शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

भारत-पाकिस्तानला संयुक्त जेतेपद, पण मनप्रीतने राखला चषक आपल्याकडेच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 08:47 IST

भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघांत होणारी आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेच्या जेतेपदाची लढत पावसामुळे रद्द करण्यात आली.

ठळक मुद्देभारत आणि पाकिस्तान यांनी प्रत्येकी तीनवेळा आशियाई अजिंक्यपद जिंकण्याचा मान पटकावला आहे.

ओमान: भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघांत होणारी आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेच्या जेतेपदाची लढत पावसामुळे रद्द करण्यात आली. दीड तासाहून अधिक काळ प्रतीक्षा पाहूनही पावसाचा जोर कायम राहिल्याने दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. मात्र, मनप्रीत सिंगने मोठ्या चतुराईने जेतेपदाचा चषक आपल्याकडेच राहिल याची काळजी घेतली. त्याच्या या स्मार्ट खेळीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. भारत आणि पाकिस्तान यांनी तिसऱ्यांदा आशियाई अजिंक्यपद स्पर्धा नावावर केली. भारताने २०११ आणि २०१६ साली पाकिस्तानला नमवून जेतेपदाचा मान पटकावला होता. पाकिस्तानने २०१२ व २०१३ मध्ये बाजी मारली होती. त्यामुळे हा चषक सर्वाधिकवेळा कोण जिंकेल याची उत्सुकता होती, परंतु पावसाने त्यावर पाणी फिरवून चाहत्यांचा हिरमोड केला. आशियाई हॉकी महासंघाने दोन्ही संघाना संयुक्त विजेता घोषित केले. मात्र मनप्रीतच्या एका कामगिरीने जेतेपदाचा चषक भारताकडेच राहिला. चषकासोबत दोन्ही संघ फोटो काढण्यासाठी मैदानावर आले त्यावेळी मनदीप आणि मनप्रीत यांनी चषकाभवती ठाण मांडला.. मनप्रीतने पाकिस्तान संघाच्या चमूत जात चषका शेजारील जागा पटकावली. चषकाभवती भारताचेच खेळाडू दिसत होती आ त्यामुळे नेटिझन्सने मनप्रीतचे कौतुक केले.

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारत