शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळमध्ये सापडले १०० गिर्यारोहकांचे मृतदेह

By admin | Updated: May 6, 2015 03:31 IST

हिमस्खलनात मृत्युमुखी पडलेल्या आणखी १०० गिर्यारोहकांचे मृतदेह नेपाळ पोलीस आणि पुनर्वसनाच्या कामात गुंतलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या हाती लागले आहेत.

मृतांचा आकडा ७,५०० पार : बौद्ध स्तूप, मंदिरांमध्ये चोरीच्या शक्यतेने नेपाळ हादरलेकाठमांडू : २५ एप्रिल रोजी झालेल्या भूकंपानंतर एव्हरेस्ट शिखरावर झालेल्या मोठ्या हिमस्खलनात मृत्युमुखी पडलेल्या आणखी १०० गिर्यारोहकांचे मृतदेह नेपाळ पोलीस आणि पुनर्वसनाच्या कामात गुंतलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या हाती लागले आहेत. काठमांडूच्या उत्तरेकडे ६० किमीवर असणाऱ्या लांगतांग येथे रविवारी हे मृतदेह सापडले. यातील फक्त दोघांची ओळख पटली आहे.हे गाव गिर्यारोहकांच्या वहिवाटीवरचे आहे. या गावात गिर्यारोहकांसाठी ५५ गेस्ट हाऊस तसेच इतर सुविधा होत्या़ एव्हरेस्टवर कोसळलेल्या बर्फाच्या दरडीखाली  हे संपूर्ण गाव गडप झाले आहे. बर्फात गाडले गेलेले अजून काही मृतदेह मिळतात काय हे पाहण्यासाठी स्थानिक स्वयंसेवक व नेपाळी पोलीस बर्फात सहा फूट खोदत आहेत. पाऊस व ढगाळ हवामानामुळे आम्ही या भागात आधी पोहोचू शकलो नाही, असे लांगतांगचे सहायक जिल्हाधिकारी गौतम रिमल यांनी सांगितले.

575 शाळा पूर्णपणो जमीनदोस्त
नेपाळमधील महाप्रलयंकारी भूकंपातील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. भूकंपातील मृतांची संख्या 75क्क् हून अधिक झाली आहे.  
काठमांडू, ललितपूर आणि भक्तपूर येथील पुरातन दरबार स्क्वेअरमधील प्रत्येक विटेला प्रचंड महत्त्व आहे. त्यामुळे आता या ठिकाणी असलेल्या ढिगा:यांचे संरक्षण करण्याचे मुख्य काम नेपाळ आर्मी आणि नेपाळ पोलिसांसमोर आहे. असंख्य मूर्ती, दरवाजे, खांब, देवतांच्या मूर्ती, नक्षीकाम केलेले खांब, विटा, लाकडी स्तूप यांची मोजदाद करण्याचे काम नेपाळ सरकारच्या पुरातत्त्व संशोधन विभागाने हाती घेतले आहे. हे काम  सुरू असताना या ठिकाणच्या विटा आणि ढिगा:यांमधून काही वस्तू चोरी होत आहेत. पुरातन महत्त्व असल्याने येथील प्रत्येक विटेला देखील हजारो डॉलर्सचा भाव आला आहे. चोरी करुन या वस्तू नेपाळबाहेर नेण्याचे षडयंत्र तस्करांकडून आखले जात आहे. त्यामुळे या तिन्ही शहरांतील दरबार स्क्वेअरच्या परिसरात नागरिकांना फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. तिन्ही शहरांमधील दरबार स्क्वेअर नेपाळ आर्मीने ताब्यात घेतले आहेत. 

गिर्यारोहकांचे पथक माघारी पहिल्या भारतीयाने माउंट एव्हरेस्ट सर केले, त्या अपूर्व घटनेच्या सुवर्ण जयंतीच्या निमित्ताने या जगातील सर्वोच्च शिखराच्या चढाई मोहिमेवर गेलेल्या भारतीय लष्कराच्या ३० गिर्यारोहकांच्या पथकाला नेपाळमधील भूकंपामुळे माघारी बोलावण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे.भूकंपाच्या धक्क्यानंतर मदतीसाठी आलेली परदेशी पथके आता परतू लागली असून, नेपाळचे पोलीस व लष्कराने भूकंपानंतरच्या पुनर्वसन कार्यक्रमाचा ताबा घेतला आहे. भूकंपामुळे विस्थापित झालेल्या लाखो नागरिकांचे पुनर्वसन करण्याचे अवघड काम आता नेपाळी पोलीस व लष्कराला करायचे आहे. नेपाळमधील मृतांची संख्या आता ७,५५७ पर्यंत पोहोचली असून, त्यात ४१ भारतीय आहेत.नेपाळमध्ये महामारीची भीतीमोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली असली तरी अजूनही काही मृतदेह नेपाळच्या ग्रामीण भागात ठिगाऱ्यांखाली अडकले असल्याची शक्यता नेपाळी बचाव पथकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे उरलेले ढिगारे उपसण्याचे आव्हान या यंत्रणांसमोर आहे. हे लवकर न झाल्यास नेपाळमध्ये महामारी पसरण्याचा मोठा धोका आहे.अडीच कोटी आणि १०५ वर्षांचा नागरिककाठमांडूच्या बँक आॅफ काठमांडूचा काही भाग देखील भूकंपात कोसळला होता. या ढिगाऱ्याखालून मदतकार्य करणाऱ्या पथकाने तब्बल अडीच कोटी रुपये बाहेर काढले आहेत. तर नेपाळ पोलिसांनी तब्बल नऊ दिवसांनंतर एका १०५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाची ढिगाऱ्याखालून सुखरूप सुटका केली आहे.