शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

‘जागतिक जल दिन’ चा प्रशासनाला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 23:34 IST

जागतिक जल दिनाचा प्रशासनाला विसर पडला की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. २२ मार्च रोजी जागतिक जल दिन आहे. जलदिनानिमित्त इतर जिल्ह्यात जलजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, तर कुठे साप्ताहिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. मात्र हिंगोली येथे जल जागृतीनिमित्त कुठल्याच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नाही.

दयाशील इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जागतिक जल दिनाचा प्रशासनाला विसर पडला की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. २२ मार्च रोजी जागतिक जल दिन आहे. जलदिनानिमित्त इतर जिल्ह्यात जलजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, तर कुठे साप्ताहिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. मात्र हिंगोली येथे जल जागृतीनिमित्त कुठल्याच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नाही.वातावरणातील बदलामुळे पर्जन्यमान कमी झाले आहे. परिणामी पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन आणि त्याच्या वापराबाबत जनजागृतीची आवश्यकता आहे. दिवसेंदिवस पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी शासनस्तरावरून विविध उपक्रम किंवा योजनाही राबविल्या जातात. या उपक्रमाच्या माध्यमातून पाण्याचे महत्त्व नागरिकांना सांगितले जाते. परंतु जबाबदार प्रशासनाला जल जागृतीचा विसर पडल्याचे चित्र आहे. हिंगोली येथील जि. प. च्या ्रग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फेही जल दिनानिमित्त विशेष असे काही कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले नाही. याबाबत संबधित अभियंता प्रशांत दासरवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी जल दिनानिमित्त अजून तरी काही जलजागृतीची मोहीम हाती घेण्यात आली नसून याबाबत वरिष्ठांकडून माहिती मिळाल्यास कळविली, जाईल असे सांगितले. तसेच जि. प. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण या विभागातर्फेही जलजागृतीसाठी विशेष काही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नाही. याबाबत तसे काही शासनाकडून सूचनांचे पत्रही आमच्या कार्यालयास प्राप्त झाले नाही, असे येथील कार्यरत काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.विशेष म्हणजे वन विभागामार्फतही जागतिक जल दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नसल्याचे दिसून आले. विभागीय वनाधिकारी केशव वाबळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, ते बैठकीत होते. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही. संबधित विभागातर्फेच जर जल साक्षरता संदर्भात जलजागृतीचे कार्यक्रम होणार नसतील तर इतर विभागांचे जागतिक जल दिनानिमित्त काय नियोजन असेल, असा प्रश्न जलप्रेमींतून उपस्थित केला जात आहे.जलजागृतीचा जागर४२२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून पाण्याचे महत्त्व नागरिकांना पटवून देणे, तसेच जल साक्षरतेसाठी पाण्याचे नियोजन करणे, पाण्याचा अपव्यय टाळून त्याचा काटकसरीने वापर करण्या संदर्भात विविध कार्यक्रम किंंवा उपक्रम राबविणे आवश्यक आहे. जिल्ह्यात जलजागृतीचा जागर व्हावा यासाठी शासनस्तरावरून विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे. परंतु इतर दिन जसे साजरे होतात, किंवा त्या दिवशी विविध कार्यक्रम घेण्याचे नियोजन केले जाते तसे मात्र जल दिनी होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जलजागृतीबाबत अधिक जनजागृतीची आवश्यकता आहे.

टॅग्स :WaterपाणीSocialसामाजिक