शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

बोलताना शब्द खाता? मल्टी टास्किंग थांबवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 10:00 IST

एकाच वेळी आपण एकापेक्षा जास्त कामं केली, कायम मल्टी टास्टिंग केलं तर अनेक गोष्टींत आपण संतुलन साधू शकतो, असंही आपल्याला वाटत असतं, पण हा एक भ्रम आहे.

रोज आपण किती काम करतो? एका मागोमाग कामांचा रगाडा सुरूच असतो. हे झालं की ते. ते झालं की हे अनेकदा अनेक जण तर एकाच वेळी एकापेक्षा जास्त कामं करत असतात. यालाच आपण मल्टी टास्किंग म्हणतो. बऱ्याचदा आपल्याला वाटतं, एका दिवसात ४८ तास असते किंवा दिवस मोठा असता तर किती बरं झालं असतं. अलीकडच्या काळात तर आपलं काम आणि घरगुती जीवन यातील सीमारेषाही कल्पनेपलीकडे अस्पष्ट झाली आहे. त्यामुळे आपण आपल्या घरासाठी झटतो आहोत की आपल्या ऑफिससाठी, कार्यालयासाठी हे समजणंही मुश्कील झालं आहे.

एकाच वेळी आपण एकापेक्षा जास्त कामं केली, कायम मल्टी टास्टिंग केलं तर अनेक गोष्टींत आपण संतुलन साधू शकतो, असंही आपल्याला वाटत असतं, पण हा एक भ्रम आहे. मल्टी टास्किंग आपल्यासाठी नवीन नाही. प्रत्येक जण ते करतच असतो. आजच्या रिमोट वर्कच्या स्पर्धेच्या आणि स्वतःला कायम सिद्ध करत राहाण्याच्या काळात ते जास्तच आवश्यक झालं आहे. मल्टी टास्किंगमुळे एकाच वेळी अनेक कामं आपण पूर्ण करीत आहोत, आपला 'बॅकलॉग' आपण झपाट्यानं पूर्ण करीत आहोत, असा भास आपल्याला सतत होत राहतो, पण ते खरं नाही.

मुळात मल्टी टास्किंग ही गोष्टच वास्तविक नाही. असं केल्यामुळे खरं तर तुम्ही फक्त आपल्या कामांचा प्राधान्यक्रम मागेपुढे करीत असता. यापेक्षा जास्त काही त्यातून साध्य होत नाही. खरंतर एकच काम जेव्हा तुम्ही पूर्ण सजगतेनं आणि कार्यक्षमतेनं करता, तेव्हा ते अधिक चांगलं होतं, त्यातून मिळणारं समाधानही जास्त असतं. मात्र, एकाच वेळी जास्त कामांची शारीरिक आणि मानसिक ओझी तुम्ही वाहत असाल तर बहुदा प्रत्येक काम तुम्ही कमी कार्यक्षमतेनं करता त्याला अधिक वेळ लागतो आणि ते थोडं कमअस्सल होण्याची शक्यताही जास्त असते. याशिवाय तुम्ही तुमचं मानसिक आरोग्यही पणाला लावत असता, त्याला हानी पोहोचवत असता.जगात फारतर दोन ते अडीच टक्के लोकच असे असतील, असू शकतात, जे खरंच मल्टी टास्किंग करू शकतात, बाकीच्यांनी मात्र यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांचाच अधिक गांभीर्यानं विचार केला पाहिजे आणि त्यासाठी पर्यायी चांगले मार्ग धुंडाळले पाहिजेत.तुम्ही जर मल्टी टास्किंगच्या मागे लागला असाल, तर थोडं थांबा. आपला स्पीड कमी करा. एका वेळी शक्यतो एकाच गोष्टीवर फोकस करा आणि मग पुन्हा कामाला लागा. यासंदर्भात नुकतंच एक व्यापक संशोधन झालं आहे आणि त्यावर मल्टी टास्किंगच्या दुष्परिणामांवर गांभीर्यानं सजग करण्यात आलं आहे.

आपण आपली नेहेमीची कामं करतच असतो, पण कधीकधी अचानक आपल्याला समोरच्या परिचयाच्या व्यक्तीचंही नावच आठवेनासं होतं, आपला फोन कुठे ठेवला ते लक्षात राहात नाही, आपल्या चाव्या आपण कुठेतरी ठेवून देतो आणि मग त्या शोधत बसतो, चष्मा सापडला नाही की चिडचिड करतो, बोलताना मध्येच काही शब्द खाल्ले जातात, ऑनलाइन बिल भरण्यासाठी मोबाइल तर हातात घेतो, पण आपल्याला काय करायचं होतं, तेच विसरून जातो. प्रत्येकाच्या बाबतीत या गोष्टी होतात आणि ते 'नॉर्मल'ही आहे. पण हे जर वारंवार घडायला लागलं, तर मात्र समजायचं, काही तरी गडबड आहे. मेंदूच्या संदर्भातील आजाराचा हा संकेत असू शकतो आणि काही वेळा ते गंभीरही असू शकतं..

जमेल की, फार अवघड नाही ते!मल्टी टास्किंगची आपल्याला सवय असेल तर ती लगेच मोडता येणार नाही, पण थोडे प्रयत्न केले तर त्यापासून नक्कीच लांब राहता येऊ शकतं. एकाच वेळी अनेक कामं करीत असला, तर आधी आपला अॅप्रोच बदला. एक यादी करा. प्राधान्यक्रमानुसार सर्वांत महत्त्वाचं काम आधी करा. ते झालं की दुसऱ्या कामाला हात लावा. आपलं लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी आपल्यापासून दूर ठेवा, माइंडफुलनेसचा वापर करा आणि मनातला तसंच आजूबाजूचा कचारा, गोंधळ कमी करा.....

अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीच्यान्यूरोसायकॉलॉजिस्ट एलिस कॅकापोला यासंदर्भात आपल्याला सजग करताना सांगतात, थांबा आता जरा. मल्टी टास्किंग थोडं बाजूला ठेवा. आपण जेव्हा कोणतंही काम करीत असतो, तेव्हा मेंदूशी संबंधित अनेक नेटवर्क क्रियाशील असतात, पण मल्टी टास्किंगमध्ये या नेटवर्कमध्येच गडबड होऊन स्मरणशक्ती आजारी पडू शकते. मल्टी टास्किंगमुळे विशेषतः आपल्या मानसिक आरोग्यावर पाच प्रकारचे दुष्परिणाम होतात. मेंदूच्या कार्याशी तडजोड व्हायला सुरुवात होते, आपल्याला सातत्यानं तणाव जाणवायला लागतो, त्यामुळे नैराश्य येऊ शकतं, आपली प्रेरणाशक्ती कमजोर होऊ शकते आणि स्मरणशक्ती दगा देऊ शकते.

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडी