शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

Drought In Marathwada : दुष्काळाने तोंडाशी आलेला घास हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 12:23 IST

दुष्काळवाडा : खरीपाचा लागवड खर्चही निघाला नाही. बियाणे वाया जाईल या भीतीने रबीची पेरणीही करता येईना. असे दुष्काळाचे भीषण चित्र सेनगाव तालुक्यातील धोतरा या गावात पाहावयास मिळाले.

- राजकुमार देशमुख, धोतरा, ता. सेनगाव, जि. हिंगोली

परतीच्या पावसाने दगा दिला आणि शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. लागवड खर्चही निघाला नाही. बियाणे वाया जाईल या भीतीने रबीची पेरणीही करता येईना. असे दुष्काळाचे भीषण चित्र सेनगाव तालुक्यातील धोतरा या गावात पाहावयास मिळाले. सेनगावपासून ३० कि.मी. अंतरावर येलदरी धरणाच्या कुशीत असलेले धोतरा गाव दुष्काळाच्या छायेत अडकले आहे. कोरडवाहू, खडकाळ जमीन असलेल्या धोतरा या गावाचा उदरनिर्वाह शेतीवरच आहे. दरवर्षी उन्हाळ्यात निम्मे गाव कोयता घेऊन उसाच्या फडावर जाते. 

खरीप हंगामात प्रारंभी चांगला पाऊस झाला. त्यामुळे सोयाबीन, तूर, कपाशी ही पिके बहरली होती; परंतु परतीच्या पावसाने एकदमच खंड दिल्याने सोयाबीन पीक शेंगा लागण्यापूर्वीच वाळून गेले. काढणी खर्चही निघाला नसल्याने प्रमुख पीकच हातचे गेल्याने संपूर्ण गाव आर्थिक संकटात सापडले आहे. शेवटच्या टप्प्यात दमदार एकही पाऊस झाला नसल्याने तुरीचे पीक शेवटच्या घटका मोजत आहे. तूर, कपाशीचे पीक वाळून गेल्याने जनावरे चरण्यासाठी सोडून दिले आहेत.

पावसाअभावी खरीपच गेल्याने रबीचा विचारही शेतकऱ्यांनी केला नाही. दरवर्षी खरिपानंतर रबी हंगामात प्रामुख्याने हरभरा पिकाची पेरणी या भागात केली जाते; परंतु यावर्षी सर्वत्र ओसाड जमिनीचे चित्र पाहावयास मिळत आहे. गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आॅक्टोबरमध्येच गंभीर झाल्याने दुष्काळाची दाहकता आगामी काळात भयंकर संकटाचे संकेत देत आहे. दुष्काळग्रस्तांना जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मदतीचे शासनाने वेळीच नियोजन करण्याची गरज आहे.

-  ५६० : लोकसंख्या- १३२५ : हेक्टर भौगोलिक क्षेत्र - ३५७ हेक्टर लागवडीयोग्य जमीन - २२५ हेक्टरवर सोयाबीन - ४५ हेक्टरवर तूर- १६ हेक्टरवर कापूस- १० हेक्टरवर मूग

दुष्काळाची दाहकता तीव्र शासनाच्या संभाव्य दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश आहे. तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस पडला. त्याचा मोठा परिणाम खरीप पिकावर झाला आहे. परतीचा पाऊस न झाल्याने रबीची पेरणी २५ टक्के झाली. धोतरा परिसरात दुष्काळाची दाहकता तीव्र आहे. - गंगाधर बळवंतकर, प्रभारी तालुका कृषी अधिकारी  

बळीराजा काय म्हणतो? - सुरुवातीला सोयाबीनची पेरणी केली. उगवले नसल्याने दुबार पेरणी केली; परंतु पाऊस झाला नसल्याने सोयाबीन काढणीला पुरली नाही. धुईने कापूसही हातचा गेला आहे. पुढे कसे जगावे? असा प्रश्न आमच्यासमोर आहे. - नानाराव थिटे 

- सोयाबीनची दोन थैल्यांची पेरणी केली होती. पंचमीनंतर पाऊसच झाला नाही. सोयाबीन जागेवर वाळून गेले. केवळ चार कट्टे सोयाबीन झाले. - फकिरराव थिटे 

- तीन एकर जमीन आहे. काही जमिनीवर कापूस लावला. कापसाच्या प्रत्येक झाडाला दोन बोंडे आली आहेत. वाळलेल्या तुरीच्या पिकात जनावरांना सोडले आहे. - नामदेव वाकळे 

- तीन एकरात सोयाबीन पेरले होते; पण पावसाने दगा दिला आणि हाताशी आलेला घास गेला. पेरणीचा खर्चही निघाला नाही. तीन कट्टे चिपडा सोयाबीन झाले. तिला जनावरेही खात नाहीत. - कोंडीराम वाकळे 

- धोतरा गावात यापूर्वी अशी दुष्काळी परिस्थिती केव्हाच उद्भवली नाही. खरीप आणि रबी असे दोन्ही हंगाम वाया गेले. उदरनिर्वाहासाठी या भागात हाताला काम नाही. त्यामुळे संपूर्ण गाव रोजगाराच्या शोधात स्थलांतर करण्याच्या तयारीत आहे. - रवींद्र गडदे

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाWaterपाणीagricultureशेतीFarmerशेतकरी