पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 11:53 IST2025-11-26T11:53:03+5:302025-11-26T11:53:33+5:30
Ayodhya Ram Mandir: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीराम मंदिराच्या शिखरावर काल(25 नोव्हेंबर) धर्मध्वजाची स्थापना केली.

पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
Ayodhya Ram Mandir: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या शिखरावर काल(25 नोव्हेंबर) रोजी धर्मध्वजाची स्थापना केली. मात्र, आता पाकिस्ताननं नेहमीप्रमाणे यावरही गरळ ओकली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं याला भारतातील मुस्लिम समाज आणि सांस्कृतिक वारशासाठी धोकादायक असल्याचं सांगत, आंतरराष्ट्रीय समुदायाला याकडे लक्ष वेधण्याचं आवाहनदेखील केलं.
पाकिस्ताननं नेमकं काय म्हटलं?
पाकिस्ताननं म्हटलं की, अयोध्येतील राम मंदिराची उभारणी आणि ध्वजारोहण हे भारतातील अल्पसंख्यकांना दडपण्याचा भाग असून, मुस्लिम धार्मिक स्थळांचे जाणूनबुजून नुकसान करण्याचा प्रयत्न आहे. पाकिस्तानने बाबरी विध्वंसाचा उल्लेख करत, त्याला ‘ऐतिहासिक प्रार्थनास्थळ’ असल्याचे मत व्यक्त केले.
𝐑𝐚𝐦 𝐌𝐚𝐧𝐝𝐢𝐫 𝐢𝐬 𝐭𝐡𝐞 𝐚𝐧𝐬𝐰𝐞𝐫 𝐭𝐨 𝐞𝐯𝐞𝐫𝐲 𝐩𝐫𝐚𝐲𝐞𝐫 𝐨𝐟 𝐞𝐯𝐞𝐫𝐲 𝐑𝐚𝐦 𝐛𝐡𝐚𝐤𝐭...🙏🕉️
— BJP (@BJP4India) November 25, 2025
Ayodhya is glowing again in the warmth of Shri Ram 🛕
𝐓𝐡𝐞 𝐃𝐡𝐚𝐫𝐦𝐚 𝐃𝐡𝐰𝐚𝐣𝐚 𝐦𝐚𝐫𝐤𝐬 𝐭𝐡𝐞 𝐫𝐞𝐭𝐮𝐫𝐧 𝐨𝐟 𝐚 𝐜𝐢𝐯𝐢𝐥𝐢𝐬𝐚𝐭𝐢𝐨𝐧… pic.twitter.com/oVGOai3CTn
पाकिस्तानने भारतातील कथित इस्लामोफोबिया, हेट स्पीच आणि अल्पसंख्याकांवरील अत्याचारांचा उल्लेख करत संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. भारतातील मशिदी आणि मुस्लीम सांस्कृतिक वारसा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी घेण्याचेही त्यांनी आवाहन केले.
भारताने पाकला दाखवला आरसा...
भारतावर धार्मिक वारशाचे नुकसान केल्याचा आरोप करताना पाकिस्तान स्वतःच्या देशातील हिंदू धार्मिक स्थळांच्या स्थितीवर मौन पाळत असल्याची टीका भारतातील विविध तज्ज्ञांकडून केली जाते. शारदा पीठ, कराचीतील जगन्नाथ मंदिर, रावळपिंडीतील मोहन मंदिर यांसारखी अनेक ठिकाणे पडीक स्थितीत असून, अनेकांवर सरकारी किंवा स्थानिकांचा कब्जा असल्याचा आरोप हिंदू संस्थांकडून वारंवार केला जातो.