शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर फेसबुकचा भाजपा आमदाराला दणका; वादग्रस्त पोस्ट प्रकरणी सर्व अकाऊंटवर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 13:34 IST

वॉल स्ट्रीट जर्नलच्या बातमीत फेसबुक भाजपाच्या धोरणांचं समर्थन करत असल्याचं म्हटलं होतं. भाजपाचे नेते टी राजा सिंह यांच्या फेसबुक वॉलवर अनेक भडकाऊ विधाने हटवली जात नव्हती.

ठळक मुद्देवॉल स्ट्रीट जर्नलच्या बातमीत फेसबुक भाजपाच्या धोरणांचं समर्थन करत असल्याचं म्हटलं होतंया बातमीचा हवाला देत कॉंग्रेससह देशातील विरोधी पक्षांनी भाजपावर हल्लाबोल केला होता.फेसबुकची धोरणे भारत सरकारला पाठिंबा देतात असा आरोप केला जात होता.

नवी दिल्ली – देशात विरोधी पक्षाकडून फेसबुकवर प्रक्षोभक भाषणांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला जात होता. या दरम्यान फेसबुकनेभाजपा नेते टी राजा सिंह यांच्यावर हिंसा आणि द्वेषाला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. फेसबुकने टी राजा सिंह यांच्यावर फेसबुकच्या नियमांचे उल्लंघन केल्याने फेसबुक, इन्स्टाग्राम या अकाऊंटवर बंदी आणली आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या बातमीत फेसबुक भाजपाच्या धोरणांचं समर्थन करत असल्याचं म्हटलं होतं. भाजपाचे नेते टी राजा सिंह यांच्या फेसबुक वॉलवर अनेक भडकाऊ विधाने हटवली जात नव्हती. या बातमीचा हवाला देत कॉंग्रेससह देशातील विरोधी पक्षांनी भाजपावर हल्लाबोल केला होता. फेसबुकच्या प्रवक्त्याने ईमेल पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही आमच्या धोरणाचे उल्लंघन केल्याबद्दल राजा सिंह यांना फेसबुकवर बंदी घातली आहे. आमचे धोरण फेसबुकद्वारे आमच्या व्यासपीठावर हिंसाचार, द्वेषबुद्धीस उत्तेजन देणे किंवा द्वेष पसरवणे याला प्रतिबंधित करते. संभाव्य उल्लंघन करणार्‍यांचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया व्यापक असून या प्रक्रियेवर काम करीत असताना आम्ही राजा सिंह यांचे अकाऊंट फेसबुकवरून काढून टाकले आहे,असं निवेदनात म्हटले आहे.

महत्त्वाचे म्हणजे वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात असं म्हटलं होतं की, फेसबुकची धोरणे भारत सरकारला पाठिंबा देतात, त्यानंतर भारताच्या विरोधी पक्षांनी फेसबुक आणि सरकारचं साटेलोटे असल्याचा आरोप केला होता. भारत हा फेसबुकसाठी सर्वात मोठे बाजार आहे, त्याचे भारतात ३० कोटी युजर्स आहेत. या रिपोर्टमध्ये असा आरोप करण्यात आला होता की, फेसबुकने भाजपाचे आमदार राजा सिंह यांच्या द्वेष पसरवणाऱ्या पोस्टकडे दुर्लक्ष केले. तेव्हापासून सत्ताधारी भाजप आणि कॉंग्रेस सोशल मीडिया दिग्गज कंपनीच्या कथित पक्षपातीपणाबद्दल वक्तव्य करीत आहेत.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्ट आल्यानंतर बुधवारी संसदीय समितीने फेसबुक प्रतिनिधींना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर केल्याचा आरोप करत आपली बाजू मांडण्यास सांगितले. त्याचबरोबर मंगळवारी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांना पत्र लिहून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कर्मचार्‍यांवर निवडणुकीत लोकांना मदत केल्याचा आरोप केला आहे.

काय आहे प्रकरण?

वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकन वृत्तपत्रातील लेखामधून फेसबूक भाजपाच्या नेत्यांच्या द्वेषपूर्वक विधानांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी भारतातील फेसबुक व्हॉट्स अ‍ॅपवर भाजपाचे नियंत्रण असल्याचा आरोप केला होता. यावर आमचा मंच हा खुला, पारदर्शक आणि पक्षपात विरहित आहे, फेसबुक कुठलाही पक्ष आणि विचारसरणीचे समर्थन करत नाही. या प्लॅटफॉर्मवर लोक आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतंत्र आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये आमच्यावर आपले धोरण लागू करण्यामध्ये पक्षपात केल्याचा आरोप झाला आहे. आम्ही या आरोपाकडे गांभीर्याने पाहत आहोत, तसेच आम्ही द्वेष आणि कट्टरता यांचा निषेध करतो असं फेसबुकनं म्हटलं होतं.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

"फक्त रणबीर अन् रणवीर कशाला, आदित्य ठाकरे यांचीही ड्रग्सची टेस्ट करा"

अ‍ॅम्ब्युलन्सची वाट बघतच अनेकांनी जीव गमावला; आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा

"सरकारने मंदिरं सगळ्यात शेवट उघडून उगाच नको ते पुरोगामीत्व दाखवू नये"

हुकूमशहा किम जोंग उननं व्हाईट हाऊसच्या सेक्रेटरीला डोळा मारला, त्यावर डोनाल्ड टम्प म्हणाले...

iPhone साठी चाहत्याने २० वेळा केलं अभिनेत्याला ट्विट; सोनू सूदनंही दिला मजेशीर रिप्लाय

टॅग्स :FacebookफेसबुकBJPभाजपाcongressकाँग्रेस