शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

अखेर फेसबुकचा भाजपा आमदाराला दणका; वादग्रस्त पोस्ट प्रकरणी सर्व अकाऊंटवर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 13:34 IST

वॉल स्ट्रीट जर्नलच्या बातमीत फेसबुक भाजपाच्या धोरणांचं समर्थन करत असल्याचं म्हटलं होतं. भाजपाचे नेते टी राजा सिंह यांच्या फेसबुक वॉलवर अनेक भडकाऊ विधाने हटवली जात नव्हती.

ठळक मुद्देवॉल स्ट्रीट जर्नलच्या बातमीत फेसबुक भाजपाच्या धोरणांचं समर्थन करत असल्याचं म्हटलं होतंया बातमीचा हवाला देत कॉंग्रेससह देशातील विरोधी पक्षांनी भाजपावर हल्लाबोल केला होता.फेसबुकची धोरणे भारत सरकारला पाठिंबा देतात असा आरोप केला जात होता.

नवी दिल्ली – देशात विरोधी पक्षाकडून फेसबुकवर प्रक्षोभक भाषणांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला जात होता. या दरम्यान फेसबुकनेभाजपा नेते टी राजा सिंह यांच्यावर हिंसा आणि द्वेषाला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. फेसबुकने टी राजा सिंह यांच्यावर फेसबुकच्या नियमांचे उल्लंघन केल्याने फेसबुक, इन्स्टाग्राम या अकाऊंटवर बंदी आणली आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या बातमीत फेसबुक भाजपाच्या धोरणांचं समर्थन करत असल्याचं म्हटलं होतं. भाजपाचे नेते टी राजा सिंह यांच्या फेसबुक वॉलवर अनेक भडकाऊ विधाने हटवली जात नव्हती. या बातमीचा हवाला देत कॉंग्रेससह देशातील विरोधी पक्षांनी भाजपावर हल्लाबोल केला होता. फेसबुकच्या प्रवक्त्याने ईमेल पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही आमच्या धोरणाचे उल्लंघन केल्याबद्दल राजा सिंह यांना फेसबुकवर बंदी घातली आहे. आमचे धोरण फेसबुकद्वारे आमच्या व्यासपीठावर हिंसाचार, द्वेषबुद्धीस उत्तेजन देणे किंवा द्वेष पसरवणे याला प्रतिबंधित करते. संभाव्य उल्लंघन करणार्‍यांचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया व्यापक असून या प्रक्रियेवर काम करीत असताना आम्ही राजा सिंह यांचे अकाऊंट फेसबुकवरून काढून टाकले आहे,असं निवेदनात म्हटले आहे.

महत्त्वाचे म्हणजे वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात असं म्हटलं होतं की, फेसबुकची धोरणे भारत सरकारला पाठिंबा देतात, त्यानंतर भारताच्या विरोधी पक्षांनी फेसबुक आणि सरकारचं साटेलोटे असल्याचा आरोप केला होता. भारत हा फेसबुकसाठी सर्वात मोठे बाजार आहे, त्याचे भारतात ३० कोटी युजर्स आहेत. या रिपोर्टमध्ये असा आरोप करण्यात आला होता की, फेसबुकने भाजपाचे आमदार राजा सिंह यांच्या द्वेष पसरवणाऱ्या पोस्टकडे दुर्लक्ष केले. तेव्हापासून सत्ताधारी भाजप आणि कॉंग्रेस सोशल मीडिया दिग्गज कंपनीच्या कथित पक्षपातीपणाबद्दल वक्तव्य करीत आहेत.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्ट आल्यानंतर बुधवारी संसदीय समितीने फेसबुक प्रतिनिधींना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर केल्याचा आरोप करत आपली बाजू मांडण्यास सांगितले. त्याचबरोबर मंगळवारी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांना पत्र लिहून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कर्मचार्‍यांवर निवडणुकीत लोकांना मदत केल्याचा आरोप केला आहे.

काय आहे प्रकरण?

वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकन वृत्तपत्रातील लेखामधून फेसबूक भाजपाच्या नेत्यांच्या द्वेषपूर्वक विधानांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी भारतातील फेसबुक व्हॉट्स अ‍ॅपवर भाजपाचे नियंत्रण असल्याचा आरोप केला होता. यावर आमचा मंच हा खुला, पारदर्शक आणि पक्षपात विरहित आहे, फेसबुक कुठलाही पक्ष आणि विचारसरणीचे समर्थन करत नाही. या प्लॅटफॉर्मवर लोक आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतंत्र आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये आमच्यावर आपले धोरण लागू करण्यामध्ये पक्षपात केल्याचा आरोप झाला आहे. आम्ही या आरोपाकडे गांभीर्याने पाहत आहोत, तसेच आम्ही द्वेष आणि कट्टरता यांचा निषेध करतो असं फेसबुकनं म्हटलं होतं.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

"फक्त रणबीर अन् रणवीर कशाला, आदित्य ठाकरे यांचीही ड्रग्सची टेस्ट करा"

अ‍ॅम्ब्युलन्सची वाट बघतच अनेकांनी जीव गमावला; आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा

"सरकारने मंदिरं सगळ्यात शेवट उघडून उगाच नको ते पुरोगामीत्व दाखवू नये"

हुकूमशहा किम जोंग उननं व्हाईट हाऊसच्या सेक्रेटरीला डोळा मारला, त्यावर डोनाल्ड टम्प म्हणाले...

iPhone साठी चाहत्याने २० वेळा केलं अभिनेत्याला ट्विट; सोनू सूदनंही दिला मजेशीर रिप्लाय

टॅग्स :FacebookफेसबुकBJPभाजपाcongressकाँग्रेस