शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

५९ हजार कुटुंबांची माहिती आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:26 IST

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत एनआयसी पोर्टलवर ५९ हजार १२२ कुटुंबांची माहिती अपलोड करण्यात आज सायंकाळपर्यंत प्रशासनास यश आले आहे. यासाठी आज शेवटचा दिवस होता. मात्र त्याला त्याला मुदतवाढ भेटण्याची चिन्हे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत एनआयसी पोर्टलवर ५९ हजार १२२ कुटुंबांची माहिती अपलोड करण्यात आज सायंकाळपर्यंत प्रशासनास यश आले आहे. यासाठी आज शेवटचा दिवस होता. मात्र त्याला त्याला मुदतवाढ भेटण्याची चिन्हे आहेत.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत दोन हेक्टरपर्यंत क्षेत्र असलेल्या निकषपात्र शेतकऱ्यास वार्षिक सहा हजारांची पेन्शन शासन देणार आहे. ती टप्प्या-टप्प्याने देणार असले तरीही त्यासाठीची माहिती आॅनलाईन करण्याचे काम सध्या सुरू आहे. महसूल, कृषी व जि.प.च्या यंत्रणेमार्फत हे काम केले जात आहे. आज जिल्हाभर महसूल विभागाने या कामाकडे लक्ष केंद्रित केले होते. मात्र यात कळमनुरी वगळता इतर कोणत्याच तालुक्याला १00 टक्के उद्दिष्ट गाठता आले नाही. यात माहिती चुकीची झाल्यास अथवा कुणाचे नाव राहिल्यास आक्षेप व हरकती घेण्याचीही मुभा आहे. मात्र आधीच काटेकोर तपासणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.जिल्ह्यात नमुना ८ अप्रमाणे खातेदार शेतकरी ३.४३ लाख आहेत. मात्र ७0२ गावांतून परिशिष्ठ अ प्रमाणे अनिवार्य माहिती परिपूर्ण असलेल्या पात्र शेतकरी कुटुंबांची संभाव्य संख्या १ लाख ४५ हजार ६९९ आहे. यात सोबतच फेरतपासणीही होत असल्याने कुटुंबसंख्या वाढण्याचीही शक्यता आहे. कळमनुरीत त्यामुळे १८ हजारांवरून २१ हजारांपर्यंत कुटुंबसंख्या गेली. या तालुक्यात १४८ पैकी १३७ गावांचे अपलोडींगचे काम पूर्ण झाले आहे. अजून ११ गावे बाकी आहेत. हा तालुका जिल्ह्यात आघाडी कायम ठेवून असल्याचे दिसत असून काम अंतिम टप्प्यात आहे.श्रेयासाठी धडपडभाजप सरकारने जाहीर केलेल्या या योजनेत पेन्शनचा पहिला हप्ता शेतकºयांच्या खात्यावर टाकून श्रेय घेण्यासाठी अतिशय घाईत हे काम पूर्ण करून घेतले जात आहे. तर आपल्या माहितीत चुका राहू नये म्हणून लोकांची तहसीलपर्यंत गर्दी होत असल्याचे दिसते.हिंगोली तालुक्यात संभाव्य कुटुंबांची संख्या ३0 हजार असून ७0 गावांतील ६७0८ कुटुंबांची माहिती अपलोड झाली. सेनगावात २७ हजार संभाव्य कुटुंबांपैकी ९0 गावांतील ९४0८, वसमतला ५६ हजार संभाव्य कुटुंबांपैकी १0५ गावांतील १२ हजार ९३३, औंढ्यात संभाव्य १३ हजार कुटुंबांपैकी ७६ गावांतील ९0४0 कुटुंबांची माहिती एनआयसीवर अपलोड झालेली आहे. आतापर्यंत ४७८ गावांतील कुटुंबाच्या माहिती अपलोड करण्याचे काम झाले असले तरीही २२४ गावांतील माहिती अपलोड करण्यास प्रारंभही नसल्याचे दिसत आहे.प्रधानमंत्री किसान सन्मानचे काम करण्यासाठी सर्वच यंत्रणा कामाला लागली आहे. रात्रंदिवस अपलोडिंगचे काम केले जात आहे. वरिष्ठांकडून सकाळपासूनच तगादा होत असल्याने प्रशासन हैराण आहे.

टॅग्स :Familyपरिवारgovernment schemeसरकारी योजना