शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

'कपाशीची बोंदरी, सोयाबीनला कोंब'; अतिवृष्टीने शेतकरी हतबल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 5:38 PM

Rain Hits Hingoli District यंदाही शेतकरी नागवला असून शासन मदतीकडे आस लावून बसला आहे. 

ठळक मुद्देनैसर्गिक संकटाने शेतीचे मोठे नुकसान

हिंगोली : जून ते सप्टेंबर या ४ महिन्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिके नेस्तनाबूत झाली. निसर्गाचे हे दुष्टचक्र ऑक्टोबर महिन्यातही कायम असून दैनंदिन कोसळणाऱ्या परतीच्या पावसाने कपाशीची बोंडे काळवंडली तर सोयाबीनला कोंब फुटले आहेत. त्यामुळे यंदाही शेतकरी नागवला असून शासन मदतीकडे आस लावून बसला आहे. 

जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वाधिक अर्थात २ लाख ४७ हजार ५५१ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झालेला आहे. त्याखालोखाल ४१ हजार ८०८ हेक्टरवर हळद, ३८ हजार ९६५ हेक्टरवर कापूस, ८ हजार २६८ हेक्टरवर मूग, ६ हजार ६११ हेक्टरवर उडीद याप्रमाणे पेरणी झालेली आहे. दरम्यान, सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर सुरूवातीला पिके अंकुरलीच नाहीत. बोगस बियाण्यांमुळे घडलेल्या या प्रकारामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. पिकांची वाढ जोमाने होत असतानाच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि पुरपरिस्थितीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतशिवारांमध्ये पावसाचे पाणी साचून राहत असल्याने सोयाबीनच्या हिरव्या शेंगांना चक्क कोंब फुटल्याचाही प्रकार घडला. अती पावसामुळे कपाशीची बोंडे काळे पडायला लागली; तर उडीद आणि मूगाचे ९० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे आणि आता परतीच्या पावसाने ठाण मांडल्याने पिकांचे प्रचंड नुकसान होत असून शेतकरी हतबल झाले आहेत.  

भरपाई वाढवून द्यावीमाझ्याकडे १२ एकर शेती असून ४ एक सोयाबीन, ३ एकर कापूस, ५ एकर मूग, उडीद आणि ज्वारीचा पेरा केला आहे. पेरणी ६० ते ७० हजार रुपये खर्च आला. यापासून २ ते २.५० लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते; परंतु अतिवृष्टीमुळे सोयाबीन हातचे गेले आहे. आता नुकसान भरपाई निघणे शक्य नाही.  एकरी २५ हजार रुपयांची मदत करायला हवी. -प्रल्हाद मगर, घोळवा, ता. कळमनुरी 

सोयाबीनच्या सुड्याही भिजल्याअतिवृष्टीमुळे आधीच सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. उरल्यासुरल्याची कापणी करून सुडी रचून ठेवली आहे; मात्र परतीच्या पावसामुळे सुड्याही भिजत असून लागवड खर्चही वसूल होणार नसल्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे २ लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.- शिवाजी बाभूळकर, शेतकरी, घोडा, ता. कळमनुरी 

पीक पंचनामे सुरू आहेतहिंगोली जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या ४ महिन्यात अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे केले जात आहेत; मात्र परतीच्या पावसामुळे त्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. गरज नसताना कोसळत असलेल्या पावसामुळे नुकसानीच्या प्रमाणातही वाढ होण्याची दाट शक्यता आहे.- व्ही.डी. लोखंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊसFarmerशेतकरी