शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

राजा मेला, ६ राण्या, २८ मुलांमध्ये ‘युद्ध’ सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 5:22 AM

अनेक देशांतली राजेशाही आज संपुष्टात आलेली असली, तरी त्यांचं ‘राजेपण’ मात्र संपलेलं नाही. या राजांना आता लोकशाहीत फारसे अधिकार ...

अनेक देशांतली राजेशाही आज संपुष्टात आलेली असली, तरी त्यांचं ‘राजेपण’ मात्र संपलेलं नाही. या राजांना आता लोकशाहीत फारसे अधिकार नसले, तरी त्यांच्याविषयी लोकांना अजूनही आदर आहे आणि ‘राजा’ म्हणूनच त्यांच्याकडे आणि त्यांच्या परिवाराकडे पाहिलं जातं. या राजांना लोकशाहीत विशेष कार्यकारी अधिकार नसले, तरी त्यांच्याकडे आजही मोठी संपत्ती आहे. मानमरातब तर आहेच आहे. लोकं त्यांच्याकडे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे राजघराणं म्हणूनच पाहतात. दक्षिण आफ्रिकेतील प्राचीन झुलू जनजाती समूहात अजूनही राजा आणि राजेशाहीची परंपरा कायम आहे. येथील राजा गुडविल झ्वेलिथिनी यानं ५० वर्षे राजेपदाचा मुकुट मिरविल्यानंतर गेल्या वर्षी त्याचं निधन झालं. त्यावेळी त्याचं वय ७२ वर्षे होतं. या राजाला तब्बल सहा राण्या आणि ‘किमान’ २८ मुलं आहेत. राजा तर गेला, पण त्याचा ‘उत्तराधिकारी’, ‘वारसदार’ कोण, यावरून आता त्याच्या कुटुंबातच ‘गृहयुद्ध’ सुरू झालं आहे. मीच राजाचा उत्तराधिकारी म्हणून राजाच्या सहाही राण्या आणि २८ मुलं आता एकमेकांवर ‘वार’ करू लागले आहेत. याबद्दल कायदेशीर लढाईही त्यांनी सुरू केली आहे.या राजाच्या मालकीची हजारो हेक्टर जमीन, इतर प्रॉपर्टी आणि ठिकठिकाणी अनेक राजमहालही आहेत. यावर आपलाच कब्जा असावा, असं आता साऱ्यांनाच वाटू लागलं आहे. या शाब्दिक भांडणांतून आणि हमरीतुमरीवर येऊन काहीही उपयोग न झाल्यानं शेवटी हे प्रकरण कोर्टात गेलं, पण याप्रकरणी काय निर्णय घ्यावा, याबाबत कोर्टही विचारात पडलं आहे. त्यामुळे वर्ष झालं, न्यायालयही अद्याप काहीही निर्णय घेऊ शकलं नाही. त्यामुळे रिकाम्या हासनावर अजून राज्याभिषेक होऊ शकलेला नाही.इथल्या राजाचं अधिकृत राजेपद कधीचंच गेलं असलं तरी झुलू जमातीतील त्याच्या ‘प्रजेवर’ आजही त्याचा मोठा नैतिक प्रभाव आहे. बऱ्याचशा झुलू प्रजातीला तर राजाचं प्रकरण न्यायालयात जाणंच मान्य नाही. त्यांचं म्हणणं आहे, न्यायालय काय राजापेक्षा मोठं आहे का? आम्ही न्यायालयाला नाही, राजघराण्यालाच मानतो. शाही परंपरेनुसारच याबाबतचा निर्णय घेतला जाईल, घेतला गेला पाहिजे. त्यासाठी अंगावर प्राण्यांच्या कातड्यांची वल्कलं परिधान केलेल्या, हातात ढाली असलेल्या अनेक झुलू नागरिकांनी न्यायालयासमोर निदर्शनं केली आणि पारंपरिक गाणी गात निषेधही व्यक्त केला.