शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
3
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
4
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
5
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
6
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
7
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
8
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
9
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
10
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
12
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
13
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
14
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
15
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
16
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
17
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
18
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
19
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
20
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल

महावितरणची कामे कासवगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:40 AM

जिल्ह्यात नागरी वस्त्यांमध्ये सुरळीत व दर्जेदार विजसेवेसाठी ५२ कोटी रुपयांची कामे एकात्मिक वीज विकास व दीनदयाल उपाध्याय नागरी ग्रामज्योती योजनेत सुरू आहेत. मात्र दहा महिन्यांनंतरही यातील कामे २५ टक्केही पूर्ण झाली नसल्याने पंचाईत झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात नागरी वस्त्यांमध्ये सुरळीत व दर्जेदार विजसेवेसाठी ५२ कोटी रुपयांची कामे एकात्मिक वीज विकास व दीनदयाल उपाध्याय नागरी ग्रामज्योती योजनेत सुरू आहेत. मात्र दहा महिन्यांनंतरही यातील कामे २५ टक्केही पूर्ण झाली नसल्याने पंचाईत झाली आहे.हिंगोली जिल्ह्यात महावितरणमार्फत दरवर्षी कोट्यवधींची कामे केली जात आहेत. मात्र या सर्व कामांवर नांदेड येथील इन्फ्राच्या अधीक्षक अभियंत्यांकडून नियंत्रण ठेवण्यात येते. स्थानिक ठिकाणी त्यांचे अतिशय तोकडे मनुष्यबळ आहे. या मनुष्यबळाला प्रस्ताव तयार करणे व त्याच्या अंमलबजावणीतील कागदी घोडे नाचविणे यापलिकडे सवडही मिळत नाही. तर नांदेड येथील यंत्रणा कधीतरीच या कामांच्या तपासणीला येते. त्यामुळे कंत्राटदारांच्याच भरवशावर ही कामे होतात. यापूर्वी इन्फ्राच्या कामांमध्ये अनेक गावांतील रोहित्रच गायब असल्याचे समोर आले होते. शिवाय अनेक गावांतील वीजवाहिन्याच अजूनही ओढलेल्या नाहीत. एका गावाचे नाव सांगून दुस-याच गावात कामे केल्याचेही प्रकार घडले. यात सबकंत्राटदारांनीही मोठी करामत दाखविली होती. मात्र महावितरणने तरीही कोणताच बोध घेतला नाही. आता श्रावण इलेक्ट्रिक या कंत्राटदारामार्फत ही कामे केली जात आहेत. मात्र या कामांना गतीच नाही. खुद्द जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी या कामांसाठी अनेकदा सूचना दिल्या आहेत. ६ जानेवारी २0१७ रोजी यासाठी निविदा निघाल्या होत्या. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात कार्यारंभ आदेश देण्यात आले. मात्र आता दहा महिन्यांनंतर शहरात काही ठिकाणी डीपीचे फ्युजबॉक्स, किरकोळ दुरुस्तीचीच कामे झाल्याचे दिसत आहे. ही कामेही सर्वच भागात पूर्ण झाली नाहीत. अनेक ठिकाणी खांब सरळ करणे, बदलणे, तारा बदलणे या कामांची सुरुवातही झाली नाही. ही योजना कार्यान्वित झाल्यास शहरात भूमिगत वीजवाहिन्याचे काम होणार आहे. मात्र या योजनेचाच पत्ता नाही.