शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
3
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
4
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
5
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
6
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
7
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
8
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
9
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
10
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
11
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
12
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
13
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
14
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
15
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
16
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
17
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
18
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
19
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
20
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला

कापूस राखण्यास शेतात गेला होता शेतकरी; सकाळी रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 16:52 IST

जांभरून शेतशिवारात शेतकऱ्याचा निर्घृणपणे खून केल्याची घटना उघडकीस आली आहे

कळमनुरी (जि. हिंगोली): तालुक्यातील वारंगा मसाई येथील एका शेतकऱ्याचा जांभरून शिवारातील शेतातील आखाड्यावर धारधार शस्त्राने वार करून खून झाला. ही घटना १२ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. परंतु खुनाचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.

कळमनुरी तालुक्यातील वारंगा मसाई येथील साहेबराव नागोजी गिराम (वय ६२) यांचे जांभरून शिवारात शेती असून सध्या शेतात कापसाचे पीक आहे. शेतातील कापूस वेचणी करून ठेवल्यामुळे ते ११ नोव्हेंबर रोजी रात्री जेवण करून शेतात झोपण्यासाठी गेले होते. दरम्यान, १२ नोव्हेंबर रोजी त्यांचा मुलगा शेतात गेला असताना साहेबराव गिराम हे बाजेवर रक्ताच्या थारोळ्यात त्याला पडलेले दिसून आले. सदर घटनेमुळे घाबरलेल्या मुलाने आरडाओरड केली. या घटनेची माहिती तातडीने घरी व गावात सांगितली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उप अधीक्षक भुसारे, पोलिस निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत भिंगारे, जमादार एस. पी. सांगळे, प्रशांत शिंदे, गजानन होळकर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे आदींनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी श्वानपथकालाही बोलावण्यात आले होते. त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला होता. घटनास्थळी पोलिस अधीक्षक व अप्पर पोलिस अधीक्षकांनी भेट दिली. मयत साहेबराव गिराम यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी