शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

दहा पैकी सातजणांना बायकोचाही मोबाईल नंबर पाठ नाही...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:19 IST

हिंगोली : आज प्रत्येकाकडे मोबाईल आल्याने एका क्षणात सर्व माहिती मिळत आहे. त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवण्याची कलाच विसरली ...

हिंगोली : आज प्रत्येकाकडे मोबाईल आल्याने एका क्षणात सर्व माहिती मिळत आहे. त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवण्याची कलाच विसरली जात आहे. शहरातील दहाजणांपैकी सातजणांना पत्नीचा मोबाईल नंबरही पाठ नसल्याने स्पष्ट झाले.

एकापेक्षा एक सरस मोबाईल आल्याने मोबाईलची साठवण क्षमताही अनेक पटीने वाढली आहे. सुरुवातीच्या काळात मोजक्याच लोकांकडे मोबाईल असायचे. त्यामुळे नंबर सहज पाठ होत असत. आता मात्र एका मोबाईलमध्ये अनेकांचे नंबर जतन करून ठेवण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे स्वत:च्या मोबाईल नंबरशिवाय इतरांचा नंबर लक्षात ठेवण्यासाठी प्रयत्नही केला जात नाही. विशेष म्हणजे अनेकांना पत्नीचाही नंबर पाठ नसल्याचे समोर आले आहे. हिंगोली शहरातील गांधी चौक भागात गुरुवारी दहाजणांना त्यांच्या पत्नीचा मोबाईल नंबर लक्षात आहे का याची विचारणा केली असता दहा पैकी सातजणांनी पत्नीचा मोबाईल नंबरच लक्षात नसल्याचे सांगितले. मोबाईल फोनमध्ये एकदा नंबर सेव्ह केल्यानंतर पुन्हा नंबर पाहण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकमत @ गांधी चौक

अ - अ व्यक्तीला पत्नीच्या मोबाईल क्रमांकाचे सुरुवातीचे चार अंक सांगता आले, तर इतर अंक सांगता आले नाही.

ब - ब व्यक्तीला स्वत:चा नंबर सांगता आला. मात्र, पत्नीचा मोबाईल नंबर पाठ नसल्याचे त्याने सांगितले.

क - या व्यक्तीने पत्नीकडे असलेल्या मोबाईल नंबरचे सुरुवातीचे दोन व शेवटचे चार अंक सांगितले. इतर अंक सांगताना मात्र अडखळत होता.

ड - या व्यक्तीने घरात एकच मोबाईल असल्याचे सांगितले. त्यामुळे हा नंबर सर्वांनाच पाठ असल्याचा दावाही त्याने केला.

ई- या व्यक्तीकडे असलेल्या दोन मोबाईल नंबरपैकी एकच नंबर पाठ होता. तसेच घरी सर्वांसाठी असलेल्या मोबाईलचा नंबर मात्र पाठ नव्हता.

तरुणांपासून वृद्धांपर्यंत सारे सारखेच

आता सर्वांकडेच स्मार्ट फोन असल्याने जास्तीत जास्त वेळ ऑनलाईन राहत आहेत. फोनमध्ये नंबर सेव्ह केला जात असल्याने नंबर लक्षात ठेवण्याकडे फारसे कुणी लक्षच देत नाही. तरुणांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांनाच आपला मोबाईल नंबर सोडून इतरांचा नंबर लक्षात राहत नाही. गुरुवारी एकास स्वत:चा सोडून इतर कोणता नंबर पाठ आहे, असे विचारले असता त्याच्या बॉसचा नंबर लक्षात असल्याचे त्याने सांगितले.

बायकांनाही पतीदेवाचा नंबर आठवेना

माझ्याकडे स्मार्ट फोन आहे. माझा नंबर पाठ असला तरी मिस्टरांचा नंबर मात्र पाठ नाही. मोबाईलमध्ये नंबर सेव्ह असल्याने पाठ करण्याची आवश्यकताच भासली नाही.

- एक गृहणी

मागील दोन वर्षांपासून मोबाईल वापरते. तसेच मिस्टरांकडे व मुलांकडेही मोबाईल आहे. परंतु, त्यापैकी एकाचाही नंबर पाठ नाही. मोबाईलमध्ये नाव टाकल्यास लगेच फोन लावता येतो. नंबर लक्षात ठेवण्याची गरजच नाही.

- एक गृहिणी

लहान मुलांना मात्र आई-बाबांचा नंबर पाठ

शाळेत आई-बाबा दोघांचाही नंबर दिला आहे. तसेच शाळेच्या डायरीवर नंबर लिहून ठेवला होता. त्यामुळे दोघांचेही नंबर पाठ केले. आता शाळा सुरू नसल्या तरी नंबर मात्र पाठ आहे.

- शर्वरी कावरखे

माझ्याकडे मोबाईल नाही. बाबांना सारखा फोन लावावा लागतो. त्यामुळे बाबांचा मोबाईल नंबर पाठ झाला. तसेच अंकलचा नंबरही पाठ आहे.

-पीयूष भालेराव

व्यसनाधीनता, मानसिक आजार, फिटचा आजार, आदींमुळे स्मरणशक्तीवर परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच ६० वर्षांनंतर काही गोष्टी लक्षात राहत नाहीत.

- डॉ. दीपक डोणेकर, मानसोपचार तज्ज्ञ, हिंगोली