शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
3
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
4
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
5
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
6
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
7
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
8
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
9
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
10
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
11
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
12
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
13
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
14
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
15
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
16
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
17
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
18
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
19
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
20
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदी काळात घराबाहेर आढळल्यास होणार कडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:30 IST

हिंगोली : विनामास्क वावरणाऱ्या तसेच परवानगी न घेता लग्नसोहळे आयोजित करणाऱ्यांसह रात्रीच्या संचारबंदीत घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवरही आता कडक कारवाई ...

हिंगोली : विनामास्क वावरणाऱ्या तसेच परवानगी न घेता लग्नसोहळे आयोजित करणाऱ्यांसह रात्रीच्या संचारबंदीत घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवरही आता कडक कारवाई करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. या संदर्भात पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी तशी माहिती १६ मार्च रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्हा प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करीत असले तरी नागरिक मात्र नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. संचारबंदी काळातही नागरिक घराबाहेर पडताना दिसून येत आहेत. तसेच विनामास्क नागरिकांची संख्याही मोठी आहे. विनापरवानगी लग्नसोहळे आयोजित केले जात असून, परवानगी घेतलेल्या लग्नसोहळ्यात परवानगीपेक्षा जास्त नातेवाईक उपस्थित राहत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे कोरोना संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने आता ठोस उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या उपस्थितीत १६ मार्च राेजी पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत माहिती दिल्यानुसार यापुढे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लग्नसोहळे परवानगीशिवाय घेता येणार नसून परवानगी दिलेल्या लग्नसोहळ्यात परवानगीपेक्षा जास्त नातेवाईक आढळून आल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. रात्रीची संचारबंदीतही घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पोलिसांच्या वतीने कारवाई केली जाणार आहे. यासाठी पोलीस पथके स्थापन केली असल्याचेही कलासागर यांनी सांगितले. तसेच विनामास्क आढळून आल्यासही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.