शहरं
Join us  
Trending Stories
1
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
2
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
3
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
4
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
5
Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं गाडीत बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
6
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
7
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
8
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
9
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
10
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
11
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
12
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
13
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
14
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
15
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
16
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
17
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
18
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
19
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
20
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
Daily Top 2Weekly Top 5

"अशा परिस्थितीत आम्हाला राष्ट्राध्यक्ष सोडून गेले..."; दिल्लीत आलेल्या अफगाणी विद्यार्थ्यानं सांगितलं दु:ख

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 14:29 IST

Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी रविवारी सोडला देश. तालिबानच्या भीतीनं नागरिकांचंही पलायन.

ठळक मुद्देअफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी रविवारी सोडला देश.तालिबानच्या भीतीनं नागरिकांचंही पलायन.

अफगाणिस्तानची राजधानी काबुलसह बहुतांश भागावर रविवारी तालिबाननं कब्जा केला. अशाच परस्थितीत अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडल्याची माहिती समोर आली होती. तर दुसरीकडे अफगाणिस्तानमधील नागरिक तालिबानच्या भीतीनं अन्य देशांमध्ये शरण घेण्यास जात आहे. परंतु अशा परिस्थितीत अशरफ गनी यांच्या देश सोडल्यानं अनेक नागरिक नाराज झाले आहे. भारतात आलेल्या एका अफगाण विद्यार्थ्यांनही यानंतर आपलं दु:ख व्यक्त केलं. 

"राष्ट्राध्यक्ष अशरफ गमी अशा वेळी देश सोडून गेले, हे अतिशय बेजबाबदार पणाचं वर्तन आहे. त्यांच्या या कृत्यामुळे प्रत्येक अफगाणी नागरिकाला दु:ख झालं आहे. आम्हाला त्यांच्याकडून अनेक अपेक्षा होत्या," असं विद्यार्थ्यांनं सांगितलं. लोकांसोबत गद्दारी"जेव्हा मी त्या ठिकाणाहून पळालो आहे तेव्हा तुम्ही तिकडची परिस्थिती काय आहे हे समजू शकता. अशरफ गनी याची टीम गद्दार आहे. त्यांनी अफगाणिस्तानच्या लोकांसोबत गद्दारी केली आहे. लोक त्यांना माफ करणार नाहीत," अशी प्रतिक्रिया अफगाणिस्तानचे माजी खासदार जमील करझई यांनी दिल्लीला पोहोचल्यानंतर दिली. 

"अफगाणिस्तानच्या बहुतांश भागात शांतता आहे. जवळपास अनेक राजकीय लोकांनी काबुल सोडलं. २०० जण दिल्लीला आले आहेत. मला असं वाटतंय हे नवं तालिबान आहे. ते महिलांनादेखील काम करण्याची परवानगी देतील,"अशी प्रतिक्रिया अफगाण राष्ट्राध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागार रिझवानुल्ला अहमदझई यांनी दिल्लीला आल्यानंतर दिली.

तालिबान आम्हालाही मारू शकतो"जगानं अफगाणिस्तानला वेगळं सोडलं यावर विश्वास बसत नाही. त्या ठिकाणी आमचा मित्रपरिवार आहे, त्याचा खून होऊ शकतो. तालिबान आम्हालाही मारू शकते. आमच्या महिलांना आथा त्या ठिकाणी अधिक अधिकार मिळणार नाही," अशी प्रतिक्रिया भारतात आलेल्या एका महिलेनं दिली. 

गनी यांची भावूक पोस्ट"माझ्यासमोर आव्हानात्मक पर्याय होते. मला कठोर निर्णय घ्यावा लागला आणि म्हणून मी देश सोडला आहे. तालिबानसमोर मला उभे ठाकायला हवे. देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी गेली २० वर्षे झटलो. देश सोडला नसता, तर देशवासीयांना घातक परिणामांना सामोरे जावे लागले असते. तालिबानने मला हटवले आहे. काबुलमधील सामान्य जनतेवर हल्ले करण्यासाठी ते आले आहेत. लोकांना जास्त रक्तपात पाहावा लागू नये म्हणून आपण अफगाणिस्तानातून पळून गेलो, असं गनी यांनी म्हटलं आहे. 

काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असतं"मी अफगाणिस्तानमध्ये राहिलो असते तर मोठ्या संख्येने लोक देशासाठी लढायला आले असते. अशा स्थितीत असंख्य लोक तिथे मरण पावले असते. तसेच काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असतं. आता तालिबान जिंकला आहे. आता तो अफगाण लोकांच्या सन्मान, मालमत्ता आणि सुरक्षेसाठी जबाबदार आहे. तालिबान एका ऐतिहासिक परीक्षेला सामोरे जात आहे. आता एकतर तो अफगाणिस्तानचे नाव आणि सन्मान वाचवेल, असं घनी यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानPresidentराष्ट्राध्यक्षStudentविद्यार्थीIndiaभारतdelhiदिल्लीAir Indiaएअर इंडिया