शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: इराणहून सुटका, भारतीयांसाठी लांबचा वळसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 06:43 IST

iran israel news: इराण आणि इस्त्रायल यांच्यात नव्यानं संघर्ष सुरू झाल्यानंतर त्याचा भारतालाही मोठा फटका बसला.

इराण आणि इस्त्रायल यांच्यात नव्यानं संघर्ष सुरू झाल्यानंतर त्याचा भारतालाही मोठा फटका बसला. विविध कारणांसाठी त्यातही वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी हजारो भारतीय विद्यार्थी इराणला गेले आहेत. त्यांचं भविष्य आता टांगणीला लागलं आहे. इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांची संख्या या घडीला दहा हजार आहे. या विद्यार्थ्यांना सुरक्षित भारतात परत आणणं हे भारतापुढचं सध्या मुख्य आव्हान आहे. 

इराणमधील काही भारतीय विद्यार्थ्यांना परत मायदेशी आणण्यात आलं आहे, पण तरीही अजून बरेच विद्यार्थी इराणमध्येच अडकून पडले आहेत. इराणमधील बहुतांश विमानतळं सध्या बंद आहेत, त्यामुळे या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर इराणमधून कसं बाहेर काढायचं हा भारतापुढे यक्षप्रश्न आहे. रस्तेमार्ग अजून सुरू आहेत, ही त्यातल्या त्यात दिलासादायक गोष्ट. त्यामुळे इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांना रस्ते मार्गानं पहिल्यांदा अर्मेनियामध्ये आणून मग तिथून हवाईमार्गे भारतात आणण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. 

पण मग एवढ्या लांबचा मार्ग भारत सरकारनं का निवडला? दुसरा काही मार्ग नव्हता का? - सध्या तरी नाही. इराणच्या सीमेला लागून सात देश आहेत. त्यात पाकिस्तान, अफगानिस्तान, तुर्कमेनिस्तान, अझरबैजान, अर्मेनिया, तुर्की आणि इराक या देशांचा समावेश आहे. याशिवाय इराणची समुद्री सीमा ओमानला लागून आहे; पण इतके सारे देश असतानाही अर्मेनियाच का? - तर त्यामागची मुख्य कारणं नकारात्मक आहेत.इराणशी भारताचे संबंध चांगले असले तरी थेट इराणमधूनच विद्यार्थ्यांना हवाईमार्गे भारतात आणणं धोक्याचं आहे. कारण इराणमधली बहुसंख्य आंतरराष्ट्रीय उड्डाणं सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद आहेत. शिवाय इस्त्रायलचे इराणवर हवाई हल्ले आणि इराणी विमानांना लक्ष्य करणं सुरूच आहे.

आपला शेजारी देश पाकिस्तानमधून विद्यार्थ्यांना भारतात आणणं तुलनेनं सोपं आहे, पण ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताचे पाकिस्तानशी असलेले संबंध खूपच बिघडलेले आहेत. इराक आणि इराणमधून आजही विस्तव जात नाही. त्यामुळे इराकचा मार्ग आपल्यासाठी सुरक्षित नाही. तुर्की हा पर्याय बरा असला तरी इराणपासून रस्तेमार्गानं तिथपर्यंत पोहोचणं फारच लांब आहे. शिवाय ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर तुर्कीनं भारतावर टीका केली आणि पाकिस्तानला खुलं समर्थन केलं होतं. त्यामुळे तुर्कीचा मार्गही आपल्यासाठी बंद झाला.

शेवटी पर्याय उरतो तो फक्त अर्मेनियाचा. त्यातल्या त्यात अर्मेनियाची सीमा इराणपासून जवळ आहे. अर्मेनिया राजकीयदृष्ट्या स्थिर देश आहे. भारताचे या देशाशी मित्रत्वाचे संबंध आहेत. दोन्ही देशांत सुरक्षा करारही झालेला आहे. इराणबरोबरही त्यांचे चांगले संबंध आहेत. अर्मेनियाची नॉरदूज बॉर्डर सुरक्षित मानली जाते. तिथलं येरेवन एअरपोर्टही व्यवस्थित सुरू आहे. तिथून विद्यार्थ्यांना हवाईमार्गे भारतात आणणं जास्त सुरक्षित आहे.

इस्त्रायलनं नुकतंच इराणच्या नागरिकांनाही इशारा दिला आहे की इराणची राजधानी तेहरान आणि लष्करीदृष्ट्या संवेदनशील भागात जे नागरिक राहतात, त्यांनी तातडीनं तिथून निघून जावं. कारण त्यांना धोका होऊ शकतो. त्यामुळे भारतीय विद्या‌र्थ्यांच्या सुटकेसाठी सध्या अर्मेनिया हाच ‘खुष्की’चा मार्ग  आहे.

टॅग्स :warयुद्धIranइराणIsraelइस्रायल