शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

जिल्ह्यात जोरदार पाऊस; शेतकऱ्यांच्या हळदीचे पुन्हा नुकसान

By विजय पाटील | Updated: May 3, 2023 19:08 IST

दुपारी साडेचार वाजेदरम्यान अचानक पाऊस आल्यामुळे बाजारकरूंची तारांबळ उडाली.

हिंगोली : शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये बुधवारी अवकाळी पावसाने जोरदारपणे हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हळदीचे पुन्हा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पावसामुळे हिंगोली शहरातील सखल भागात पाणी साचले होते. दुपारी साडेचार वाजेदरम्यान अचानक पाऊस आल्यामुळे बाजारकरूंची तारांबळ उडाली.

मागच्या दहा दिवसांपासून वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस अधून-मधून हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हळदीसह इतर उन्हाळी पिकांचे नुकसान होत आहे. सकाळी उन्हात वाळायला ठेवलेली हळद पाऊस येताच काढून घ्यावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फजिती होत आहे. अवकाळी पाऊस केव्हाही हजेरी लावत आहे. त्यामुळे उन्हाळा आहे की पावसाळा? हेच कळायला मार्ग नाही.

३ मे रोजी जिल्ह्यात अनेक ठिकाणी विवाहकार्य होते. सकाळपासून वऱ्हाडी मंडळी तयारी करत होते. परंतु दुपारी साडेचार वाजेदरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावताच वऱ्हाडी मंडळींची तारांबळ उडाली. काही ठिकाणी वादळामुळे लग्नाचा मंडपही उडून गेला. बुधवारी जिल्ह्यातील औंढा नागनाथ, खुडज, कळमनुरी, कुरुंदा, बाळापूर, वारंगाफाटा, डिग्रस (कऱ्हाळे), कौठा आदी ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.

वातावरणात उकाडा वाढला...३ मे रोजी सकाळपासूनच शहरासह जिल्ह्यात ढगाळमय वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे वातावरणात उकाडा जाणवू लागला होता. दरम्यान, वीजपुरवठा अधून-मधून खंडित होत होता. दुपारी ४:३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात अधिकचा उकाडा निर्माण झाला. 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसHingoliहिंगोली