शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

सेनगावात अकरा दिवसानंतर बाजार समिती सुरु; केवळ नॉन एफ.ए.क्यू शेतमालाचेच होणार व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 2:21 PM

तब्बल अकरा दिवसानंतर आज कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतमाल खरेदी चे व्यवहार सुरू करण्यात आले.

सेनगाव (हिंगोली ) : तब्बल अकरा दिवसानंतर आज कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतमाल खरेदी चे व्यवहार सुरू करण्यात आले. प्रामुख्याने नाँन एफ.ऐ.क्यू दर्जा चा शेतमालाचे व्यवहार सुरू करण्यात आले  असल्याची माहिती बाजार समिती सचिव दत्तात्रय वाघ यांनी दिली.

शासनाने हमी भावा पेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी केल्या संबंधी गंभीर स्वरूपाची फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय घेतलाने या विरोधात भुसार असोशियनचा वतीने खरेदी बंद केली होती. मागील अकरा दिवसापासून शेतमालाची खरेदी बंद आंदोलन सुरू होते. त्यामुळे ऐन  सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांसमोर शेतमालाची विक्री करण्याची अडचण निर्माण झाली होती. या संबंधी पूर्णपणे तोडगा निघाला नसला तरी दुय्यम दर्जाच्या शेतमालाची खरेदी करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आज भुसार असोसिएशनचा वतीने येथील आंदोलन मागे घेण्यात आले.

प्रांरभी नॉन एफ.ऐ.क्यू दर्जाच्या शेतमालाची खरेदी करण्यावर तोडगा निघाला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे एफ.ऐ.क्यू दर्जाचा शेतमाल अशा शेतकऱ्यांनी हमीभाव  किमतीकरीता नाफेडच्या खरेदी केंद्रावर विक्री करावी अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. बाजार समितीमध्ये आधारभूत किमतीवर शेतमालाची खरेदी करण्यासाठी हमी भाव केंद्र सुरू करावे असे पत्र नाफेडला देण्यात आले आहे. त्यामुळे सदर केंद्र सुरू झाल्यावरच शेतकऱ्यांना हमीभाव मिळणार आहे. शेतकऱ्यांनी नॉन एफ.ऐ.क्यू दर्जाचा शेतमाल विक्रीसाठी आणावा असे आवाहन बाजार समिती सचिव दत्तात्रय वाघ यांनी केले आहे. खरेदी व्यवहार सुरू झाल्याने मोंढा पुन्हा गजबजला आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र