शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

लोकांची आवड बरोबर हेरली! ४ लाखात सुरू केला व्यवसाय; आज ३०० कोटींचा पल्ला गाठला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 13:49 IST

कामत यांनी गरम आणि मसालेदार रेसिपीनंतर ग्राहकांना काही थंड खाऊ घालण्याचा निर्णय घेतला आणि ही आयडिया लोकांना आवडली.

नवी दिल्ली - तुम्ही काही लोकांचे अजब कॉम्बिनेशन ऐकले असेल. काहींना चहासोबत मिठाई खाणे, जेलीसोबत बर्गर खाणे पसंत आहे. मुंबई महाराष्ट्राच्या अनेक भागात पावभाजीसोबत कदाचितच कुणाला आईस्क्रीम विकताना पाहिले असेल. १९८४ मध्ये मुंबईतील रघुनंदन कामत यांनी सुरुवात केली. भारतातील लोकांना मिठाईचे किती वेड आहे हे कामत यांना ठाऊक होते. लोकांना जेवल्यानंतर गोड पदार्थ खायला आवडतात यातूनच कामत यांना आयडिया सुचली. 

कामत यांनी गरम आणि मसालेदार रेसिपीनंतर ग्राहकांना काही थंड खाऊ घालण्याचा निर्णय घेतला आणि ही आयडिया लोकांना आवडली. कामत यांनी जुहू कोळीवाडा परिसरात २०० स्क्वेअर फूटात छोटेसे दुकान उघडले आणि पहिल्या वर्षी ५ लाखाचा व्यवसाय केला. १ वर्षानंतर त्यांनी आईस्क्रिमचा ब्रँड बनवण्यासाठी पावभाजी विक्री करणे बंद केले. कामत यांनी विविध स्वादिष्ट फळांनी बनलेली आईस्क्रीम विकण्याचा निर्णय घेतला. त्यात कस्टर्ड, काजू किसमिस, आंबा, चॉकलेट आणि स्ट्रॉबेरीसारख्या चवीचा समावेश होता. 

२०२१ पर्यंत नॅच्युरल हा आईस्क्रीम ब्रँड देशाच्या विविध शहरात जवळपास १३५ आऊटलेटपर्यंत पसरला. आता कामत यांची कंपनी नॅच्युरलमध्ये २० पेक्षा अधिक फ्लेवरमध्ये आईस्क्रिम विक्री करत आहे. २०२० मध्ये नॅच्युरल आईस्क्रिमने जवळपास ३०० कोटींचा पल्ला पार केला. ग्राहकांची पसंती बनलेल्या नॅच्युरल आईस्क्रिम ब्रँड हा भारतातील टॉप १० बँडपैकी एक आहे. 

कामत यांनी नॅच्युरल आईस्क्रिम प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आजूबाजूच्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक पाहिल्या. त्यात चांगल्या प्रतीची फळे वापरली, आईच्या बुद्धीचा वापर करत ग्राहकांच्या प्रतिक्रिया गांभीर्याने घेतल्या. कामत यांच्या या प्रयत्नांमुळे नॅच्युरल आईस्क्रीमने ग्राहकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. १२५ कर्मचाऱ्यांची क्षमता असलेले नॅच्युरल आईस्क्रीम दररोज २० टन आइस्क्रीम तयार करते. मूळचे कर्नाटकचे, कामत सात भावंडांमध्ये सर्वात लहान होते. त्याची आई गृहिणी होती आणि वडील फळे विकायचे. ८ जणांच्या कुटुंबाने त्यांच्या १ एकर जमिनीवर एकदा फळांची लागवड करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी झाला नाही. कामत यांनी शिक्षण घेतले नाही. वडिलांना फळे विकण्याच्या व्यवसायात मदत करत असल्याने शाळेतील अभ्यासापासून दूर राहिले. वडिलांसोबत शेतात आणि बाजारात फळांच्या कामामुळे कामत यांना फळांची विशेष माहिती मिळाली. कामत १४ वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब मुंबईत आले.

बोर्डाच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर कामत यांना मोठ्या भावासोबत काम करण्यास सांगण्यात आले. मोठ्या भावाच्या गोकुळ रिफ्रेशमेंटमध्ये काही दिवस काम केल्यानंतर सर्व भाऊ वेगळे झाले आणि कामत यांना रेस्टॉरंटचा एक भाग मिळाला. कामत यांनी ३.५ लाखांच्या भांडवलाने सुरू केलेले नॅच्युरल आईस्क्रीम हे बाजारातील इतर आइस्क्रीमपेक्षा वेगळे होते. त्यातील नैसर्गिक फळ आणि चवीमुळे कामत यांनी पहिल्या सुट्टीतच १००० कप आइस्क्रीम विकले.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी