शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

चंद्रयान, राममंदिराचा मुद्दा समोर आणतील; सत्तेसाठी भाजप दंगली घडवेल: उद्धव ठाकरेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 18:35 IST

'सध्या जनतेच्या पैशांवर सरकार आपल्या दारी अन् थापा मारतय लय भारी अशी परिस्थिती सुरू आहे.'

विजय पाटील

हिंगोली : आगामी काळात सत्तेसाठी चंद्रयान, राममंदिराचा मुद्दा समोर आणतील, मंदिराच्या कार्यक्रमाला लोकांना नेऊन दंगली घडवतील, असे भाजपचेच सत्यपाल मलिक व खा. महुआ मोईत्रा यांनी म्हटले. निवडणुकांसाठीच पुलवामा घडला होता, तेव्हा सावध राहा, असे प्रतिपादन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंगोली येथील सभेत केले.

या सभेत ठाकरे यांनी केंद्र सरकारवर तसेच भाजपवर सडकून टीका केली. भाजपचे हिंदुत्व दुतोंडी असल्याचा आरोपही केला. तर माझ्या वडिलांनी मला असे हिंदुत्व शिकविले नसल्याचे ते म्हणाले. तर आता हा लढा मोदीविरोधी नाही, तर लोकशाहीप्रेमी व लोकशाहीविरोधी असा आहे. घटना वाचविण्यासाठी हा लढा आहे. गावागावांत भगवा घेऊन या विचारांची मशाल पेटवा, असे आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना केले.

सध्या जनतेच्या पैशांवर सरकार आपल्या दारी अन् थापा मारतय लय भारी अशी परिस्थिती सुरू आहे. शेजारच्या जिल्ह्यात ते हा कार्यक्रम घेत आहेत. केंद्रातील असो वा राज्यातील सरकार केवळ ‘सबको लाथ आणि दोस्तों का विकास’ हेच धोरण राबवत असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली.ठाकरे म्हणाले, ‘भाजप सबका साथ, सबका विकास’ म्हणत जनतेसमोर येते. मात्र, नंतर फक्त आपल्या दोस्तांचा विकास करते. त्यामुळे ९ वर्षांत जनता कुठे आहे अन् दोस्त जगात दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ही दोस्तशाही गाडल्याशिवाय गप्प बसणार नाही. काही बाहेरची मंडळी किसान सरकार म्हणून भाजपची सुपारी घेऊन आली आहे. त्यांनी आपलेच घर सांभाळावे. त्यांच्याच बुडाखाली सुरूंग लागलाय. त्यांनी लोकशाहीप्रेमी असल्यास इंडियात यावे अन्यथा थेट भाजपसोबत तरी जावे, असेही ते म्हणाले.

मी सत्तेवर असल्याच्या अडीच वर्षांत अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले. उद्योगही यायला तयार होते. मात्र, नंतर गद्दारांचे सरकार आले. त्यांनी उद्योग गुजरातला पाठविले. राज्य व केंद्र सरकार शेतकरी हिताचे तेवढे चिरडून टाकत आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव व ग्राहकांनाही योग्य भावात मिळवून देणे सरकारचे काम. मात्र, सरकारने कांदा उत्पादकांना जसे छळले तीच गत इतर मालांचीही आहे.    भाजपचे निष्ठेने काम करणाऱ्यांची सतरंजी झाली असून बाहेरून येणारे त्यांच्या छातीवर बसले. त्यांची दया येते. चांगले नेते तयार करण्याची ताकद भाजपमध्ये नाही. त्यांना नेते, कार्यकर्ते चोरावे लागतात. दिल्लीच्या वडिलांची किंमत राहिली नाही म्हणून माझे वडील चोरावे लागतात. इतर पक्षांतून नेते मागविणार असाल तर ही नामर्दानगी आहे, अशी जहरी टीका केली.

..तर मोदी घमेंडिए

आम्ही इंडिया म्हटले तर पंतप्रधान मोदी घमेंडिया म्हणतात. मग ते घमेंडिए आहेत. आधी हे महेबुबा मुफ्तीसमवेत बसले अन् आमच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित करतात. आमची तुलना इंडियन मुजाहिद्दीनशी करतात. ते आमच्या अगोदरचे आहेत. मग आफ्रिकेत ते भारताचे प्रतिनिधी म्हणून गेले होते की, इंडियन मुजाहिद्दीनचे? असा सवाल केला.  

फडतूस, कलंक, थापाड्या म्हणणार नाहीमी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलायचे सोडून दिले. फडतूस, कलंक, थापड्या असे काही म्हणणार नाही, असे ठाकरे म्हणाले. त्यानंतर टरबूज, टरबूज.. अशी घोषणाबाजी मंडपातून सुरू झाली तेव्हा त्यालाही पाणी लागते, ही मंडळी दुष्काळाकडे दुर्लक्ष करत असल्याची कोपरखळी मारली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस