शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

सिंचन अनुशेषातील कामे करण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 11:37 PM

जिल्ह्याचा १५६९0 हेक्टरचा सिंचन अनुशेष मंजूर होवूनही सिंचनवाढीचे उपाय करण्यास पाणी उपब्धतेची अडचण येत होती. नाशिकच्या जलविज्ञान केंद्राने ३३ दलघमी पाणी उपलब्ध करून दिल्याने आता अनुशेषातील कामांचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आ.तान्हाजी मुटकुळे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्याचा १५६९0 हेक्टरचा सिंचन अनुशेष मंजूर होवूनही सिंचनवाढीचे उपाय करण्यास पाणी उपब्धतेची अडचण येत होती. नाशिकच्या जलविज्ञान केंद्राने ३३ दलघमी पाणी उपलब्ध करून दिल्याने आता अनुशेषातील कामांचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आ.तान्हाजी मुटकुळे यांनी दिली.मुटकुळे यांनी जिल्ह्याच्या सिंचन अनुशेषाचा मुद्दा शासन दरबारी व राज्यपालांकडे चांगलाच लावून धरला होता. त्यानंतर १५६९0 हेक्टरचा अनुशेष मंजूर झाला. शिवाय १७६ कोटींच्या कामांचा आराखडाही मंजूर झाला होता. मात्र ही कामे पुढील मंजुरीसाठी गोदावरी खोरे महामंडळामार्फत जलविज्ञान विभागाकडे गेल्यावर त्यांनी पाणी वापर उपलब्धता नसल्याचे सांगितले. आधीच २८ दलघमी एवढा जास्त पाणीवापर असल्याचे सांगितले. त्यामुळे नव्याने कामे करण्यास मंजुरी नाकारली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर आ.मुटकुळे यांनी प्रस्तावित सापळी धरणासाठी आरक्षित २४0 दलघमीपैकी ६१ दलघमी पाण्याची उपलब्धता करून देण्यास मुख्य सचिवांची मान्यता मिळविली. त्यामुळे आता ही कामे होण्यातील अडथळा दूर झाल्याचे ते म्हणाले.हिंगोली जिल्ह्यात नदीवर १४ बंधारे असून २४ तलावांची कामे होणार आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना सिंचनाचे महत्त्व पटल्याने त्यांनी जमिनी देण्यासही होकार दिला आहे. सिंचनाच्या क्षेत्रात अजूनही वाव असून ही कामे झाल्यावर पुढील रणनीती ठरविता येईल. मात्र सिंचनच्या प्रशासनाने यात एवढे दिवस अडथणे आणल्याने या कामांना विलंब होत असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Governmentसरकारwater scarcityपाणी टंचाई