शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: इराणहून सुटका, भारतीयांसाठी लांबचा वळसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 06:43 IST

iran israel news: इराण आणि इस्त्रायल यांच्यात नव्यानं संघर्ष सुरू झाल्यानंतर त्याचा भारतालाही मोठा फटका बसला.

इराण आणि इस्त्रायल यांच्यात नव्यानं संघर्ष सुरू झाल्यानंतर त्याचा भारतालाही मोठा फटका बसला. विविध कारणांसाठी त्यातही वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी हजारो भारतीय विद्यार्थी इराणला गेले आहेत. त्यांचं भविष्य आता टांगणीला लागलं आहे. इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांची संख्या या घडीला दहा हजार आहे. या विद्यार्थ्यांना सुरक्षित भारतात परत आणणं हे भारतापुढचं सध्या मुख्य आव्हान आहे. 

इराणमधील काही भारतीय विद्यार्थ्यांना परत मायदेशी आणण्यात आलं आहे, पण तरीही अजून बरेच विद्यार्थी इराणमध्येच अडकून पडले आहेत. इराणमधील बहुतांश विमानतळं सध्या बंद आहेत, त्यामुळे या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर इराणमधून कसं बाहेर काढायचं हा भारतापुढे यक्षप्रश्न आहे. रस्तेमार्ग अजून सुरू आहेत, ही त्यातल्या त्यात दिलासादायक गोष्ट. त्यामुळे इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांना रस्ते मार्गानं पहिल्यांदा अर्मेनियामध्ये आणून मग तिथून हवाईमार्गे भारतात आणण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. 

पण मग एवढ्या लांबचा मार्ग भारत सरकारनं का निवडला? दुसरा काही मार्ग नव्हता का? - सध्या तरी नाही. इराणच्या सीमेला लागून सात देश आहेत. त्यात पाकिस्तान, अफगानिस्तान, तुर्कमेनिस्तान, अझरबैजान, अर्मेनिया, तुर्की आणि इराक या देशांचा समावेश आहे. याशिवाय इराणची समुद्री सीमा ओमानला लागून आहे; पण इतके सारे देश असतानाही अर्मेनियाच का? - तर त्यामागची मुख्य कारणं नकारात्मक आहेत.इराणशी भारताचे संबंध चांगले असले तरी थेट इराणमधूनच विद्यार्थ्यांना हवाईमार्गे भारतात आणणं धोक्याचं आहे. कारण इराणमधली बहुसंख्य आंतरराष्ट्रीय उड्डाणं सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद आहेत. शिवाय इस्त्रायलचे इराणवर हवाई हल्ले आणि इराणी विमानांना लक्ष्य करणं सुरूच आहे.

आपला शेजारी देश पाकिस्तानमधून विद्यार्थ्यांना भारतात आणणं तुलनेनं सोपं आहे, पण ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताचे पाकिस्तानशी असलेले संबंध खूपच बिघडलेले आहेत. इराक आणि इराणमधून आजही विस्तव जात नाही. त्यामुळे इराकचा मार्ग आपल्यासाठी सुरक्षित नाही. तुर्की हा पर्याय बरा असला तरी इराणपासून रस्तेमार्गानं तिथपर्यंत पोहोचणं फारच लांब आहे. शिवाय ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर तुर्कीनं भारतावर टीका केली आणि पाकिस्तानला खुलं समर्थन केलं होतं. त्यामुळे तुर्कीचा मार्गही आपल्यासाठी बंद झाला.

शेवटी पर्याय उरतो तो फक्त अर्मेनियाचा. त्यातल्या त्यात अर्मेनियाची सीमा इराणपासून जवळ आहे. अर्मेनिया राजकीयदृष्ट्या स्थिर देश आहे. भारताचे या देशाशी मित्रत्वाचे संबंध आहेत. दोन्ही देशांत सुरक्षा करारही झालेला आहे. इराणबरोबरही त्यांचे चांगले संबंध आहेत. अर्मेनियाची नॉरदूज बॉर्डर सुरक्षित मानली जाते. तिथलं येरेवन एअरपोर्टही व्यवस्थित सुरू आहे. तिथून विद्यार्थ्यांना हवाईमार्गे भारतात आणणं जास्त सुरक्षित आहे.

इस्त्रायलनं नुकतंच इराणच्या नागरिकांनाही इशारा दिला आहे की इराणची राजधानी तेहरान आणि लष्करीदृष्ट्या संवेदनशील भागात जे नागरिक राहतात, त्यांनी तातडीनं तिथून निघून जावं. कारण त्यांना धोका होऊ शकतो. त्यामुळे भारतीय विद्या‌र्थ्यांच्या सुटकेसाठी सध्या अर्मेनिया हाच ‘खुष्की’चा मार्ग  आहे.

टॅग्स :warयुद्धIranइराणIsraelइस्रायल