शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

विशेष लेख: इराणहून सुटका, भारतीयांसाठी लांबचा वळसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 06:43 IST

iran israel news: इराण आणि इस्त्रायल यांच्यात नव्यानं संघर्ष सुरू झाल्यानंतर त्याचा भारतालाही मोठा फटका बसला.

इराण आणि इस्त्रायल यांच्यात नव्यानं संघर्ष सुरू झाल्यानंतर त्याचा भारतालाही मोठा फटका बसला. विविध कारणांसाठी त्यातही वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी हजारो भारतीय विद्यार्थी इराणला गेले आहेत. त्यांचं भविष्य आता टांगणीला लागलं आहे. इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांची संख्या या घडीला दहा हजार आहे. या विद्यार्थ्यांना सुरक्षित भारतात परत आणणं हे भारतापुढचं सध्या मुख्य आव्हान आहे. 

इराणमधील काही भारतीय विद्यार्थ्यांना परत मायदेशी आणण्यात आलं आहे, पण तरीही अजून बरेच विद्यार्थी इराणमध्येच अडकून पडले आहेत. इराणमधील बहुतांश विमानतळं सध्या बंद आहेत, त्यामुळे या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर इराणमधून कसं बाहेर काढायचं हा भारतापुढे यक्षप्रश्न आहे. रस्तेमार्ग अजून सुरू आहेत, ही त्यातल्या त्यात दिलासादायक गोष्ट. त्यामुळे इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांना रस्ते मार्गानं पहिल्यांदा अर्मेनियामध्ये आणून मग तिथून हवाईमार्गे भारतात आणण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. 

पण मग एवढ्या लांबचा मार्ग भारत सरकारनं का निवडला? दुसरा काही मार्ग नव्हता का? - सध्या तरी नाही. इराणच्या सीमेला लागून सात देश आहेत. त्यात पाकिस्तान, अफगानिस्तान, तुर्कमेनिस्तान, अझरबैजान, अर्मेनिया, तुर्की आणि इराक या देशांचा समावेश आहे. याशिवाय इराणची समुद्री सीमा ओमानला लागून आहे; पण इतके सारे देश असतानाही अर्मेनियाच का? - तर त्यामागची मुख्य कारणं नकारात्मक आहेत.इराणशी भारताचे संबंध चांगले असले तरी थेट इराणमधूनच विद्यार्थ्यांना हवाईमार्गे भारतात आणणं धोक्याचं आहे. कारण इराणमधली बहुसंख्य आंतरराष्ट्रीय उड्डाणं सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद आहेत. शिवाय इस्त्रायलचे इराणवर हवाई हल्ले आणि इराणी विमानांना लक्ष्य करणं सुरूच आहे.

आपला शेजारी देश पाकिस्तानमधून विद्यार्थ्यांना भारतात आणणं तुलनेनं सोपं आहे, पण ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताचे पाकिस्तानशी असलेले संबंध खूपच बिघडलेले आहेत. इराक आणि इराणमधून आजही विस्तव जात नाही. त्यामुळे इराकचा मार्ग आपल्यासाठी सुरक्षित नाही. तुर्की हा पर्याय बरा असला तरी इराणपासून रस्तेमार्गानं तिथपर्यंत पोहोचणं फारच लांब आहे. शिवाय ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर तुर्कीनं भारतावर टीका केली आणि पाकिस्तानला खुलं समर्थन केलं होतं. त्यामुळे तुर्कीचा मार्गही आपल्यासाठी बंद झाला.

शेवटी पर्याय उरतो तो फक्त अर्मेनियाचा. त्यातल्या त्यात अर्मेनियाची सीमा इराणपासून जवळ आहे. अर्मेनिया राजकीयदृष्ट्या स्थिर देश आहे. भारताचे या देशाशी मित्रत्वाचे संबंध आहेत. दोन्ही देशांत सुरक्षा करारही झालेला आहे. इराणबरोबरही त्यांचे चांगले संबंध आहेत. अर्मेनियाची नॉरदूज बॉर्डर सुरक्षित मानली जाते. तिथलं येरेवन एअरपोर्टही व्यवस्थित सुरू आहे. तिथून विद्यार्थ्यांना हवाईमार्गे भारतात आणणं जास्त सुरक्षित आहे.

इस्त्रायलनं नुकतंच इराणच्या नागरिकांनाही इशारा दिला आहे की इराणची राजधानी तेहरान आणि लष्करीदृष्ट्या संवेदनशील भागात जे नागरिक राहतात, त्यांनी तातडीनं तिथून निघून जावं. कारण त्यांना धोका होऊ शकतो. त्यामुळे भारतीय विद्या‌र्थ्यांच्या सुटकेसाठी सध्या अर्मेनिया हाच ‘खुष्की’चा मार्ग  आहे.

टॅग्स :warयुद्धIranइराणIsraelइस्रायल