शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

२१ जून २०२० रोजी जगाचा अंत! खोट्या ठरलेल्या या भविष्यवाणीनंतर आता संशोधकांनी सांगितली नवी तारीख

By मोरेश्वर येरम | Updated: December 13, 2020 16:49 IST

२०२० हे वर्ष फक्त कोरोनामुळे नव्हे, तर खगोलीय घटनांमुळेही चर्चेचा विषय ठरलं आहे.

दोन आठवड्यांनी २०२० हे वर्ष संपेल. या वर्षाच्या सुरुवातीला नागरिकांना खूप अपेक्षा होत्या. पण या वर्षात आपल्याला जागतिक महामारीला सामोरं जावं लागेल, अशी वर्षाच्या सुरुवातीला कुणीही कल्पना केली नसेल. कोरोनावर अद्याप कोणतही कायमस्वरुपी औषध आलेलं नाही.

२०२० हे वर्ष फक्त कोरोनामुळे नव्हे, तर खगोलीय घटनांमुळेही चर्चेचा विषय ठरलं आहे. या वर्षात अनेक उल्का पृथ्वीच्या जवळून गेल्याचं पाहायला मिळालं. २१ जून २०२० रोजी पृथ्वी नष्ट होणार असल्याचं सांगितलं जात होतं. पण माया कॅलेंडरने वर्तवलेली ही भविष्यवाणी अखेर खोटी ठरली. आता संशोधकांनी पृथ्वी नष्ट होण्याची नवी तारीख सांगितली आहे. 

संशोधकांच्या म्हणण्यानुसार २०५० पर्यंत पृथ्वीच्या तापमानात सरसरी ३ डिग्री सेल्सियसने वाढ होणार आहे. यामुळे पृथ्वीवरील मनुष्यवस्ती नष्ट होऊ शकते. जयवायू परिवर्तनामुळे २०५० मध्ये पृथ्वीवर संकट कोसळण्याची शक्यता आहे.  

२०५० पर्यंत कृषी उत्पादनाचा पाचव्या हिस्सा देखील नष्ट होऊन जाईल. पर्यावरणाचा समतोल बिघडलेला असेल आणि समुद्राच्या पातळीत ०.५ मीटरने वाढ झालेली असेल. आशियातील सर्व मोठ्या नद्या कोरड्या पडतील आणि पृथ्वीच्या एक तृतियांश भागाचे वाळवंट झालेलं असेल.  इतकंच नव्हे, तर 'फादर ऑफ मॉर्डन सायन्स' म्हणून ओळख असलेल्या विख्यात शास्त्रज्ञ न्यूटन यानेही मृत्यूपूर्वी  लिहीलेल्या एका पत्रात २०६० पर्यंत पृथ्वी नष्ट झालेली असेल, असं नमूद केलं होतं. मनुष्याला जर वाटत असेल की तो अजरामर राहील तर ती त्याची चूक आहे. २०६० मध्ये सारंकाही नष्ट झालेलं असेल, असं न्यूटनने पत्रात लिहीलं होतं.  

टॅग्स :Earthपृथ्वीscienceविज्ञान