शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लोकांची आवड बरोबर हेरली! ४ लाखात सुरू केला व्यवसाय; आज ३०० कोटींचा पल्ला गाठला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 13:49 IST

कामत यांनी गरम आणि मसालेदार रेसिपीनंतर ग्राहकांना काही थंड खाऊ घालण्याचा निर्णय घेतला आणि ही आयडिया लोकांना आवडली.

नवी दिल्ली - तुम्ही काही लोकांचे अजब कॉम्बिनेशन ऐकले असेल. काहींना चहासोबत मिठाई खाणे, जेलीसोबत बर्गर खाणे पसंत आहे. मुंबई महाराष्ट्राच्या अनेक भागात पावभाजीसोबत कदाचितच कुणाला आईस्क्रीम विकताना पाहिले असेल. १९८४ मध्ये मुंबईतील रघुनंदन कामत यांनी सुरुवात केली. भारतातील लोकांना मिठाईचे किती वेड आहे हे कामत यांना ठाऊक होते. लोकांना जेवल्यानंतर गोड पदार्थ खायला आवडतात यातूनच कामत यांना आयडिया सुचली. 

कामत यांनी गरम आणि मसालेदार रेसिपीनंतर ग्राहकांना काही थंड खाऊ घालण्याचा निर्णय घेतला आणि ही आयडिया लोकांना आवडली. कामत यांनी जुहू कोळीवाडा परिसरात २०० स्क्वेअर फूटात छोटेसे दुकान उघडले आणि पहिल्या वर्षी ५ लाखाचा व्यवसाय केला. १ वर्षानंतर त्यांनी आईस्क्रिमचा ब्रँड बनवण्यासाठी पावभाजी विक्री करणे बंद केले. कामत यांनी विविध स्वादिष्ट फळांनी बनलेली आईस्क्रीम विकण्याचा निर्णय घेतला. त्यात कस्टर्ड, काजू किसमिस, आंबा, चॉकलेट आणि स्ट्रॉबेरीसारख्या चवीचा समावेश होता. 

२०२१ पर्यंत नॅच्युरल हा आईस्क्रीम ब्रँड देशाच्या विविध शहरात जवळपास १३५ आऊटलेटपर्यंत पसरला. आता कामत यांची कंपनी नॅच्युरलमध्ये २० पेक्षा अधिक फ्लेवरमध्ये आईस्क्रिम विक्री करत आहे. २०२० मध्ये नॅच्युरल आईस्क्रिमने जवळपास ३०० कोटींचा पल्ला पार केला. ग्राहकांची पसंती बनलेल्या नॅच्युरल आईस्क्रिम ब्रँड हा भारतातील टॉप १० बँडपैकी एक आहे. 

कामत यांनी नॅच्युरल आईस्क्रिम प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आजूबाजूच्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक पाहिल्या. त्यात चांगल्या प्रतीची फळे वापरली, आईच्या बुद्धीचा वापर करत ग्राहकांच्या प्रतिक्रिया गांभीर्याने घेतल्या. कामत यांच्या या प्रयत्नांमुळे नॅच्युरल आईस्क्रीमने ग्राहकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. १२५ कर्मचाऱ्यांची क्षमता असलेले नॅच्युरल आईस्क्रीम दररोज २० टन आइस्क्रीम तयार करते. मूळचे कर्नाटकचे, कामत सात भावंडांमध्ये सर्वात लहान होते. त्याची आई गृहिणी होती आणि वडील फळे विकायचे. ८ जणांच्या कुटुंबाने त्यांच्या १ एकर जमिनीवर एकदा फळांची लागवड करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी झाला नाही. कामत यांनी शिक्षण घेतले नाही. वडिलांना फळे विकण्याच्या व्यवसायात मदत करत असल्याने शाळेतील अभ्यासापासून दूर राहिले. वडिलांसोबत शेतात आणि बाजारात फळांच्या कामामुळे कामत यांना फळांची विशेष माहिती मिळाली. कामत १४ वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब मुंबईत आले.

बोर्डाच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर कामत यांना मोठ्या भावासोबत काम करण्यास सांगण्यात आले. मोठ्या भावाच्या गोकुळ रिफ्रेशमेंटमध्ये काही दिवस काम केल्यानंतर सर्व भाऊ वेगळे झाले आणि कामत यांना रेस्टॉरंटचा एक भाग मिळाला. कामत यांनी ३.५ लाखांच्या भांडवलाने सुरू केलेले नॅच्युरल आईस्क्रीम हे बाजारातील इतर आइस्क्रीमपेक्षा वेगळे होते. त्यातील नैसर्गिक फळ आणि चवीमुळे कामत यांनी पहिल्या सुट्टीतच १००० कप आइस्क्रीम विकले.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी