शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

कापूस राखण्यास शेतात गेला होता शेतकरी; सकाळी रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 16:52 IST

जांभरून शेतशिवारात शेतकऱ्याचा निर्घृणपणे खून केल्याची घटना उघडकीस आली आहे

कळमनुरी (जि. हिंगोली): तालुक्यातील वारंगा मसाई येथील एका शेतकऱ्याचा जांभरून शिवारातील शेतातील आखाड्यावर धारधार शस्त्राने वार करून खून झाला. ही घटना १२ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. परंतु खुनाचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.

कळमनुरी तालुक्यातील वारंगा मसाई येथील साहेबराव नागोजी गिराम (वय ६२) यांचे जांभरून शिवारात शेती असून सध्या शेतात कापसाचे पीक आहे. शेतातील कापूस वेचणी करून ठेवल्यामुळे ते ११ नोव्हेंबर रोजी रात्री जेवण करून शेतात झोपण्यासाठी गेले होते. दरम्यान, १२ नोव्हेंबर रोजी त्यांचा मुलगा शेतात गेला असताना साहेबराव गिराम हे बाजेवर रक्ताच्या थारोळ्यात त्याला पडलेले दिसून आले. सदर घटनेमुळे घाबरलेल्या मुलाने आरडाओरड केली. या घटनेची माहिती तातडीने घरी व गावात सांगितली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उप अधीक्षक भुसारे, पोलिस निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत भिंगारे, जमादार एस. पी. सांगळे, प्रशांत शिंदे, गजानन होळकर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे आदींनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी श्वानपथकालाही बोलावण्यात आले होते. त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला होता. घटनास्थळी पोलिस अधीक्षक व अप्पर पोलिस अधीक्षकांनी भेट दिली. मयत साहेबराव गिराम यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी