शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

हिंगोली शहरातील वाहतुकीचा प्रश्न बनला गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 1:14 AM

शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेेंदिवस गंभीर बनत चालला आहे. चौका-चौकात वाहने शिस्तीत लावली जात नाहीत. जड वाहतूकही शहरातून धावते. याचा फटका सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागतो. यामुळे गांधी चौकासारख्या गजबजलेल्या भागात दररोज किरकोळ अपघात घडत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेेंदिवस गंभीर बनत चालला आहे. चौका-चौकात वाहने शिस्तीत लावली जात नाहीत. जड वाहतूकही शहरातून धावते. याचा फटका सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागतो. यामुळे गांधी चौकासारख्या गजबजलेल्या भागात दररोज किरकोळ अपघात घडत आहेत.हिंगोली शहरातील वाहतुकीचा प्रश्न कायमच गंभीर असतो. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या दिवशी तर चांगलेच वाभाडे निघाले होते. त्यानंतर पुन्हा दोन दिवस सुधारणेचे वारे वाहू लागले होते. वरिष्ठ पोलीस अधिकारी मनावर घेत असल्याचे दाखवून एका दिवसापुरते या प्रश्नाकडे पाहतात. पुन्हा त्यांनी पाठ फिरविली की, खालची मंडळी याकडे दुर्लक्ष करीत आहे. या विभागाला कधीच पूर्णवेळ अधिकारी मिळत नाही. पोलीस निरीक्षक सुडके यांच्या रुपाने काही काळ पूर्णवेळ अधिकारी मिळाला होता. आता सुडके यांना ग्रामीण पोलीस ठाण्याचा अतिरिक्त पदभार दिला आहे. त्यामुळे त्यांना दोन्हीकडचा कारभार सांभाळणे अवघड झाले आहे. जिल्ह्यात अधिकाऱ्यांची कमतरता आहे, ही बाब मान्य. मात्र हिंगोली शहरात आता पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करून वाहतूक शिस्त निर्माण करणे गरजेचे आहे. शहराचा होणारा विस्तार लक्षात घेता परिस्थिती अशीच राहिली तर आगामी काळात हा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे. मात्र ही बाब मनावर घेणारा अधिकारी हिंगोलीत येण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस