शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

‘जागतिक जल दिन’ चा प्रशासनाला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 23:34 IST

जागतिक जल दिनाचा प्रशासनाला विसर पडला की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. २२ मार्च रोजी जागतिक जल दिन आहे. जलदिनानिमित्त इतर जिल्ह्यात जलजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, तर कुठे साप्ताहिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. मात्र हिंगोली येथे जल जागृतीनिमित्त कुठल्याच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नाही.

दयाशील इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जागतिक जल दिनाचा प्रशासनाला विसर पडला की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. २२ मार्च रोजी जागतिक जल दिन आहे. जलदिनानिमित्त इतर जिल्ह्यात जलजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, तर कुठे साप्ताहिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. मात्र हिंगोली येथे जल जागृतीनिमित्त कुठल्याच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नाही.वातावरणातील बदलामुळे पर्जन्यमान कमी झाले आहे. परिणामी पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन आणि त्याच्या वापराबाबत जनजागृतीची आवश्यकता आहे. दिवसेंदिवस पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी शासनस्तरावरून विविध उपक्रम किंवा योजनाही राबविल्या जातात. या उपक्रमाच्या माध्यमातून पाण्याचे महत्त्व नागरिकांना सांगितले जाते. परंतु जबाबदार प्रशासनाला जल जागृतीचा विसर पडल्याचे चित्र आहे. हिंगोली येथील जि. प. च्या ्रग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फेही जल दिनानिमित्त विशेष असे काही कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले नाही. याबाबत संबधित अभियंता प्रशांत दासरवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी जल दिनानिमित्त अजून तरी काही जलजागृतीची मोहीम हाती घेण्यात आली नसून याबाबत वरिष्ठांकडून माहिती मिळाल्यास कळविली, जाईल असे सांगितले. तसेच जि. प. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण या विभागातर्फेही जलजागृतीसाठी विशेष काही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नाही. याबाबत तसे काही शासनाकडून सूचनांचे पत्रही आमच्या कार्यालयास प्राप्त झाले नाही, असे येथील कार्यरत काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.विशेष म्हणजे वन विभागामार्फतही जागतिक जल दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नसल्याचे दिसून आले. विभागीय वनाधिकारी केशव वाबळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, ते बैठकीत होते. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही. संबधित विभागातर्फेच जर जल साक्षरता संदर्भात जलजागृतीचे कार्यक्रम होणार नसतील तर इतर विभागांचे जागतिक जल दिनानिमित्त काय नियोजन असेल, असा प्रश्न जलप्रेमींतून उपस्थित केला जात आहे.जलजागृतीचा जागर४२२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून पाण्याचे महत्त्व नागरिकांना पटवून देणे, तसेच जल साक्षरतेसाठी पाण्याचे नियोजन करणे, पाण्याचा अपव्यय टाळून त्याचा काटकसरीने वापर करण्या संदर्भात विविध कार्यक्रम किंंवा उपक्रम राबविणे आवश्यक आहे. जिल्ह्यात जलजागृतीचा जागर व्हावा यासाठी शासनस्तरावरून विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे. परंतु इतर दिन जसे साजरे होतात, किंवा त्या दिवशी विविध कार्यक्रम घेण्याचे नियोजन केले जाते तसे मात्र जल दिनी होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जलजागृतीबाबत अधिक जनजागृतीची आवश्यकता आहे.

टॅग्स :WaterपाणीSocialसामाजिक