शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

China Coronavirus : बापरे! कोरोनाच्या भीतीने त्याने पत्नीला बाथरुममध्ये ठेवलं कोंडून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 13:02 IST

China Coronavirus : 3100 लोकांचा मृत्यू झाला असून 90 हजार लोकांना संसर्ग झाला आहे.

ठळक मुद्दे3100 लोकांचा मृत्यू झाला असून 90 हजार लोकांना संसर्ग झाला आहे. लिथुआनियाच्या एका व्यक्तीने कोरोना व्हायरसच्या भीतीने आपल्या पत्नीला बाथरुममध्ये कोंडून ठेवलं.जगात 70 देशांत कोरोना (कोविड-19) पसरला.

जगभरात वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने थैमान घातले आहे. आतापर्यंत 3100 लोकांचा मृत्यू झाला असून 90 हजार लोकांना संसर्ग झाला आहे. पर्यटनासाठी इटलीहून भारतात आलेल्या 15 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. इटलीमध्ये अनेकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे इटलीहून आलेल्या पर्यटकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. चाचणी करण्यात आलेल्या 21 पैकी 15 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लिथुआनियाच्या एका व्यक्तीने कोरोना व्हायरसच्या संशयावरून आपल्या पत्नीला बाथरुममध्ये कोंडून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

लिथुआनियाच्या एका व्यक्तीने कोरोना व्हायरसच्या भीतीने आपल्या पत्नीला बाथरुममध्ये कोंडून ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या व्यक्तीची पत्नी इटलीवरून आलेल्या एका चिनी महिलेला भेटली होती. त्यामुळे कोरोना होईल या भीतीने त्याने पत्नीला बाथरुममध्ये बंद केलं. महिलेने पोलिसांना फोन करून हा संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी तिची सुटका केली. डेली मेलने याबाबतचे वृत्त दिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीला कोंडून ठेवणाऱ्या व्यक्तीने फोनवर डॉक्टरांचा सल्ला घेतला होता. त्यानंतर त्याने कोरोनाच्या भीतीने तिला बाथरूममध्ये कोंडून ठेवले. 

महिलेला कोरोनाचा संसर्ग खरंच झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी तिची चाचणी करण्यात आली. मात्र तिला कोरोनाची लागण झालेली नाही. चीनमधील कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचे सांगितले जात असले तरी जगात मात्र या घातक आजाराने पाय पसरले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगात 70 देशांत कोरोना (कोविड-19) पसरला. अमेरिकेत कोरोना विषाणूंमुळे आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून 91 जणांना संसर्ग झाला आहे. तर इराणमध्ये आणखी 11 लोकांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींची संख्या आता 77 वर पोहोचली आहे. 

भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 6 होती. त्यात आता इटलीहून आलेल्या 15 पर्यटकांची भर पडल्यानं हा आकडा 21 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 6 भारतीयांना कोरोनाचा संसर्ग झाला. यातले तीन जण केरळचे होते. या सर्व रुग्णांवर उपचार पूर्ण झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महत्त्वाची पावलं उचलली आहेत. तीन मार्च किंवा त्याआधी व्हिसा जारी करण्यात आलेल्या इटली, इरान, दक्षिण कोरिया आणि जपानच्या नागरिकांना भारतात प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजदूत, संयुक्त राष्ट्राचे अधिकारी, ओसीआय कार्डधारक यांना मात्र यामधून वगळण्यात आलं आहे. मात्र त्यांना वैद्यकीय चाचण्यांनंतर देशात प्रवेश दिला जाईल. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus: इटलीहून आलेल्या १५ पर्यटकांना कोरोनाची बाधा; एम्सकडून दुजोरा

विद्या चव्हाण यांच्या सुनेचा खळबळजनक दावा, 'ब्लॅकमेल' करत असल्याचाही आरोप

Narendra Modi : 'मोदींची नाट्यछटा, अफवांनी प्राण तळमळला!'; शिवसेनेचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

मध्य प्रदेशात राजकीय भूकंप? भाजपानं आठ आमदारांना ओलीस ठेवलं; काँग्रेसचा गंभीर आरोप

कोरोनामुळे देशासह राज्यातही यंत्रणा सतर्क

 

टॅग्स :corona virusकोरोनाDeathमृत्यूchinaचीनIndiaभारत