शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

Drought In Marathwada : दुष्काळ सांगताही येईना, सहनही होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 15:39 IST

भीषण परिस्थिती असतानाही शासन दरबारी मात्र वसमत तालुक्याची दुष्काळी परिस्थिती म्हणून नोंद नाही.

- चंद्रकांत देवणे ( वसमत,जि. हिंगोली) 

कधी नव्हे, ते यावर्षी वसमत तालुक्याला दुष्काळाचे चटके बसले आहेत. तीन वर्षापासून धरण भरत नसल्याने सिंचनाला पाणी नसल्याने शेतकऱ्यांची उशाला असलेली शिदोरी संपलेली आहे. आता या वर्षी तर पाऊसही नाही व धरणातही पाणी नसल्याने पेरलेले तेही उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आजवर पाणीदार तालुका सुपीक जमीन, सधन शेतकरी, सर्व आबादी आबाद असाच गोड गैरसमज तालुक्याबद्दल होता. शासन दरबारीही तीच नोंद आहे. प्रत्यक्षात मात्र दुरून डोंगर साजरा अशीच अवस्था आहे. शेतकऱ्यांची पुरती कोंडी झाली आहे. मोठेपणाचा शिक्का बसल्याने सांगताही येईना, अशीच अवस्था आहे. पेरले एवढेही उगवले नसल्याने मोठेपणाही करता येईना.

एवढी भीषण परिस्थिती असतानाही शासन दरबारी मात्र वसमत तालुक्याची दुष्काळी परिस्थिती म्हणून नोंद नाही. दुष्काळाने होरपळत असतानाही दुष्काळ नसल्याचे शासनाचे म्हणणे आहे. वसमत तालुक्यातील दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तालुक्यातील सेलू या गावास ‘लोकमत’ने भेट दिली असता पाणीदार वसमत तालुक्यातील या गावाला हिवाळ्यातच पिण्याच पाणी मिळत नसल्याचे भयावह चित्र समोर आले. टँकर मागणी केली तरी पाणीदार तालुका असल्याने टँकर मिळत नाही. सधन शेतकरी असलेल्या या गावातील ३०० पेक्षा जास्त ग्रामस्थ दुष्काळ जाणवत असल्याने कामासाठी पुणे, नाशिक सारख्या भागात कामाच्या शोधार्थ रवाना झाले आहेत. म्हणून गावात भयाण शांतता दिसत आहे.

गाव सोडून जाणाराने गरीब शेतमजूरच नाहीत तर शेतकरीही आहेत. कापूस, हळद, सोयाबीन हे मुख्य पीक असलेल्या सेलू गावातील पिक परिस्थिती पाहिली तर अजून कसा दुष्काळ पाहिजे? असा प्रश्न समोर येतो. कापूस, सोयाबीन, शंभरटक्के गेले आहे. परिसरातील २५० एकर हळदीवर वरवंटा फिरला आहे. गावात तर पाणी नाहीच परिसरातील दहा कि.मी. परिघातही शेतात मोटर चालत नाही. त्यामुळे जनावरांच्याही पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ३ बॅग कापूस पेरल्यानंतर अडीच क्विंटलचा उतारा आला आहे. त्यामुळे खर्च किती टक्के वसूला झाला याचेच गणित करण्याची वेळ आलेली आहे. सोयाबीन एकरी एक क्विंटलचा उतारा तर हळद कपरून गेल्याने सेलू भागातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.भयावह दुष्काळ भोगत असलेल्या सेलू गावातील दृष्काळी परिस्थिती पाहण्यासाठीही कोणीही नेता लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, शासकीय अधिकारी फिरकत नसल्याने दखलही कोणी घेत नसल्याची खंत आहे.

यावर्षी तर शेतात पेरणी करण्याचेच काम राहिले नाही. त्यामुळे काय करावे, हाच प्रश्न आहे. सर्वाधीक चिंता जनावरांची आहे. जनावरांना सध्याच चारा नसल्याने भकाळ्या दिसत आहेत. आता उन्हाळ्यात काय होईल, ही चिंता आहे. सेलू गावात आतापासूनच पिण्याचे पाणी नाही, शेतकऱ्यांच्या खिशात पैसा नाही, मजूरांच्या हाताला काम नाही, त्यामुळे आगामी काळ प्रचंड संकटाचा राहणार असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा स्पष्ट दिसत आहेत.

बळीराजा काय म्हणतो ?

- गावात पिण्यासाठी पाणी आजच नाही. शेतात काम नाही. शेतकरीच बेजार आहे तर शेतमजूराला कुठून काम मिळणार? वाढलेल्या वयामुळे गाव सोडूनही बाहेर जाता येत नाही. त्यामुळे येणारे वर्ष कठीण आहे. -प्रल्हाद नागोराव वाव्हळे (शेतमजूर)

- ३ बॅग कापूस पेरला होता दोन क्विंटलच निघाला, सोयाबीन किती झाले हे सांगण्याचीही लाज वाटत आहे. आता पुढच्यावर्षी तर पेरणी करण्याचीच सोय नाही. पेरणीवर केलेला खर्चही ५० टक्के निघाला नाही. त्यामुळे पुरते कंबरडे मोडले आहे. तरीही शासन सर्कलला दुष्काळी जाहीर करत नाही. - तुकाराम दत्तराव बाभळे (शेतकरी)

- जनावरांना चारा आजही उपलब्ध नाही पाणी मिळणे अवघड झाले आहे. काळ्या रानात जनावरे दिवसभर उभे करून रात्री पुन्हा गोठ्यात बांधावी लागत आहेत. मानसाचे कसेही धकेल. जनावरांचे काय करावे? - रंगनाथ सखाराम वसमतकर (पशुपालक)  

- सेलू गाव मराठवाड्यात सर्वाधिक दुष्काळी गाव आहे. पिण्याच्या पाण्याचा सोर्स नाही. दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत पाणी पुरते. यावर्षी तर सप्टेंबर पासूनच विहिरी बोअर कोरडे झाले आहेत. टँकरची मागणी केली. मात्र प्रशासन जुन्या नोंदी दाखवून टँकर देत नाही. स्वत:च्या टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठीही परिसरात पाणी नाही. शेतीचे वाळवंट झाले आहे. ४०० पेक्षा जास्त ग्रामस्थ गाव सोडून गले आहेत. गावाला मदत करण्यासाठी आजपर्यंत आमदार, खासदारही गावाकडे फिरकले नाही. त्यामुळे संकटाशी ग्रामस्थ देवाच्या भरवशावर लढत आहेत.  - चंद्रकांत देशमुख (सरपंच) 

काही आकडेवारी

भौगोलीक क्षेत्रफळ- ९० हजार हेक्टरलागवड योग्य क्षेत्र- ७५ हजार ५०० हेक्टरपावसाची सरासरी- ९९९ मि.मी.यावर्षीचा पाऊस  ६८० मि.मी. ६७.३० टक्केखरीपाची लागवडकापूस- १७.५०० हेक्टरसोयाबीन- ३२.४०० हेक्टरहळद- १६.६००तुर- ४ हजार हेक्टरमुग- उडीद- २५०० हेक्टर

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाWaterपाणीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी