शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

पिकांना मिळाली संजीवनी; हिंगोली जिल्ह्यात पाऊस परतल्याने शेतकरी सुखावला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 11:43 IST

Rain in Hingoli : गुरुवारी सकाळी आठ वाजेपूर्वीच्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 24 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देऔंढा व परिसरातील अनेक गावांत रात्री 11 ते 12  पासून पावसाला सुरुवात झाली आहे.

हिंगोली:  जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना काल रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने दिलासा दिला आहे. परतलेला हा पाऊस कोमेजून जाणाऱ्या पिकांना संजीवनी देणारा ठरला आहे.

सेनगावात काल रात्रीपासून पावसाने हजेरी लावली. आज सकाळी ही रिमझिम पाऊस सुरू होता. तालुक्यातील कहाकर पुसेगाव गोरेगाव आजेगाव या परिसरात मध्यम ते हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला. 

कळमनुरी तालुक्यातही पहाटे दोन वाजल्यापासून पाऊस सुरू झाला आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत हा पाऊस सुरू होता. तालुक्यातील दांडेगाव, नांदापूर, बाळापुर, डोंगरकडा  वाकोडी या परिसरातही चांगला पाऊस झाला. हिंगोलीत काल रात्री 11 वाजेपासून पावसाने सुरुवात केली होती, आज सकाळी हिंगोली शहरासह परिसरातील विविध भागात चांगला पाऊस झाल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे. औंढा व परिसरातील अनेक गावांत रात्री 11 ते 12  पासून पावसाला सुरुवात झाली आहे. सदर पाऊस हा रिमझिम स्वरूपाचा असल्याने याचा पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे अजूनही हा पाऊस सुरू आहे. येळेगाव सोळुंके जवळा बाजार परिसरातील पाऊस झाला. वसमत तालुक्यातील विविध भागातही पावसाने हजेरी लावली.

गुरुवारी सकाळी आठ वाजेपूर्वीच्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 24 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये तालुकानिहाय हिंगोली 28, कळमनुरी 28, वसमत 24, औंढा 12, सेनगाव 25 मिलिमीटर अशी नोंद झाली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोलीRainपाऊस