शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

संचारबंदी काळात घराबाहेर आढळल्यास होणार कडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:30 IST

हिंगोली : विनामास्क वावरणाऱ्या तसेच परवानगी न घेता लग्नसोहळे आयोजित करणाऱ्यांसह रात्रीच्या संचारबंदीत घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवरही आता कडक कारवाई ...

हिंगोली : विनामास्क वावरणाऱ्या तसेच परवानगी न घेता लग्नसोहळे आयोजित करणाऱ्यांसह रात्रीच्या संचारबंदीत घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवरही आता कडक कारवाई करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. या संदर्भात पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी तशी माहिती १६ मार्च रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्हा प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करीत असले तरी नागरिक मात्र नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. संचारबंदी काळातही नागरिक घराबाहेर पडताना दिसून येत आहेत. तसेच विनामास्क नागरिकांची संख्याही मोठी आहे. विनापरवानगी लग्नसोहळे आयोजित केले जात असून, परवानगी घेतलेल्या लग्नसोहळ्यात परवानगीपेक्षा जास्त नातेवाईक उपस्थित राहत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे कोरोना संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने आता ठोस उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या उपस्थितीत १६ मार्च राेजी पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत माहिती दिल्यानुसार यापुढे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लग्नसोहळे परवानगीशिवाय घेता येणार नसून परवानगी दिलेल्या लग्नसोहळ्यात परवानगीपेक्षा जास्त नातेवाईक आढळून आल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. रात्रीची संचारबंदीतही घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पोलिसांच्या वतीने कारवाई केली जाणार आहे. यासाठी पोलीस पथके स्थापन केली असल्याचेही कलासागर यांनी सांगितले. तसेच विनामास्क आढळून आल्यासही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.