शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
5
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
6
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
7
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
8
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
9
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
10
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
11
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
12
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
13
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
14
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
15
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
16
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
17
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
18
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
19
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या

Drought In Marathwada : दुष्काळाने तोंडाशी आलेला घास हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 12:23 IST

दुष्काळवाडा : खरीपाचा लागवड खर्चही निघाला नाही. बियाणे वाया जाईल या भीतीने रबीची पेरणीही करता येईना. असे दुष्काळाचे भीषण चित्र सेनगाव तालुक्यातील धोतरा या गावात पाहावयास मिळाले.

- राजकुमार देशमुख, धोतरा, ता. सेनगाव, जि. हिंगोली

परतीच्या पावसाने दगा दिला आणि शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. लागवड खर्चही निघाला नाही. बियाणे वाया जाईल या भीतीने रबीची पेरणीही करता येईना. असे दुष्काळाचे भीषण चित्र सेनगाव तालुक्यातील धोतरा या गावात पाहावयास मिळाले. सेनगावपासून ३० कि.मी. अंतरावर येलदरी धरणाच्या कुशीत असलेले धोतरा गाव दुष्काळाच्या छायेत अडकले आहे. कोरडवाहू, खडकाळ जमीन असलेल्या धोतरा या गावाचा उदरनिर्वाह शेतीवरच आहे. दरवर्षी उन्हाळ्यात निम्मे गाव कोयता घेऊन उसाच्या फडावर जाते. 

खरीप हंगामात प्रारंभी चांगला पाऊस झाला. त्यामुळे सोयाबीन, तूर, कपाशी ही पिके बहरली होती; परंतु परतीच्या पावसाने एकदमच खंड दिल्याने सोयाबीन पीक शेंगा लागण्यापूर्वीच वाळून गेले. काढणी खर्चही निघाला नसल्याने प्रमुख पीकच हातचे गेल्याने संपूर्ण गाव आर्थिक संकटात सापडले आहे. शेवटच्या टप्प्यात दमदार एकही पाऊस झाला नसल्याने तुरीचे पीक शेवटच्या घटका मोजत आहे. तूर, कपाशीचे पीक वाळून गेल्याने जनावरे चरण्यासाठी सोडून दिले आहेत.

पावसाअभावी खरीपच गेल्याने रबीचा विचारही शेतकऱ्यांनी केला नाही. दरवर्षी खरिपानंतर रबी हंगामात प्रामुख्याने हरभरा पिकाची पेरणी या भागात केली जाते; परंतु यावर्षी सर्वत्र ओसाड जमिनीचे चित्र पाहावयास मिळत आहे. गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आॅक्टोबरमध्येच गंभीर झाल्याने दुष्काळाची दाहकता आगामी काळात भयंकर संकटाचे संकेत देत आहे. दुष्काळग्रस्तांना जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मदतीचे शासनाने वेळीच नियोजन करण्याची गरज आहे.

-  ५६० : लोकसंख्या- १३२५ : हेक्टर भौगोलिक क्षेत्र - ३५७ हेक्टर लागवडीयोग्य जमीन - २२५ हेक्टरवर सोयाबीन - ४५ हेक्टरवर तूर- १६ हेक्टरवर कापूस- १० हेक्टरवर मूग

दुष्काळाची दाहकता तीव्र शासनाच्या संभाव्य दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश आहे. तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस पडला. त्याचा मोठा परिणाम खरीप पिकावर झाला आहे. परतीचा पाऊस न झाल्याने रबीची पेरणी २५ टक्के झाली. धोतरा परिसरात दुष्काळाची दाहकता तीव्र आहे. - गंगाधर बळवंतकर, प्रभारी तालुका कृषी अधिकारी  

बळीराजा काय म्हणतो? - सुरुवातीला सोयाबीनची पेरणी केली. उगवले नसल्याने दुबार पेरणी केली; परंतु पाऊस झाला नसल्याने सोयाबीन काढणीला पुरली नाही. धुईने कापूसही हातचा गेला आहे. पुढे कसे जगावे? असा प्रश्न आमच्यासमोर आहे. - नानाराव थिटे 

- सोयाबीनची दोन थैल्यांची पेरणी केली होती. पंचमीनंतर पाऊसच झाला नाही. सोयाबीन जागेवर वाळून गेले. केवळ चार कट्टे सोयाबीन झाले. - फकिरराव थिटे 

- तीन एकर जमीन आहे. काही जमिनीवर कापूस लावला. कापसाच्या प्रत्येक झाडाला दोन बोंडे आली आहेत. वाळलेल्या तुरीच्या पिकात जनावरांना सोडले आहे. - नामदेव वाकळे 

- तीन एकरात सोयाबीन पेरले होते; पण पावसाने दगा दिला आणि हाताशी आलेला घास गेला. पेरणीचा खर्चही निघाला नाही. तीन कट्टे चिपडा सोयाबीन झाले. तिला जनावरेही खात नाहीत. - कोंडीराम वाकळे 

- धोतरा गावात यापूर्वी अशी दुष्काळी परिस्थिती केव्हाच उद्भवली नाही. खरीप आणि रबी असे दोन्ही हंगाम वाया गेले. उदरनिर्वाहासाठी या भागात हाताला काम नाही. त्यामुळे संपूर्ण गाव रोजगाराच्या शोधात स्थलांतर करण्याच्या तयारीत आहे. - रवींद्र गडदे

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाWaterपाणीagricultureशेतीFarmerशेतकरी