शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

हिंगोली जिल्ह्यात ‘थकीत वीजबिल’ धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 11:58 PM

महावितरणने थकीत वीजबिल न भरणा-या ग्राहकांच्या वीज जोडण्या तोडण्याचा निर्णय घेतला असून गुरूवारपासून जिल्हाभरात मोहीम सुरू केली आहे. माहे एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ पर्यंत ज्यांनी बिल भरणा केला नाही, त्यांचा वीजपुरवठा खंडीत केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देबिल न भरणा-यांची वीज तोडणार

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महावितरणने थकीत वीजबिल न भरणा-या ग्राहकांच्या वीज जोडण्या तोडण्याचा निर्णय घेतला असून गुरूवारपासून जिल्हाभरात मोहीम सुरू केली आहे. माहे एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ पर्यंत ज्यांनी बिल भरणा केला नाही, त्यांचा वीजपुरवठा खंडीत केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.थकीत बिल न भरणा-या ग्राहकांची थेट वीज तोडली जाणार असून शासकीय कामात अडथळा करणा-यांवर महावितरणकडून गुन्हा दाखल केला जाणार आहे. संबंधित तालुक्याच्या वीज अधिकारी व कर्मचा-यांना सदर मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या शेतक-यांनी ३ हजार रूपये हप्ता भरणा केला नाही, त्यांचीही वीज जोडणी तोडली जाणार आहे. त्यामुळे शेतक-यांनी महावितरणने ठरवून दिलेला हप्ता न चुकता भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आता महावितरणने आॅनलाईन कॅश कलेक्शन सिस्टीम सुरू केली आहे. त्यामुळे थेट वीजबिल आता आॅनलाईन प्रद्धतीने मुख्य कार्यालयाकडे रक्कम जमा होणार आहे. जिल्हाभरात वीज बिल वसुली मोहिमेस गुरूवारपासून सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या वीज ग्राहकांचे बिल थकीत आहेत, त्यांनी तत्काळ महावितरणकडे भरणा करावी, असे आवाहन अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव, कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी, राजेश लोंढे, उपकार्यकारी अभियंता दिनकर पिसे यांनी केले आहे. ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचे थकीत बिलांच्या रक्कमेची आकडेवारी वाढल्याचे महावितरणने सांगितले. बिलासंदर्भात काही अडचण किंवा समस्या असल्यास संपर्क करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.तालुकानिहाय थकीत वीजबिलएप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ पर्यंत ज्यांनी बिल भरणा केला नाही, अशा तालुक्यांची विद्युत वितरण कंपनीने यादी काढली आहे. यामध्ये कमर्शियल, घरगुती औद्योगिकक्षेत्र तसेच ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या आकडेवारीचा समावेश आहे. हिंगोली तालुक्यातील ३ हजार २४ ग्राहकांकडे ३६६.९७ लाख रुपये थकबाकी आहे. तर वसमत येथील ४ ४७० ग्राहकांचे ३४६.८० लाख, औंढ्यात १२८३ ग्राहकांचे २९.९७ लाख, सेनगाव ३ हजार ६७४ ग्राहकांचे ५८९ लाख तसेच कळमनुरी २ हजार ९४६ वीज ग्राहकांची ५८०.११ लाख रूपये वसुली करणे बाकी आहे.पोलिसांची मदतवीज कर्मचा-यांना मारहाण करणाºयांवर कडक कारवाई करण्यासाठी महावितरण पोलिसांची मदत घेणार आहे. दिवसेंदिवस वसुली कामात अडथळा करणा-यांची संख्या वाढत असल्याने हा निर्णय घेतला.