शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
2
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
3
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
4
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
5
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
6
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
7
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
8
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
9
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
10
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
11
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
12
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
13
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
14
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
15
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
16
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
17
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
18
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
19
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
20
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

Drought In Marathwada : पोटापाण्यासाठी स्थलांतराशिवाय पर्याय नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 2:28 PM

दुष्काळवाडा : परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या शेतकऱ्यांजवळ आता गाव सोडणे एवढाच पर्याय शिल्लक आहे. 

- इलियास शेख, असोलवाडी, ता. कळमनुरी, जि. हिंगोली

कळमनुरी तालुक्यातील असोलवाडी हे गाव शंभर टक्के आदिवासीबहुल गाव. या गावात अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचीच संख्या जास्त. यावर्षी पाऊस कमी पडल्याने पिके वाळून गेली. त्यातही पावसाचा खंड अधिक. परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या शेतकऱ्यांजवळ आता गाव सोडणे एवढाच पर्याय शिल्लक आहे. 

या गावाची लोकसंख्या १४५०. कमी शेती असल्याने जवळपास सर्वच कुटुंब दसऱ्यानंतर कामाच्या शोधात स्थलांतर करतात. येथील शेतकरी ऊसतोड व हळदी काढण्यासाठी इतरत्र स्थलांतर करतात. वीट कारखाना तसेच मिस्त्रीच्या हाताखाली कामावर जातात. दोन महिन्यांपासून पाऊस नसल्याने डोळ्यासमोर पिके करपून जात आहेत. सोयाबीनच्या शेंगाही भरल्या नाहीत. वाळून गेल्या. खरबाड जमिनीवरची पिके तर गेल्यातच जमा आहेत. तुरीला अजून फुलोराच आला नाही. साहेब, शेतात जाऊ वाटत नाही. आता पोटापाण्याचे काय होणार, असा प्रश्न या शेतकऱ्यांनी उपस्थित केला. मागील तीन वर्र्षांपासून सततची नापिकी व दुष्काळी परिस्थितीने आम्ही कदरलो आहोत. खरीप पिकाला लावलेला खर्चही निघत नाही. वर्षभर कसे जगावे, उदरनिर्वाह कसा करावा, संसाराचा गाडा कसा हाकावा, अशी आपबिती सांगताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. 

चारा आणि पाण्याचा प्रश्न आहे यावर्षी परतीचा पाऊस पडला नाही. पावसाचा खंड झाल्यामुळे खरीप पिकांना याचा फटका बसला. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. पाण्याचा वापर काटकसरीने करावा. चारा पिकांचे नियोजन करावे, जनावरांचा चारा व त्यांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. कमी पाण्यात येणाऱ्या पिकांचे नियोजन करावे, जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याने एक शेततळे घ्यावे, संरक्षित पाणी असेल तरच रबीचे नियोजन करावे.  -  गोविंद कल्याणपाड, तालुका कृषी अधिकारी 

बळीराजा काय म्हणतो?- माझ्या घरी ५ एकर कोरडवाहू शेती आहे. अत्यल्प पडलेल्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाहीत. परिणामी तीनचा उतारा आला. शेतीत लावलेला पैसाही निघत नाही. वर्षभर काय खावे, कसा उदरनिर्वाह करावा, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. - माणिकराव असोले

- दोन महिन्यांपासून पाऊस नाही. कापसाची बोंडं फुटत नाहीत. सव्वाएकर शेतात संसाराचा गाडा कसा हाकावा? शासनाने भरीव आर्थिक मदत करावी, पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न उद्भवतो. आम्हाला मजुरी करूनच पोट भरावे लागते. - संतोष असोले 

- अडीच एकरमध्ये मला ८ क्ंिवटल सोयाबीनचा उतारा आला. पेरणीसाठी लावलेला खर्चही निघत नाही. मुलाबाळांचे शिक्षण कसे करावे? पाऊस कमी झाल्याने सर्वच पिकांना त्याचा फटका बसला. परतीच्या पावसानेही दगा दिला. दुसऱ्याच्या कामावर जाण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. - रामराव असोले 

- या गावचे सर्वच शेतकरी अत्यल्प भूधारक असून, डोळ्यासमोर पीक वाळून जात आहे. तुरीला तर अजून फुलोराही आला नाही. जमिनीत भेगा पडल्या आहेत. या हंगामात तूरही हातची गेली आहे. मला ५ एकर शेती असूनही त्यातून आतापर्यंत कधीच चांगले उत्पन्न झाले नाही. दरवर्षी काहीतरी वेगळेच कारण असते. - बाबूराव काळे  

- मोलमजुरी करूनच मी माझी एक एकर शेती करतो. त्यात यावर्षी काहीच हाती आले नाही. पेरणीचा खर्चही निघाला नाही. कामासाठी स्थलांतराशिवाय पर्याय नाही. मुलाबाळांचे शिक्षण जाते. त्यामुळे येथेच मजुरी करून पोट भरावे लागते. - अशोक काळे १४५० - लोकसंख्या

काही आकडेवारी : 

२७८ - घरे६६५ - मतदार६४४.५५  - हेक्टर गावाचे भौगोलिक क्षेत्र६०१.४७ - हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र ५९४ - हेक्टर पेरणी क्षेत्र ३१- हेक्टर खरीप ज्वारी१०५ - हेक्टर कापूस ५५ - हेक्टर तूर०९ - हेक्टर मूग०७ - हेक्टर उडीद९१६.६० - मि.मी. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान७२९.३४ - मि.मी. यावर्षी पडलेला पाऊस७९.५७% - पडलेला पाऊस 

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी