शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
4
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
5
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
6
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
7
New Year 2026: २०२६ मध्ये तुमचे प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण; त्यासाठी वापरा '३६९ मॅनिफेस्टेशन' टेक्निक 
8
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
9
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
10
२०२५ वर्षाची सांगता: ७ राशींना शुभ काळ, धनलाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, इच्छापूर्तीचे उत्तम योग!
11
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
12
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
13
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
14
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
15
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
16
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
17
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
18
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
19
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
20
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

इसापूर धरणात केवळ १.३ टक्के पाणीसाठा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 18:45 IST

कळमनुरी तालुक्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात म्हणावी तशी वाढ झाली नाही

ठळक मुद्देएप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हिंगोलीतील तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सीअसपर्यंत पोहचला आहे. इसापूर धरणात आज घडीला अवघा १.३ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. 

- इलियास शेख 

कळमनुरी ( हिंगोली ): मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच तापमानात कमालीची वाढ झालेली आहे. तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हिंगोलीतील तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सीअसपर्यंत पोहचला आहे. परिणामी, उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. दरम्यान, यावर्षी कळमनुरी तालुक्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात म्हणावी तशी वाढ झाली नसल्यामुळे इसापूर धरणात आज घडीला अवघा १.३ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. 

यावर्षीच्या मोसमात कळमनुरी तालुक्यात केवळ ५२ टक्केच पर्जन्यवृष्टी झाली. त्यातच यंदा फेबु्रवारी महिन्याच्या शेवटीपासूनच तापमानात वाढ होण्यास सुरूवात झाली होती. त्यानंतर मार्च महिन्याच्या मध्यंतरी वाढत्या तापमानामुळे अनेक भागातील भूजलपातळीत घट होण्यास सुरूवात झाली. परिणामी, तालुक्यातील धरण, तलाव व विहिरीतील पाणीपातळी झपाट्याने खालावण्यास सुरूवात झाली. 

त्याचा परिणाम एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात इसापूर धरणात सद्यस्थितीत अवघा १.३ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या इसापूर धरणात उपयुक्त पाणीसाठा १३.२७९३ दलघमी इतका उपलब्ध असून एकूण पाणीसाठा ३२८.२४३१ दलघमी असून सध्या तरी धरणात आता १.३७७४ टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यातच जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशानुसार उजव्या कालव्यातनू २९ मार्चच्या मध्यरात्रीपासून १५ दलघमी पाणी सोडल्या जात आहे. 

सदरचे सोडण्यात आलेले पाणी कालव्याद्वारे भाटेगाव, डोंगरकडा, वरुड, घोडा, कामठा, सुकळीवीर, तरोडा, वाकाडी, डोंगरगाव नाका, गुंडलवाडी, डिग्रस बु.,जवळा पांचाळ, रेडगाव, वडगाव, देववाडी, सालापूर, बेलमंडळ, येहळेगाव तु., हिवरा या व नांदेड जिल्ह्यातील काही गावांना सोडले गेले आहे.कालव्याद्वारे सोडण्यात आलेल्या पाण्याचा फायदा या गावांतील पिकांना झाला असून या भागातील बहुतांश ठिकाणच्या पाणीपातळीत वाढ झाली असल्याचे समजते. तसेच गुरांसाठीही हे पाणी उपयुक्त ठरले असून यामुळे परिसरातील पाणीटंचाई दुर होण्यास मदत मिळाली आहे. त्याचप्रमाणे धरणाच्या डाव्या काल्यातून उमरखेड व हदगाव तालुक्याला पाणी सोडल्या जाते. या धरणातून कळमनुरी शहरासह तालुक्यातील मोरवाडी येथील २५ गाव पाणीपुरवठा नळ योजनेंतर्गतच्या गावांना पाणीपुरवठा होतो.

३ दलघमी पाणी आरक्षीत...इसापूर धरणातील ३ दलघमी पाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आरक्षीत करण्यात आले आहे. आरक्षीत केलेले पाणी सोडावे, यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना उर्ध्वपैनगंगा प्रकल्प विभाग क्र. एक नांदेड यांना ३१ मार्च रोजी पत्र लिहून आरक्षीत पाणी जिल्ह्यातील २६ गावांना सोडण्याची मागणी केली होती. वर्ष २०१७-१८ करीता धरणातील ३ दलघमी पाणी आरक्षीत करण्यात आले असून कळमनुरीसह वसमत तालुक्यातील २६ गावांना पाणी सोडण्याची विनंती केली असून कळमनुरी तालुक्यातील १४ व वसमत तालुक्यातील १२ गावांसाठी आरक्षीत पाणी उजव्या कालव्यातून सोडण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे धरणासाठी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात पाण्याचा फायदा मात्र दुसऱ्याच जिल्ह्यातील गावांना होत आहे. त्यामुळे ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशीच म्हणण्याची वेळ तालुक्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांवर आली आहे. परिणामी, पाणीटंचाईचे सावट आणखी गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीHingoliहिंगोलीDamधरण