शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

शेजारी धर्म निभावणार! भारताच्या विरोधात बांगलादेशची भूमी वापरली जाणार नाही; उच्चायुक्तांनी दिला शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 09:06 IST

भारत-बांगलादेश संबंधांमध्ये नवा अध्याय! ५६ व्या स्वातंत्र्यदिनी बांगलादेशने भारताला सुरक्षेचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधान तारीख रहमान यांच्या नेतृत्वात दोन्ही देश मैत्रीचा नवा हात पुढे करत आहेत.

बांगलादेशच्या ५६ व्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर ढाकाने भारताला मैत्रीचा आणि सुरक्षेचा मोठा शब्द दिला आहे. "बांगलादेश कधीही असे पाऊल उचलणार नाही, ज्यामुळे भारताच्या सुरक्षेला किंवा हिताला बाधा येईल. दोन्ही देशांनी भविष्यातील संबंधांबाबत पूर्णपणे निश्चिंत राहावे," अशी ग्वाही भारतातातील बांगलादेशचे उच्चायुक्त रियाज हामिदुल्ला यांनी दिली आहे.

मैत्रीचं नवं पर्व: तारीख रहमान यांचा सकारात्मक संदेश

बांगलादेशात नुकत्याच झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर दोन्ही देशांमधील संबंधांबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, बांगलादेशचे नवनियुक्त पंतप्रधान तारीख रहमान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या संदेशाने सर्व शंका दूर केल्या आहेत. उच्चायुक्त हामिदुल्ला यांच्या मते, हा संदेश दोन्ही देशांमधील आगामी काळातील संबंधांची दिशा स्पष्ट करणारा आहे. दोन्ही देशांच्या नेतृत्वामध्ये आता विश्वासाचे एक नवीन वातावरण निर्माण होत आहे.

अस्थिरतेची भीती बाळगणाऱ्यांना चपराक

बांगलादेशातील निवडणूक प्रक्रियेवर भाष्य करताना हामिदुल्ला म्हणाले की, "देशात १९ दिवस शांततेत निवडणुका पार पडल्या. भारतीय पत्रकारांनी स्वतः तेथील जमिनी परिस्थिती पाहिली आहे. निवडणुकीला महिना उलटून गेला असून बांगलादेशात पूर्णपणे स्थिरता आहे. जे लोक देश अस्थिर होण्याची भीती व्यक्त करत होते, ते आता खोटे ठरले आहेत." बांगलादेश हा एक मुक्त समाज असून तिथे सार्वजनिक चर्चा होणे स्वाभाविक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भूतकाळातील मतभेद विसरण्याची वेळ

मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या काळात भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला होता. मात्र, आता तारीख रहमान यांच्या नेतृत्वात हे नाते पुन्हा रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. "आम्ही सतत भूतकाळाकडे पाहून पुढे जाऊ शकत नाही. आधी काय झाले, याचाच विचार करत बसलो तर प्रगती खुंटेल. त्यामुळे दोन्ही देशांनी आता भविष्यातील संधींकडे लक्ष दिले पाहिजे," असे आवाहन उच्चायुक्तांनी यावेळी केले.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारत