तेहरान: ऐतिहासिक दुष्काळामुळे इराणची राजधानी असलेल्या तेहरान शहरावर एक मोठे संकट उभे राहिले आहे. १ कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या या महानगराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे मुख्य स्त्रोत फक्त दोन आठवड्यांत पूर्णपणे संपुष्टात येऊ शकतात, असा इशारा तेहरान जल कंपनीचे संचालक बेहजाद पारसा यांनी दिला आहे. परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की, इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी थेट शहर रिकामे करण्याची भीती व्यक्त केली आहे.
तेहरानला पाणी पुरवठा करणाऱ्या पाच मुख्य धरणांपैकी एक असलेल्या 'अमीर कबीर धरण' मधील पाण्याची पातळी अत्यंत खालावली आहे. पारसा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या धरणात आता केवळ १४ दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे, जी धरणाच्या एकूण क्षमतेच्या ८ टक्के इतकीच आहे. मागील वर्षी याच काळात धरणात ८६ दशलक्ष घनमीटर पाणी होते. यंदा तेहरान प्रदेशात पावसाचे प्रमाण १०० टक्क्यांनी घटले आहे.
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियन यांनी "पाण्याचे संकट आज चर्चा होत असलेल्या अंदाजापेक्षाही अधिक गंभीर आहे. जर नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पुरेसा पाऊस झाला नाही, तर आम्हाला पाणी वाटून वापरावे लागेल आणि डिसेंबरपर्यंत दुष्काळ कायम राहिल्यास हे शहर रिकामे करावे लागू शकते.", असे म्हटले आहे.
शेतीसाठी उपसा
इराणमध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाणी जुन्या आणि जास्त पाणी लागणाऱ्या पीक पद्धतींमध्ये (उदा. भात आणि गहू) वापरले जाते. तेलाप्रमाणे भूजलाचे अत्यधिक उपसा आणि बेसुमार कुंपण केल्यामुळे भूजल पातळी अत्यंत खाली गेली आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार आणि पाण्याची मागणी दुप्पट होऊनही पाणी व्यवस्थापनाच्या योजना वेळेत आखल्या गेल्या नाहीत. या संकटावर मात करण्यासाठी सरकारने रात्रीच्या वेळी नळ बंद ठेवण्याची योजना सुरू केली असून, पाणी वाचवण्यासाठी शेजारील राष्ट्रांकडून पाणी मिळवण्याची चर्चा सुरू केली आहे.
Web Summary : Tehran faces a severe water crisis, with its main water sources potentially drying up within two weeks. President warns of possible city evacuation if rainfall doesn't improve by December. Over-extraction for agriculture exacerbates the problem, prompting conservation measures.
Web Summary : तेहरान में गंभीर जल संकट है, मुख्य जल स्रोत दो सप्ताह में सूख सकते हैं। राष्ट्रपति ने दिसंबर तक बारिश में सुधार न होने पर शहर खाली करने की चेतावनी दी है। कृषि के लिए अत्यधिक दोहन से समस्या बढ़ रही है, संरक्षण उपाय शुरू।