शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Drought In Marathwada : दुष्काळ सांगताही येईना, सहनही होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 15:39 IST

भीषण परिस्थिती असतानाही शासन दरबारी मात्र वसमत तालुक्याची दुष्काळी परिस्थिती म्हणून नोंद नाही.

- चंद्रकांत देवणे ( वसमत,जि. हिंगोली) 

कधी नव्हे, ते यावर्षी वसमत तालुक्याला दुष्काळाचे चटके बसले आहेत. तीन वर्षापासून धरण भरत नसल्याने सिंचनाला पाणी नसल्याने शेतकऱ्यांची उशाला असलेली शिदोरी संपलेली आहे. आता या वर्षी तर पाऊसही नाही व धरणातही पाणी नसल्याने पेरलेले तेही उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आजवर पाणीदार तालुका सुपीक जमीन, सधन शेतकरी, सर्व आबादी आबाद असाच गोड गैरसमज तालुक्याबद्दल होता. शासन दरबारीही तीच नोंद आहे. प्रत्यक्षात मात्र दुरून डोंगर साजरा अशीच अवस्था आहे. शेतकऱ्यांची पुरती कोंडी झाली आहे. मोठेपणाचा शिक्का बसल्याने सांगताही येईना, अशीच अवस्था आहे. पेरले एवढेही उगवले नसल्याने मोठेपणाही करता येईना.

एवढी भीषण परिस्थिती असतानाही शासन दरबारी मात्र वसमत तालुक्याची दुष्काळी परिस्थिती म्हणून नोंद नाही. दुष्काळाने होरपळत असतानाही दुष्काळ नसल्याचे शासनाचे म्हणणे आहे. वसमत तालुक्यातील दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तालुक्यातील सेलू या गावास ‘लोकमत’ने भेट दिली असता पाणीदार वसमत तालुक्यातील या गावाला हिवाळ्यातच पिण्याच पाणी मिळत नसल्याचे भयावह चित्र समोर आले. टँकर मागणी केली तरी पाणीदार तालुका असल्याने टँकर मिळत नाही. सधन शेतकरी असलेल्या या गावातील ३०० पेक्षा जास्त ग्रामस्थ दुष्काळ जाणवत असल्याने कामासाठी पुणे, नाशिक सारख्या भागात कामाच्या शोधार्थ रवाना झाले आहेत. म्हणून गावात भयाण शांतता दिसत आहे.

गाव सोडून जाणाराने गरीब शेतमजूरच नाहीत तर शेतकरीही आहेत. कापूस, हळद, सोयाबीन हे मुख्य पीक असलेल्या सेलू गावातील पिक परिस्थिती पाहिली तर अजून कसा दुष्काळ पाहिजे? असा प्रश्न समोर येतो. कापूस, सोयाबीन, शंभरटक्के गेले आहे. परिसरातील २५० एकर हळदीवर वरवंटा फिरला आहे. गावात तर पाणी नाहीच परिसरातील दहा कि.मी. परिघातही शेतात मोटर चालत नाही. त्यामुळे जनावरांच्याही पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ३ बॅग कापूस पेरल्यानंतर अडीच क्विंटलचा उतारा आला आहे. त्यामुळे खर्च किती टक्के वसूला झाला याचेच गणित करण्याची वेळ आलेली आहे. सोयाबीन एकरी एक क्विंटलचा उतारा तर हळद कपरून गेल्याने सेलू भागातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.भयावह दुष्काळ भोगत असलेल्या सेलू गावातील दृष्काळी परिस्थिती पाहण्यासाठीही कोणीही नेता लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, शासकीय अधिकारी फिरकत नसल्याने दखलही कोणी घेत नसल्याची खंत आहे.

यावर्षी तर शेतात पेरणी करण्याचेच काम राहिले नाही. त्यामुळे काय करावे, हाच प्रश्न आहे. सर्वाधीक चिंता जनावरांची आहे. जनावरांना सध्याच चारा नसल्याने भकाळ्या दिसत आहेत. आता उन्हाळ्यात काय होईल, ही चिंता आहे. सेलू गावात आतापासूनच पिण्याचे पाणी नाही, शेतकऱ्यांच्या खिशात पैसा नाही, मजूरांच्या हाताला काम नाही, त्यामुळे आगामी काळ प्रचंड संकटाचा राहणार असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा स्पष्ट दिसत आहेत.

बळीराजा काय म्हणतो ?

- गावात पिण्यासाठी पाणी आजच नाही. शेतात काम नाही. शेतकरीच बेजार आहे तर शेतमजूराला कुठून काम मिळणार? वाढलेल्या वयामुळे गाव सोडूनही बाहेर जाता येत नाही. त्यामुळे येणारे वर्ष कठीण आहे. -प्रल्हाद नागोराव वाव्हळे (शेतमजूर)

- ३ बॅग कापूस पेरला होता दोन क्विंटलच निघाला, सोयाबीन किती झाले हे सांगण्याचीही लाज वाटत आहे. आता पुढच्यावर्षी तर पेरणी करण्याचीच सोय नाही. पेरणीवर केलेला खर्चही ५० टक्के निघाला नाही. त्यामुळे पुरते कंबरडे मोडले आहे. तरीही शासन सर्कलला दुष्काळी जाहीर करत नाही. - तुकाराम दत्तराव बाभळे (शेतकरी)

- जनावरांना चारा आजही उपलब्ध नाही पाणी मिळणे अवघड झाले आहे. काळ्या रानात जनावरे दिवसभर उभे करून रात्री पुन्हा गोठ्यात बांधावी लागत आहेत. मानसाचे कसेही धकेल. जनावरांचे काय करावे? - रंगनाथ सखाराम वसमतकर (पशुपालक)  

- सेलू गाव मराठवाड्यात सर्वाधिक दुष्काळी गाव आहे. पिण्याच्या पाण्याचा सोर्स नाही. दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत पाणी पुरते. यावर्षी तर सप्टेंबर पासूनच विहिरी बोअर कोरडे झाले आहेत. टँकरची मागणी केली. मात्र प्रशासन जुन्या नोंदी दाखवून टँकर देत नाही. स्वत:च्या टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठीही परिसरात पाणी नाही. शेतीचे वाळवंट झाले आहे. ४०० पेक्षा जास्त ग्रामस्थ गाव सोडून गले आहेत. गावाला मदत करण्यासाठी आजपर्यंत आमदार, खासदारही गावाकडे फिरकले नाही. त्यामुळे संकटाशी ग्रामस्थ देवाच्या भरवशावर लढत आहेत.  - चंद्रकांत देशमुख (सरपंच) 

काही आकडेवारी

भौगोलीक क्षेत्रफळ- ९० हजार हेक्टरलागवड योग्य क्षेत्र- ७५ हजार ५०० हेक्टरपावसाची सरासरी- ९९९ मि.मी.यावर्षीचा पाऊस  ६८० मि.मी. ६७.३० टक्केखरीपाची लागवडकापूस- १७.५०० हेक्टरसोयाबीन- ३२.४०० हेक्टरहळद- १६.६००तुर- ४ हजार हेक्टरमुग- उडीद- २५०० हेक्टर

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाWaterपाणीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी