शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कोरोनाकाळात जिल्ह्यात ७ मुले तर १७ मुली हरवल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 4:37 AM

२०२० मध्ये जानेवारी महिन्यात १ मुलगा तर ३ मुली हरवल्या. फेब्रुवारी महिन्यात २ मुले, १ मुलगी, तर मार्च महिन्यात ...

२०२० मध्ये जानेवारी महिन्यात १ मुलगा तर ३ मुली हरवल्या. फेब्रुवारी महिन्यात २ मुले, १ मुलगी, तर मार्च महिन्यात २ मुले, मे महिन्यात १ मुलगी, जून महिन्यात १ मुलगी, जुलै महिन्यात १ मुलगा, सप्टेंबर महिन्यात ३ मुली, ऑक्टोबर महिन्यात ४ मुली, नोव्हेंबर महिन्यात ३ मुली, डिसेंबर महिन्यात १ मुलगा, १ मुलगी हरवली आहे. एप्रिल आणि ऑगस्ट महिन्यांत एकही मुलगा हरवला नाही.

ही सर्व मुले १८ वर्षे वयोगटातील आहेत. मुले-मुली हरवल्यानंतर जिल्हा पालक हे पोलीस अधीक्षक कार्यालयातील ‘भरोसा’ केंद्रात रीतसर अर्ज देतात. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर व अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हरवलेली मुले, मुली शोधण्यासाठी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

जिल्ह्यात २०१८ मध्ये २० मुले तर १५ मुली हरवल्या होत्या. यामध्ये मुले सापडली असून ३ मुलींचा शोध सुरू आहे. २०१९ मध्ये १८ मुले तर २६ मुली हरवल्या होत्या. यापैकी मुले सापडली असून ३ मुलींचा शोध बाकी आहे. २०२० मध्ये ७ मुले तर १७ मुली हरवल्या होत्या. यापैकी ६ मुले सापडली असून ३ मुलींचा शोध घेणे सुरू आहे.

सहायक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहीम राबविण्यात आली. याकामी पोहेकाॅ शेख इस्माईल शेख फरीद, मपोना सुनीता शिंदे, मपोशि स्वाती डोल्हारे, मपोशि वर्षा शिंदे, मपोशि शिल्पा फटाले यांनी मदत केली.

आपल्या मुलामुलींची काळजी घेणे हे पालकांचे प्रथम कर्तव्य आहे. जुजबी कारण पुढे करून मुला-मुलींना रागवू नये. रागावल्यास लगेच मुलामुलींचा राग शांत करून प्रेमाने त्यांच्याशी बोलावे. गर्दीच्या ठिकाणी किंवा यात्रेत मुले जास्तकरून हरवले जातात. अशावेळेस आपल्या पाल्ल्यांचा हात सोडू नये. एवढ्यावर मुलगा-मुलगी हरवल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. पोलीस सदैव आपल्या पाठीशी आहेत.

-विशाखा धुळे, सहायक पोलीस निरीक्षक, ‘भरोसा’ हिंगोली