राजाच्या एका विधवा राणीनं तर दावा केला आहे, की आमचं लग्न कायदेशीररीत्याही वैध होतं, इतर पाच राण्यांचा विवाह मात्र कायदेशीर नाही. पारंपरिक रीतिरिवाजानुसार हे विवाह झालेले आहेत. त्यामुळे या विवाहांना काहीच मान्यता, अधिकार नाही आणि माझ्याशिवाय कुठल्याही उत्तराधिकाऱ्याचा प्रश्नच नाही. या राज्याची मीच एकमेव वारसदार आहे.राजा गुडविलची पहिली राणी सिबोंगिल दलामिनी हिनं क्वाजुलू-नताल प्रांताची राजधानी पीटरमॉरिटस्बर्ग येथील शाही वारशातील अर्ध्या हिश्शाची मागणी केली आहे. राणी सिबोंगिलच्या दोन मुली, राजकन्या एनटोम्बिझोसुथू आणि एनटांडोयेन्कोसी यादेखील त्यांच्या हिश्शासाठी इच्छापत्राच्या  वैधतेवरून लढत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की हस्ताक्षराचं तज्ज्ञांनी जे विश्लेषण केलं त्यावरून इच्छापत्रावरील स्वाक्षरी बनावट असल्याचं सिद्ध होतं.गुडविल राजाला सहा राण्या असल्या तरी त्याची तिसरी राणी शियावे मंटफोम्बी दलामिनी ही त्याची आवडती राणी, पट्टराणी असल्याचं मानलं जातं. त्यामुळेच जवळपास सव्वा कोटी झुलू जनजमातीच्या लोकांची ‘संरक्षक’ म्हणून राजानं तिची नेमणूक केली होती; परंतु राजाचं निधन झाल्यानंतर राणी शियावे हिचाही तीन महिन्यांतच अचानक मृत्यू झाला; परंतु आपल्या मृत्यूपूर्वी केलेल्या इच्छापत्रात तिनंही आपला ४७ वर्षीय मुलगा मिसुजुलू जुलू याला सिंहासनावर बसवावं असं लिहून ठेवलं आहे. आवडत्या राणीचा मुलगा म्हणून मिसुजुलू हादेखील सिंहासनाचा प्रबळ दावेदार आहे; पण नुकत्याच झालेल्या न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान तो गैरहजर होता.झुलू जनजमातीचं प्राबल्य असलेला भाग संपूर्ण दक्षिण आफ्रिकेतील लोकसंख्येच्या तुलनेत तब्बल पाचवा भाग इतका मोठा आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत या जमातीचाही बराच वरचष्मा आहे. या प्रकरणाचं आता काय होतं, कोण ‘राजा’ बनतो, कोणाला राजघराण्याचा उत्तराधिकारी केलं जातं आणि कोणाला त्यापासून बेदखल केलं जातं, कोणत्या राणीचं लग्न वैध होतं, इतर राण्यांचं लग्न बेकायदेशीर मानलं जाईल का, सत्ता नेमकी कोणाला मिळेल, या साऱ्या बाबतीत दक्षिण आफ्रिकन लोकांमध्येही मोठी उत्सुकता आहे. मी ‘पहिली’ राणी, सत्ता माझीच!गुडविल राजाची पहिली पत्नी सिबोंगिल दलामिनी हिनेही न्यायालयीन लढाईवर अधिक जोर दिला आहे. न्यायालयात तिनं सांगितलं, राजानं माझ्याबरोबर पहिला विवाह केला असल्यानं त्याच्या सगळ्या संपत्तीची आणि सिंहासनाची मीच एकमेव वारसदार आहे. ज्या राणीनं आपलाच विवाह वैध असल्याचा दावा केला आहे, त्यासंदर्भात बोलताना सिबोंगिलनं न्यायालयाला विचारलं आहे, सामाजिक रीतीरिवाजानुसार केलेला विवाह माझे सत्तेचे दरवाजे बंद कसे करू शकतो?