शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत; पीक नुकसान पंचनाम्यांना पावसाचा व्यत्यय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 7:06 PM

Rain hits farmers waiting for help : सततच्या पावसामुळे प्रशासकीय यंत्रणाही पेचात

ठळक मुद्देसप्टेंबरचे पंचनामे अद्याप अपूर्ण पीकविम्यासाठी पंचनाम्यांची प्रतीक्षा

हिंगोली :  चालूवर्षीच्या खरीप हंगामात जून ते ऑगस्ट या तीन महिन्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे ६ हजार ११९ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला; मात्र सप्टेंबरमध्ये १.५० लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असताना १४ आॅक्टोबरपर्यंतही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. अधूनमधून सुरूच असलेल्या पावसामुळे या प्रक्रियेत व्यत्यय निर्माण होत असल्यानेच ही स्थिती उद्भवल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही.डी. लोखंडे यांचे म्हणणे आहे. 

सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे खरीप हंगामातील उडीद, मूग, कापूस आणि विशेषत: सोयाबीन ही सर्वच पीके पूर्णत: पाण्याखाली सापडली होती. बहुतांश ठिकाणी सोयाबीनच्या हिरव्या शेंगांना चक्क कोंब फुटल्याचाही प्रकारही घडला. नुकसानीतून काहीअंशी बचावलेल्या सोयाबीनची शेतकऱ्यांनी काढणी केली; परंतु एकरी उत्पन्नात विक्रमी घट आली आहे. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे करून तसा अहवाल शासनाकडे पाठविणे आवश्यक असताना पंचनाम्यांची प्रक्रिया अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही. त्यामुळे मदत नेमकी कधी मिळणार, असा सवाल शेतकऱ्यांतून केला जात आहे.

सततच्या पावसामुळे प्रशासकीय यंत्रणाही पेचातयासंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही.डी. लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता, ज्या भागात नुकसानीचे पंचनामे करण्यात आले, त्याच भागात काही दिवसातच पुन्हा धो-धो पाऊस होऊन नुकसान झाल्याचा प्रकार घडल्याने दुसऱ्यांदा पंचनामे करावे लागत आहेत. यामुळे प्रशासकीय यंत्रणेसमोरही मोठा पेच निर्माण होत असल्याचे ते म्हणाले. याशिवाय ढगाळी वातावरण कायम असून अधूनमधून पाऊसही कोसळत असल्याने पंचनामा प्रक्रियेत व्यत्यय निर्माण होत आहे. या अडचणींमुळेच प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब लागत आहे. असे असले तरी लवकरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही लोखंडे यांनी दिली आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीRainपाऊसFarmerशेतकरी