शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

मुक्कामाला येणारी बस आगारातच थांबली; प्रवाशांची गैरसोय वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:31 IST

हिंगोली : कोरोना महामारी कमी झाल्यामुळे लांबपल्ल्याच्या मुक्कामी बसेस सुरू केल्या आहेत; परंतु ग्रामीण भागातील मुक्कामी बसेसबाबत अजून शासनाचा ...

हिंगोली : कोरोना महामारी कमी झाल्यामुळे लांबपल्ल्याच्या मुक्कामी बसेस सुरू केल्या आहेत; परंतु ग्रामीण भागातील मुक्कामी बसेसबाबत अजून शासनाचा काही आदेश नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. शासनाचा आदेश आल्यास लवकरच ग्रामीण भागातील मुक्कामी बसेस सुरू केल्या जातील, असे महामंडळाने सांगितले.

एसटी महामंडळाच्या हिंगोली, वसमत आणि कळमनुरी आगारांनी ग्रामीण भाग वगळता इतर लांब पल्ल्याच्या बसेस मुक्कामी पाठविणे सुरू केले आहे. कोरोना महामारीमुळे ग्रामीण भागात बसेस पाठवता येत नाहीत, असे महामंडळाचे म्हणणे आहे. ग्रामीण भागात मुक्कामी बसेस होत्या त्या वेळेस एसटी महामंडळाच्या उत्पन्नात भर पडत होती. आज मात्र ग्रामीण भागात एकही बस मुक्कामी जात नाही. परिणामी, तोटा सहन करावा लागत आहे, असे महामंडळाने सांगितले. आजमितीस मुक्कामी बस नसल्यामुळे मिळेल त्या वाहनाने प्रवाशांना शहराच्या ठिकाणी जावे लागत आहे. मुक्कामी बस नसल्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

५० टक्के बसेस आगारातच...

सद्य:स्थितीत कोरोना महामारीमुळे ग्रामीण भागात मुक्कामी काय, तर कोणतीच बस सोडली जात नाही. आजमितीस फक्त लांब पल्ल्याच्या बसेस तेवढ्याच सुरू आहेत. शासनाचा आदेश आल्यास ग्रामीण भागात पूर्वीप्रमाणे मुक्कामी व इतर दिवसांच्या बसेस सुरू केल्या जातील. बसेस सुरू करण्याबाबत अजून तर आदेशच आला नाही.

ग्रामीण भाग वगळता मुक्कामी बसेस

हिंगोली ३०

१८

कळमनुरी १०

०५

वसमत २८

२५

रुग्ण घटले; एसटी कधी धावणार?

कोरोना महामारीचे रुग्ण घटले आहेत. मग एसटी महामंडळ ग्रामीण भागातील बसेस का सुरू करत नाही? हा प्रवाशांना पडलेला प्रश्न आहे. ग्रामीण भागातील बसेस सुरू करण्यासाठी महामंडळाने शासनाकडे पत्रव्यवहार करायला पाहिजे; परंतु महामंडळ काहीच हालचाल करत नाही.

-मुरली कल्याणकर, कंजारा

कोरोनाअगोदर मुक्कामी बस होती. त्यामुळे शहराच्या ठिकाणी येणे सोयीचे होत होते; परंतु सध्या खाजगी वाहनाने शहराच्या ठिकाणी यावे लागत आहे. अशावेळी खाजगी वाहने अवाच्या सव्वा पैसे घेत आहेत. त्यामुळे नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

-पांडुरंग जाधव, सांडस

आदेश आल्यावर मुक्कामी बस सुरू...

कोरोना महामारीचे रुग्ण रोजच आढळून येत आहेत. त्यामुळे सध्यातरी ग्रामीण भागातील मुक्कामी बसेस सुरू करण्याचा कोणताही आदेश एसटी महामंडळाला आलेला नाही. शासनाच्या आदेशानुसार लांब पल्ल्याच्या बसेस सुरू असून, त्याच मुक्कामी आहेत. दरम्यान, चालक- वाहकांना कोरोना नियम पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.

-संजयकुमार पुंडगे, स्थानकप्रमुख, हिंगोली