रामायणाच्या पौराणिक अस्तित्वाला दुजोरा देणारे पुरेसे पुरावे सध्यातरी आपल्याकडे नाहीत. आतापर्यंत केवळ पारंपरिक विश्वासाच्या आधारावर आपण सांगतो की, सीतेचा जन्म जनकपूर येथे झाला होता आणि तिचा विवाह रामासोबत अयोध्येत झाला होता.’’असे ज्ञावली यांनी सांगितले.

‘’आपल्याला हे सांगण्यात आले की, सीतेचा जन्म जनकपूर येथे झाला आणि रामाचा जन्म अयोध्येत झाला. मात्र ज्यावेळी संशोधनातून काही वेळगे पुरावे समोर येतील तेव्हा रामायणाचा इतिहासच बदलणार आहे. सध्यातरी या गोष्टी लोकांच्या भावनेशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे याबबत फार काही बोलणे योग्य ठरणार नाही,’’असेही त्यांनी सांगितले.

रामायणकाळात चर्चेत राहिलेली ठिकाणे कुठे कुठे आहेत यावर दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. त्याचा सांस्कृतिक भूगोलाला अंतिम रूप देण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे बुद्धकाळाबाबत आपल्याकडे लिखीत आणि अन्य आधारावर पुष्टी करणारे पुरावे आहेत, त्याप्रमाणे रामायणाचे पुरावे नाहीत, असा दावाही ज्ञावली यांनी केला.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान

गेल्या सहा महिन्यांत कोरोनाबाबत तज्ज्ञांना मिळाली ही महत्त्वाची माहिती, लस आणि हर्ड इम्युनिटीबाबत मिळाले असे संकेत…

'सोनेरी' हॉटेल; दारं-खिडक्याच काय, टॉयलेटसुद्धा सोन्याचं! अशा आहेत सुख-सुविधा...

टॅग्स :ramayanरामायणAyodhyaअयोध्याIndiaभारतNepalनेपाळHinduismहिंदुइझम