शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

‘मराठवाड्याचा गांधी’ नावाचा तारा कायमचा निखळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 4:39 PM

१९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात भाग घेऊन अग्रवाल यांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्या नेतृत्वाखाली निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त करण्यासाठीही त्यांनी लढा दिला.

वसमत (जि. हिंगोली) : हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे वास्तव्यास असलेले गंगाप्रसाद अग्रवाल यांचा जन्म ७ जानेवारी १९२३ मध्ये झाला. अंबाजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयात मॅट्रिक, तर वर्धा येथील बियाणी महाविद्यालयात कॉमर्स इंटरपर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले. 

यादरम्यान १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात भाग घेऊन अग्रवाल यांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्या नेतृत्वाखाली निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त करण्यासाठीही त्यांनी लढा दिला. वसमत येथील झेंडा सत्याग्रह, आजेगावचा संघर्ष, जंगल सत्याग्रह या आंदोलनांचे अग्रवाल यांनी नेतृत्व केले. हिंगोली-परभणी जिल्ह्यांतील स्वातंत्र्यसैनिकांसह त्यांनी सशस्त्र लढाईत सक्रिय सहभाग घेतला. आजेगावचा रणसंग्राम त्यापैकीच एक आहे. या संग्रामात बहिर्जी शिंदे यांना वीरमरण आले होते.

मराठवाडा मुक्त झाल्यानंतर गंगाप्रसाद अग्रवाल यांनी महात्मा गांधींच्या विचाराचा प्रचार-प्रसाराचा वसा घेतला. स्वदेशी चळवळ स्वावलंबन, सेंद्रिय शेती, खादी ग्रामोद्योगचा प्रचार-प्रसार, सजीव शेती, राष्ट्र सेवा दलाचे कार्य, भूदान चळवळ, दुष्काळाविरोधातील संघर्ष, शेतकरी स्वावलंबी करण्याची मोहीम, शेतकरी आत्महत्याविरोधातील चळवळ, पाणी आंदोलन आदी समाज सुधारणांच्या आंदोलनात त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. 

१९६२ व १९६५ मध्ये झालेल्या युद्धाच्या वेळी शांती सेनेसाठी कार्य करून निर्वासितांच्या छावणीमध्ये मदतकार्य करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. १९५३ मध्ये वसमतच्या नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून ते निवडून आले. मात्र, राजकारणात त्यांचे मन रमले नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी नगराध्यक्षपदाचा राजीनामा देत लढ्यात उडी घेतली. योगाचा प्रचार-प्रसारही त्यांनी केला. निरोगी आरोग्यासाठी योग महत्त्वाचा आहे, असे ते म्हणायचे. गांधींचा विचार आचरणात आणावा, हा त्यांचा आग्रह असायचा. मनगट, मेंदू व मनाचा विकास करणारी शिक्षण पद्धती असावी, ही त्यांची कायम भूमिका राहिली.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांत जागृती अभियान प्रारंभ केले होते. शेती परवडत नसल्याने शेतकरी स्वावलंबी झाला पाहिजे. सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही. जमिनीचा घसरणारा पोत, त्यामुळे उत्पादनात झालेली घट, त्यातून शेतीचे व शेतकऱ्यांचे बजेट बिघडले आहे. त्यामुळे शेतकरी स्वावलंबी व्हावा, यासाठी शेतकऱ्यांच्या सभा, शिबिरे त्यांनी देशभर घेतली. तरुण जागरूक करण्यावरही त्यांचा भर होता. त्यासाठी तरुणांची संघटना त्यांनी उभी केली. 

राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून त्यांनी तरुणांना समाजसेवेला जोडण्याचे कार्य केले. महात्मा गांधी, विनोबा भावे, गोविंदभाई श्रॉफ यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. अमेरिकेच्या महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव हा सर्वोच्च सन्मानाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. याशिवाय बाळासाहेब भारदे पुरस्कार, मराठवाडाभूषण पुरस्कार, असे अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर जमा आहेत.

कधीच भौतिक वादात न अडकता अखंडितपणे समाजसेवा करणारे स्वातंत्र्यसेनानी म्हणून त्यांची कायम ओळख राहणार आहे. स्वातंत्र्यलढ्यात व हैदराबाद मुक्तिसंग्रामात झुंजणाऱ्या गंगाप्रसाद अग्रवाल यांनी मृत्यूशीही कडवी झुंझ दिली. अखेर ९६ व्या वर्षी हा लढवय्या सेनानी ‘मराठवाड्याचा गांधी’ नावाचा तारा कायमचा निखळला.

महाराष्ट्राचे नुकसान झालेगंगाप्रसाद अग्रवाल हे मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढा आणि सर्वोदयी चळवळ यामध्ये अग्रणी भूमिकेत होते. त्यांच्या जाण्याने केवळ मराठवाडाच नव्हे तर महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा हे एक लोकविलक्षण असे पर्व होते. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हा लढा उभारला गेला. यामध्ये मराठवाड्यातील गोविंदभाई श्रॉफ, डॉ.शंकरराव चव्हाण, अनंतराव भालेराव, बाबासाहेब परांजपे, माणिकराव पहाडे यांच्यासह अग्रवाल यांचेही योगदान मोठे होते. अग्रवाल यांनी महात्मा गांधी यांच्या संकल्पनेतील स्वराज्य आणण्यासाठी झेंडा सत्याग्रह, जंगलतोड सत्याग्रह आणि भूदान चळवळीत काम केले. आपण स्वातंत्र्य सेनानी आणि सर्वोदयी नेत्यास गमावले आहे. - अशोक चव्हाण, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

टॅग्स :HingoliहिंगोलीMarathwadaमराठवाडाDeathमृत्यू