शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

हिंगोलीत विजयी व पराभूत उमेदवारांत फरक अवघा 0.१६ टक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 2:19 PM

फरकापेक्षा दहापट मते इतरांना

- विजय पाटील, हिंगोली

२0१४ च्या लोकसभा निवडणुकीत विजयी व पराभूत उमेदवारांतील मतांमध्ये फरक केवळ 0.१६ टक्क्याचा होता. सर्वात कमी फरकाने निवडून आलेली महाराष्ट्रातील ही जागा ठरली. त्यावेळी रिंगणात असलेल्या इतर २१ उमेदवारांनी ११.२३ टक्के मते मिळविली होती. 

मागच्या निवडणुकीत बसपाच्या उमेदवाराने मिळविलेली मते लक्षणीय होती. भारिप या निवडणुकीत ९५७७ मते मिळवत बहुजन मुक्तीच्याही मागे पडली. त्यामुळे काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेसला या धर्मनिरपेक्ष मतांमध्ये होणाऱ्या विभाजनाचा नेहमी बसणारा फटका मागच्या वेळी बसला नाही. नामसाधर्म्याच्या उमेदवारांचाही सातव यांच्यापेक्षा सुभाष वानखेडे यांनाच जास्त फटका बसला होता. वानखेडे नावाच्या दोघांनी बारा हजारांपेक्षा जास्त मते मिळविली होती. त्यामुळे एकेका मतासाठी झगडणाऱ्या प्रमुख उमेदवारांना मागच्या वेळी अपक्ष व इतर पक्षीय उमेदवारांनी चांगलेच अडचणीत आणले होते. 

सातव यांचा नवा चेहरा, राष्ट्रीय पातळीवर काम करताना विकासाची अपेक्षा, काँग्रेस नेतृत्वाशी असलेली जवळीकता अशा कारणांनी त्यांनी मतदारांवरही छाप पाडली होती. त्यामुळे मतविभाजन, इतर उमेदवारांनी घेतलेली ११ टक्के मते या सर्व बाबींवर मात करून त्यांनी विजयश्री खेचली होती.

44.46 टक्के मते सातवांना मागच्या लोकसभेला मोदी लाट असतानाही येथे काँग्रेसचे राजीव सातव यांनी काट्याची टक्कर दिली. काँग्रेसचे राजीव सातव यांना ४ लाख ६७ हजार ३९७ म्हणजे ४४.४६ टक्के तर शिवसेनेचे सुभाष वानखेडे यांना ४ लाख ६५ हजार ७६५ म्हणजे ४४.३१ टक्के मते मिळाली होती. दोघांतील फरक अवघा १६३२ मतांचा होता.

25000 मते बसपाला १ लाख १८ हजार ३१५ मते उर्वरित २१ उमेदवारांनी घेतली होती. नंतरची सर्वाधिक बसपाचे चुन्नीलाल जाधव यांना २५ हजार १४५ म्हणजे २.३९ टक्के मते मिळाली होती. त्यानंतर माकपचे डी.बी.नाईक यांना १४ हजार ९८६ मते मिळाली. हे प्रमाण १.४३ टक्का होते.  बहुजन मुक्ती पार्टीचे उत्तमराव राठोड यांनी ९७७0 मते म्हणजे 0.९३ टक्का मते घेतली होती. इतर १८ उमेदवारांनी ६८ हजार १0१ म्हणजे ६.४८ टक्के मते मिळविली होती.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकhingoli-pcहिंगोलीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेस