शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रयान, राममंदिराचा मुद्दा समोर आणतील; सत्तेसाठी भाजप दंगली घडवेल: उद्धव ठाकरेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 18:35 IST

'सध्या जनतेच्या पैशांवर सरकार आपल्या दारी अन् थापा मारतय लय भारी अशी परिस्थिती सुरू आहे.'

विजय पाटील

हिंगोली : आगामी काळात सत्तेसाठी चंद्रयान, राममंदिराचा मुद्दा समोर आणतील, मंदिराच्या कार्यक्रमाला लोकांना नेऊन दंगली घडवतील, असे भाजपचेच सत्यपाल मलिक व खा. महुआ मोईत्रा यांनी म्हटले. निवडणुकांसाठीच पुलवामा घडला होता, तेव्हा सावध राहा, असे प्रतिपादन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंगोली येथील सभेत केले.

या सभेत ठाकरे यांनी केंद्र सरकारवर तसेच भाजपवर सडकून टीका केली. भाजपचे हिंदुत्व दुतोंडी असल्याचा आरोपही केला. तर माझ्या वडिलांनी मला असे हिंदुत्व शिकविले नसल्याचे ते म्हणाले. तर आता हा लढा मोदीविरोधी नाही, तर लोकशाहीप्रेमी व लोकशाहीविरोधी असा आहे. घटना वाचविण्यासाठी हा लढा आहे. गावागावांत भगवा घेऊन या विचारांची मशाल पेटवा, असे आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना केले.

सध्या जनतेच्या पैशांवर सरकार आपल्या दारी अन् थापा मारतय लय भारी अशी परिस्थिती सुरू आहे. शेजारच्या जिल्ह्यात ते हा कार्यक्रम घेत आहेत. केंद्रातील असो वा राज्यातील सरकार केवळ ‘सबको लाथ आणि दोस्तों का विकास’ हेच धोरण राबवत असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली.ठाकरे म्हणाले, ‘भाजप सबका साथ, सबका विकास’ म्हणत जनतेसमोर येते. मात्र, नंतर फक्त आपल्या दोस्तांचा विकास करते. त्यामुळे ९ वर्षांत जनता कुठे आहे अन् दोस्त जगात दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ही दोस्तशाही गाडल्याशिवाय गप्प बसणार नाही. काही बाहेरची मंडळी किसान सरकार म्हणून भाजपची सुपारी घेऊन आली आहे. त्यांनी आपलेच घर सांभाळावे. त्यांच्याच बुडाखाली सुरूंग लागलाय. त्यांनी लोकशाहीप्रेमी असल्यास इंडियात यावे अन्यथा थेट भाजपसोबत तरी जावे, असेही ते म्हणाले.

मी सत्तेवर असल्याच्या अडीच वर्षांत अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले. उद्योगही यायला तयार होते. मात्र, नंतर गद्दारांचे सरकार आले. त्यांनी उद्योग गुजरातला पाठविले. राज्य व केंद्र सरकार शेतकरी हिताचे तेवढे चिरडून टाकत आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव व ग्राहकांनाही योग्य भावात मिळवून देणे सरकारचे काम. मात्र, सरकारने कांदा उत्पादकांना जसे छळले तीच गत इतर मालांचीही आहे.    भाजपचे निष्ठेने काम करणाऱ्यांची सतरंजी झाली असून बाहेरून येणारे त्यांच्या छातीवर बसले. त्यांची दया येते. चांगले नेते तयार करण्याची ताकद भाजपमध्ये नाही. त्यांना नेते, कार्यकर्ते चोरावे लागतात. दिल्लीच्या वडिलांची किंमत राहिली नाही म्हणून माझे वडील चोरावे लागतात. इतर पक्षांतून नेते मागविणार असाल तर ही नामर्दानगी आहे, अशी जहरी टीका केली.

..तर मोदी घमेंडिए

आम्ही इंडिया म्हटले तर पंतप्रधान मोदी घमेंडिया म्हणतात. मग ते घमेंडिए आहेत. आधी हे महेबुबा मुफ्तीसमवेत बसले अन् आमच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित करतात. आमची तुलना इंडियन मुजाहिद्दीनशी करतात. ते आमच्या अगोदरचे आहेत. मग आफ्रिकेत ते भारताचे प्रतिनिधी म्हणून गेले होते की, इंडियन मुजाहिद्दीनचे? असा सवाल केला.  

फडतूस, कलंक, थापाड्या म्हणणार नाहीमी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलायचे सोडून दिले. फडतूस, कलंक, थापड्या असे काही म्हणणार नाही, असे ठाकरे म्हणाले. त्यानंतर टरबूज, टरबूज.. अशी घोषणाबाजी मंडपातून सुरू झाली तेव्हा त्यालाही पाणी लागते, ही मंडळी दुष्काळाकडे दुर्लक्ष करत असल्याची कोपरखळी मारली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस