शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
2
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
4
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
5
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
6
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
7
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
8
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
9
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
10
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
11
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
12
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
13
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
14
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
15
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
16
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
17
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
18
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
19
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
20
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा

म्यानमारमधून पलायन करताना बोट उलटून 12 रोहिंग्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2017 5:04 PM

बांगलादेशमध्ये फिशिंग ट्रॉलरमध्ये बसून पळून जाणाऱ्या रोहिंग्यांची बोट बुडून 12 रोहिंग्यांचा मृत्यू झाला आहे. हे रोहिंग्या म्यानमारमधील अशांततेस आणि अराजकतेस कंटाळून दोन्ही देशांच्यामध्ये असणाऱ्या नेफ नदीतून पळून जात होते. तसेच या बोटीमधील 13 लोकांना वाचवण्यात यश आल्याचे बांगलादेशातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्देनेफ नदी ओलांडून बांगलादेशात जाताना रोहिंग्यांच्या बोटींनी आजवर अनेकदा अपघात झाले आहेत.बांगलादेश आणि म्यानमार यांच्यामध्ये नेफ ही नैसर्गिक सीमा आहे.

कॉक्स बझार, दि.9-  बांगलादेशमध्ये फिशिंग ट्रॉलरमध्ये बसून पळून जाणाऱ्या रोहिंग्यांची बोट बुडून 12 रोहिंग्यांचा मृत्यू झाला आहे. हे रोहिंग्या म्यानमारमधील अशांततेस आणि अराजकतेस कंटाळून दोन्ही देशांच्यामध्ये असणाऱ्या नेफ नदीतून पळून जात होते. तसेच या बोटीमधील 13 लोकांना वाचवण्यात यश आल्याचे बांगलादेशातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

रोहिंग्यांची घुसखोरी रोखण्यासाठी बीएसएफने 50 संवेदनशील ठिकाणी वाढवली गस्त, आसाममध्ये हायअलर्ट 

बांगलादेश बॉर्डर गार्डसच्या सैनिकाने सांगितल्याप्रमाणे, हे लोक अत्यंत घाबरलेले होते, त्यांना वाचवल्यावर प्रथमोपचार करण्यात आले. अन्न आणि औषधाची मदत केल्यानंतर यांना कॅम्पमध्ये ठेवण्यात आले आहे. बुडालेल्या 12 व्यक्तींचे मृतदेह बांगलादेशच्या दक्षिणेस असणाऱ्या शाह पारीर द्वीप येथे वाहून आले आहेत.

आंग सान यांची भूमिका धक्कादायक

बांगलादेशच्या स्टेट कौन्सिलर आंग सान सू की यांनी रोहिंग्यांबाबत अजूनही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. रोहिंग्या का पळून जात आहेत ते माहिती नाही असं धक्कादायक विधान त्यांनी केलं आहे. राखिन प्रांतात शांततेसाठी आमचे सरकार आधीपासून प्रयत्न करत आहे. २०१७-२२ अशी राखिनसाठी पंचवार्षिक योजनाही आम्ही केली आहे. त्यामुळे येथे रोजगार उपलब्ध होईल, शिक्षण आरोग्याच्या सुविधा वाढल्या आहेत. तसेच जेथे फक्त बोटीने जाता येत असे अशा प्रदेशातही रस्ते, वीज व पायाभूत सुविधांची सोय माझ्या सरकारने केल्या आहेत. राखिन प्रांतामध्ये नवे रेडिओ स्टेशन सुरु होणार असून त्यात बंगाली, राखिन व म्यानमारी भाषेत आरोग्य व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिलं जाईल. रोहिंग्यांच्या देशाबाहेर जाण्याबाबत  सू की  म्हणाल्या, रोहिंग्यांनी बांगलादेशात जाण्याचे काहीच कारण नाही, ५ सप्टेंबर नंतर कोणतीही हिंसा किंवा लष्करी कारवाई राखिनमध्ये झालेली नाही. तसेच ५०% मुस्लीम गावे आजही तशीच व्यवस्थित आहेत, त्यामुळे त्यांच्या स्थलांतरामागची कारणे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. बांगलादेशाशी संबंध सुधारण्याचे आमचे सरकार प्रयत्न करत आहे.

रोहिंग्यांना सहानुभूती दाखवणे ही देशद्रोहाची शेवटची सीमाच - उद्धव ठाकरे

टॅग्स :Rohingyaरोहिंग्या