शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

इसापूर धरणात केवळ १.३ टक्के पाणीसाठा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 18:45 IST

कळमनुरी तालुक्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात म्हणावी तशी वाढ झाली नाही

ठळक मुद्देएप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हिंगोलीतील तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सीअसपर्यंत पोहचला आहे. इसापूर धरणात आज घडीला अवघा १.३ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. 

- इलियास शेख 

कळमनुरी ( हिंगोली ): मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच तापमानात कमालीची वाढ झालेली आहे. तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हिंगोलीतील तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सीअसपर्यंत पोहचला आहे. परिणामी, उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. दरम्यान, यावर्षी कळमनुरी तालुक्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात म्हणावी तशी वाढ झाली नसल्यामुळे इसापूर धरणात आज घडीला अवघा १.३ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. 

यावर्षीच्या मोसमात कळमनुरी तालुक्यात केवळ ५२ टक्केच पर्जन्यवृष्टी झाली. त्यातच यंदा फेबु्रवारी महिन्याच्या शेवटीपासूनच तापमानात वाढ होण्यास सुरूवात झाली होती. त्यानंतर मार्च महिन्याच्या मध्यंतरी वाढत्या तापमानामुळे अनेक भागातील भूजलपातळीत घट होण्यास सुरूवात झाली. परिणामी, तालुक्यातील धरण, तलाव व विहिरीतील पाणीपातळी झपाट्याने खालावण्यास सुरूवात झाली. 

त्याचा परिणाम एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात इसापूर धरणात सद्यस्थितीत अवघा १.३ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या इसापूर धरणात उपयुक्त पाणीसाठा १३.२७९३ दलघमी इतका उपलब्ध असून एकूण पाणीसाठा ३२८.२४३१ दलघमी असून सध्या तरी धरणात आता १.३७७४ टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यातच जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशानुसार उजव्या कालव्यातनू २९ मार्चच्या मध्यरात्रीपासून १५ दलघमी पाणी सोडल्या जात आहे. 

सदरचे सोडण्यात आलेले पाणी कालव्याद्वारे भाटेगाव, डोंगरकडा, वरुड, घोडा, कामठा, सुकळीवीर, तरोडा, वाकाडी, डोंगरगाव नाका, गुंडलवाडी, डिग्रस बु.,जवळा पांचाळ, रेडगाव, वडगाव, देववाडी, सालापूर, बेलमंडळ, येहळेगाव तु., हिवरा या व नांदेड जिल्ह्यातील काही गावांना सोडले गेले आहे.कालव्याद्वारे सोडण्यात आलेल्या पाण्याचा फायदा या गावांतील पिकांना झाला असून या भागातील बहुतांश ठिकाणच्या पाणीपातळीत वाढ झाली असल्याचे समजते. तसेच गुरांसाठीही हे पाणी उपयुक्त ठरले असून यामुळे परिसरातील पाणीटंचाई दुर होण्यास मदत मिळाली आहे. त्याचप्रमाणे धरणाच्या डाव्या काल्यातून उमरखेड व हदगाव तालुक्याला पाणी सोडल्या जाते. या धरणातून कळमनुरी शहरासह तालुक्यातील मोरवाडी येथील २५ गाव पाणीपुरवठा नळ योजनेंतर्गतच्या गावांना पाणीपुरवठा होतो.

३ दलघमी पाणी आरक्षीत...इसापूर धरणातील ३ दलघमी पाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आरक्षीत करण्यात आले आहे. आरक्षीत केलेले पाणी सोडावे, यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना उर्ध्वपैनगंगा प्रकल्प विभाग क्र. एक नांदेड यांना ३१ मार्च रोजी पत्र लिहून आरक्षीत पाणी जिल्ह्यातील २६ गावांना सोडण्याची मागणी केली होती. वर्ष २०१७-१८ करीता धरणातील ३ दलघमी पाणी आरक्षीत करण्यात आले असून कळमनुरीसह वसमत तालुक्यातील २६ गावांना पाणी सोडण्याची विनंती केली असून कळमनुरी तालुक्यातील १४ व वसमत तालुक्यातील १२ गावांसाठी आरक्षीत पाणी उजव्या कालव्यातून सोडण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे धरणासाठी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात पाण्याचा फायदा मात्र दुसऱ्याच जिल्ह्यातील गावांना होत आहे. त्यामुळे ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशीच म्हणण्याची वेळ तालुक्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांवर आली आहे. परिणामी, पाणीटंचाईचे सावट आणखी गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीHingoliहिंगोलीDamधरण