शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

हिंगोलीत वर्षभरात वीजेचा धक्का लागून १४ गतप्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 4:06 PM

अचानक वीजेचा शॉक लागुन मृत्यू ओढवल्यास मयताच्या कुटुंबियांना महावितरणकडून आर्थिक मदत जाहिर केली जाते.

हिंगोली : पावसाळ्यात विद्युत अपघातामुळे जीवित व वित्तहानीच्या वाढत्या घटना ही चिंताजनक बाब बनली आहे. विद्युत अपघात टाळण्यासाठी सर्वांनीच सावधानता बाळगणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा वीज उपकरणे हाताळताना हयगयी केली जाते. शिवाय महावितरणच्या बेजबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेही अनेक दुर्घटना घडतात. त्यामुळे वीजेचा शॉक लागून मृत्यू होतो.

जिल्ह्यामध्ये एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत १४ जणांचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. तर विविध घटनेत ५ जनावरे दगावल्याची नोंद महावितरण दरबारी करण्यात आली आहे. त्यामुळे  प्रत्येकाने घरात, शेतात विद्युत उपकरणे हाताळताना सावधानता बाळगावी असे आवाहन केले जात आहे. वादळी वाऱ्यामुळे पावसाळ्यात वीजेच्या तारा तुटणे, खांब वाकणे, पडणे, रोहित्र वाकणे वा पडणे, वीजतारांवर झाड किंवा झाडांची फांदी तुटून पडणे अशा घटना घडतात. अशावेळी महावितरणने वेळीच खबदारी घेऊन दुरूस्तीचे कामे हाती घेणे आवश्यक आहे. तसेच पाऊस चालु असताना रोहित्र, खांबाजवळ किंवा वीजतारांखाली थांबणे टाळले पाहिजे.

अचानक वीजेचा शॉक लागुन मृत्यू ओढवल्यास मयताच्या कुटुंबियांना महावितरणकडून आर्थिक मदत जाहिर केली जाते. परंतु ही प्रक्रिया किचकट असल्याने अनेकांना याचा लाभ मिळत नाही. किंवा यात बराच कालावधी जाते. घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मयताचे कुटुंब उघड्यावर येते. अशावेळी महावितरण प्रशासनाने वेळोवेळी दखल घेणे गरजेचे असून तशी मागणीही नागरिकांतून केली जात आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीDeathमृत्यूelectricityवीज