शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

लोकांची आवड बरोबर हेरली! ४ लाखात सुरू केला व्यवसाय; आज ३०० कोटींचा पल्ला गाठला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 13:49 IST

कामत यांनी गरम आणि मसालेदार रेसिपीनंतर ग्राहकांना काही थंड खाऊ घालण्याचा निर्णय घेतला आणि ही आयडिया लोकांना आवडली.

नवी दिल्ली - तुम्ही काही लोकांचे अजब कॉम्बिनेशन ऐकले असेल. काहींना चहासोबत मिठाई खाणे, जेलीसोबत बर्गर खाणे पसंत आहे. मुंबई महाराष्ट्राच्या अनेक भागात पावभाजीसोबत कदाचितच कुणाला आईस्क्रीम विकताना पाहिले असेल. १९८४ मध्ये मुंबईतील रघुनंदन कामत यांनी सुरुवात केली. भारतातील लोकांना मिठाईचे किती वेड आहे हे कामत यांना ठाऊक होते. लोकांना जेवल्यानंतर गोड पदार्थ खायला आवडतात यातूनच कामत यांना आयडिया सुचली. 

कामत यांनी गरम आणि मसालेदार रेसिपीनंतर ग्राहकांना काही थंड खाऊ घालण्याचा निर्णय घेतला आणि ही आयडिया लोकांना आवडली. कामत यांनी जुहू कोळीवाडा परिसरात २०० स्क्वेअर फूटात छोटेसे दुकान उघडले आणि पहिल्या वर्षी ५ लाखाचा व्यवसाय केला. १ वर्षानंतर त्यांनी आईस्क्रिमचा ब्रँड बनवण्यासाठी पावभाजी विक्री करणे बंद केले. कामत यांनी विविध स्वादिष्ट फळांनी बनलेली आईस्क्रीम विकण्याचा निर्णय घेतला. त्यात कस्टर्ड, काजू किसमिस, आंबा, चॉकलेट आणि स्ट्रॉबेरीसारख्या चवीचा समावेश होता. 

२०२१ पर्यंत नॅच्युरल हा आईस्क्रीम ब्रँड देशाच्या विविध शहरात जवळपास १३५ आऊटलेटपर्यंत पसरला. आता कामत यांची कंपनी नॅच्युरलमध्ये २० पेक्षा अधिक फ्लेवरमध्ये आईस्क्रिम विक्री करत आहे. २०२० मध्ये नॅच्युरल आईस्क्रिमने जवळपास ३०० कोटींचा पल्ला पार केला. ग्राहकांची पसंती बनलेल्या नॅच्युरल आईस्क्रिम ब्रँड हा भारतातील टॉप १० बँडपैकी एक आहे. 

कामत यांनी नॅच्युरल आईस्क्रिम प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आजूबाजूच्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक पाहिल्या. त्यात चांगल्या प्रतीची फळे वापरली, आईच्या बुद्धीचा वापर करत ग्राहकांच्या प्रतिक्रिया गांभीर्याने घेतल्या. कामत यांच्या या प्रयत्नांमुळे नॅच्युरल आईस्क्रीमने ग्राहकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. १२५ कर्मचाऱ्यांची क्षमता असलेले नॅच्युरल आईस्क्रीम दररोज २० टन आइस्क्रीम तयार करते. मूळचे कर्नाटकचे, कामत सात भावंडांमध्ये सर्वात लहान होते. त्याची आई गृहिणी होती आणि वडील फळे विकायचे. ८ जणांच्या कुटुंबाने त्यांच्या १ एकर जमिनीवर एकदा फळांची लागवड करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी झाला नाही. कामत यांनी शिक्षण घेतले नाही. वडिलांना फळे विकण्याच्या व्यवसायात मदत करत असल्याने शाळेतील अभ्यासापासून दूर राहिले. वडिलांसोबत शेतात आणि बाजारात फळांच्या कामामुळे कामत यांना फळांची विशेष माहिती मिळाली. कामत १४ वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब मुंबईत आले.

बोर्डाच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर कामत यांना मोठ्या भावासोबत काम करण्यास सांगण्यात आले. मोठ्या भावाच्या गोकुळ रिफ्रेशमेंटमध्ये काही दिवस काम केल्यानंतर सर्व भाऊ वेगळे झाले आणि कामत यांना रेस्टॉरंटचा एक भाग मिळाला. कामत यांनी ३.५ लाखांच्या भांडवलाने सुरू केलेले नॅच्युरल आईस्क्रीम हे बाजारातील इतर आइस्क्रीमपेक्षा वेगळे होते. त्यातील नैसर्गिक फळ आणि चवीमुळे कामत यांनी पहिल्या सुट्टीतच १००० कप आइस्क्रीम विकले.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी