शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

श्रीलंका स्फोटातील हल्लेखोर काश्मीर, केरळात गेले होते-  सैन्यप्रमुखांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 6:20 AM

ईस्टर संडेला श्रीलंकेत झालेल्या स्फोटातील काही आत्मघाती हल्लेखोर विशेष प्रशिक्षणासाठी आणि विदेशी संघटनांशी संबंध मजबूत करण्यासाठी काश्मीर, केरळात गेले होते, असा दावा श्रीलंकेच्या सैन्यप्रमुखांनी केला आहे.

कोलंबो  - ईस्टर संडेला श्रीलंकेत झालेल्या स्फोटातील काही आत्मघाती हल्लेखोर विशेष प्रशिक्षणासाठी आणि विदेशी संघटनांशी संबंध मजबूत करण्यासाठी काश्मीर, केरळात गेले होते, असा दावा श्रीलंकेच्या सैन्यप्रमुखांनी केला आहे.भारताने यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे की, श्रीलंकेला गोपनीय माहिती पुरविली होती. एका महिलेसह ९ आत्मघाती हल्लेखोरांनी २१ एप्रिल रोजी तीन चर्च आणि तीन आलिशान हॉटेलमध्ये हल्ले घडवून आणले. यात २५३ लोकांचा मृत्यू झाला, तर ५०० पेक्षा अधिक जण जखमी झाले.इसिसने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे; पण सरकार स्थानिक संघटना ‘नॅशनल तौहीद जमात’ला जबाबदार ठरवीत आहे. श्रीलंकेने या संघटनेवर बंदी आणली आहे, तर १०० हून अधिक लोकांना अटक केली आहे. यात एखाद्या विदेशी संघटनेचा हात आहे काय? असे विचारले असता कमांडरनी सांगितले की, ज्या प्रकारे हे स्फोट घडवून आणले त्यावरून बाहेरील शक्तींचा यात हात असावा असे वाटते. (वृत्तसंस्था)काय म्हणाले सैन्यप्रमुख?सैन्याचे कमांडर ले. जनरल महेश सेनानायक यांनी सांगितले की, ते संशयित भारतात गेले होते. काश्मीर, बंगळुरू, केरळात गेले होते. आम्हाला याची माहिती मिळाली आहे. काश्मीर, केरळात हे संशयित काय करीत होते? असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, प्रशिक्षण आणि देशाबाहेरील अन्य संघटनांशी संबंध मजबूत करण्यासाठी ते गेले होते.

टॅग्स :sri lanka bomb blastश्रीलंका बॉम्ब स्फोटIndiaभारत