शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
4
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
6
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
7
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
8
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
9
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
10
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
11
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
12
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
13
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
14
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
15
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
16
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
18
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
19
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
20
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!

जिल्ह्यात जोरदार पाऊस; शेतकऱ्यांच्या हळदीचे पुन्हा नुकसान

By विजय पाटील | Updated: May 3, 2023 19:08 IST

दुपारी साडेचार वाजेदरम्यान अचानक पाऊस आल्यामुळे बाजारकरूंची तारांबळ उडाली.

हिंगोली : शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये बुधवारी अवकाळी पावसाने जोरदारपणे हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हळदीचे पुन्हा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पावसामुळे हिंगोली शहरातील सखल भागात पाणी साचले होते. दुपारी साडेचार वाजेदरम्यान अचानक पाऊस आल्यामुळे बाजारकरूंची तारांबळ उडाली.

मागच्या दहा दिवसांपासून वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस अधून-मधून हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हळदीसह इतर उन्हाळी पिकांचे नुकसान होत आहे. सकाळी उन्हात वाळायला ठेवलेली हळद पाऊस येताच काढून घ्यावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फजिती होत आहे. अवकाळी पाऊस केव्हाही हजेरी लावत आहे. त्यामुळे उन्हाळा आहे की पावसाळा? हेच कळायला मार्ग नाही.

३ मे रोजी जिल्ह्यात अनेक ठिकाणी विवाहकार्य होते. सकाळपासून वऱ्हाडी मंडळी तयारी करत होते. परंतु दुपारी साडेचार वाजेदरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावताच वऱ्हाडी मंडळींची तारांबळ उडाली. काही ठिकाणी वादळामुळे लग्नाचा मंडपही उडून गेला. बुधवारी जिल्ह्यातील औंढा नागनाथ, खुडज, कळमनुरी, कुरुंदा, बाळापूर, वारंगाफाटा, डिग्रस (कऱ्हाळे), कौठा आदी ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.

वातावरणात उकाडा वाढला...३ मे रोजी सकाळपासूनच शहरासह जिल्ह्यात ढगाळमय वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे वातावरणात उकाडा जाणवू लागला होता. दरम्यान, वीजपुरवठा अधून-मधून खंडित होत होता. दुपारी ४:३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात अधिकचा उकाडा निर्माण झाला. 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसHingoliहिंगोली