शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

५९ हजार कुटुंबांची माहिती आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:26 IST

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत एनआयसी पोर्टलवर ५९ हजार १२२ कुटुंबांची माहिती अपलोड करण्यात आज सायंकाळपर्यंत प्रशासनास यश आले आहे. यासाठी आज शेवटचा दिवस होता. मात्र त्याला त्याला मुदतवाढ भेटण्याची चिन्हे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत एनआयसी पोर्टलवर ५९ हजार १२२ कुटुंबांची माहिती अपलोड करण्यात आज सायंकाळपर्यंत प्रशासनास यश आले आहे. यासाठी आज शेवटचा दिवस होता. मात्र त्याला त्याला मुदतवाढ भेटण्याची चिन्हे आहेत.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत दोन हेक्टरपर्यंत क्षेत्र असलेल्या निकषपात्र शेतकऱ्यास वार्षिक सहा हजारांची पेन्शन शासन देणार आहे. ती टप्प्या-टप्प्याने देणार असले तरीही त्यासाठीची माहिती आॅनलाईन करण्याचे काम सध्या सुरू आहे. महसूल, कृषी व जि.प.च्या यंत्रणेमार्फत हे काम केले जात आहे. आज जिल्हाभर महसूल विभागाने या कामाकडे लक्ष केंद्रित केले होते. मात्र यात कळमनुरी वगळता इतर कोणत्याच तालुक्याला १00 टक्के उद्दिष्ट गाठता आले नाही. यात माहिती चुकीची झाल्यास अथवा कुणाचे नाव राहिल्यास आक्षेप व हरकती घेण्याचीही मुभा आहे. मात्र आधीच काटेकोर तपासणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.जिल्ह्यात नमुना ८ अप्रमाणे खातेदार शेतकरी ३.४३ लाख आहेत. मात्र ७0२ गावांतून परिशिष्ठ अ प्रमाणे अनिवार्य माहिती परिपूर्ण असलेल्या पात्र शेतकरी कुटुंबांची संभाव्य संख्या १ लाख ४५ हजार ६९९ आहे. यात सोबतच फेरतपासणीही होत असल्याने कुटुंबसंख्या वाढण्याचीही शक्यता आहे. कळमनुरीत त्यामुळे १८ हजारांवरून २१ हजारांपर्यंत कुटुंबसंख्या गेली. या तालुक्यात १४८ पैकी १३७ गावांचे अपलोडींगचे काम पूर्ण झाले आहे. अजून ११ गावे बाकी आहेत. हा तालुका जिल्ह्यात आघाडी कायम ठेवून असल्याचे दिसत असून काम अंतिम टप्प्यात आहे.श्रेयासाठी धडपडभाजप सरकारने जाहीर केलेल्या या योजनेत पेन्शनचा पहिला हप्ता शेतकºयांच्या खात्यावर टाकून श्रेय घेण्यासाठी अतिशय घाईत हे काम पूर्ण करून घेतले जात आहे. तर आपल्या माहितीत चुका राहू नये म्हणून लोकांची तहसीलपर्यंत गर्दी होत असल्याचे दिसते.हिंगोली तालुक्यात संभाव्य कुटुंबांची संख्या ३0 हजार असून ७0 गावांतील ६७0८ कुटुंबांची माहिती अपलोड झाली. सेनगावात २७ हजार संभाव्य कुटुंबांपैकी ९0 गावांतील ९४0८, वसमतला ५६ हजार संभाव्य कुटुंबांपैकी १0५ गावांतील १२ हजार ९३३, औंढ्यात संभाव्य १३ हजार कुटुंबांपैकी ७६ गावांतील ९0४0 कुटुंबांची माहिती एनआयसीवर अपलोड झालेली आहे. आतापर्यंत ४७८ गावांतील कुटुंबाच्या माहिती अपलोड करण्याचे काम झाले असले तरीही २२४ गावांतील माहिती अपलोड करण्यास प्रारंभही नसल्याचे दिसत आहे.प्रधानमंत्री किसान सन्मानचे काम करण्यासाठी सर्वच यंत्रणा कामाला लागली आहे. रात्रंदिवस अपलोडिंगचे काम केले जात आहे. वरिष्ठांकडून सकाळपासूनच तगादा होत असल्याने प्रशासन हैराण आहे.

टॅग्स :Familyपरिवारgovernment schemeसरकारी योजना