शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

हिंगोली जिल्ह्यातील १०९ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 00:49 IST

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील आठवीतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी एनएमएमएस परीक्षा घेतली जाते. यावर्षी जिल्ह्यातील एकूण १०९ विद्यार्थी एनएनएमएस शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र ठरले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील आठवीतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी एनएमएमएस परीक्षा घेतली जाते. यावर्षी जिल्ह्यातील एकूण १०९ विद्यार्थी एनएनएमएस शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र ठरले आहेत. केंद्रशासनामार्फत राष्टÑीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण नवी दिल्ली यांनी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी सदर परीक्षा सुरू केली आहे.आर्थिक दुर्बल घटकांतील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन शिकाऊ बुद्धीमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळावे, व त्याला विज्ञान विषयात आवड निर्माण व्हावी, यासाठी शासनाकडून दरवर्षी एनएमएमएस परीक्षा घेण्यात येते. परीक्षा उतीर्ण करून निवड झालेल विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य केले जाते. अखिल भारतीय पातळीवर एनएमएमएस शिष्यवृत्तीची संख्या १ लाख आहे. राज्यासाठी ११६८२ इतका कोटा निश्चित करून दिलेला आहे. या कोट्यानुसार व राज्याच्या संवर्गनिहाय आरणानुसार गुणवत्तेच्या आधारे जिल्हा व संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. सदर परीक्षेसाठी जिल्ह्यातील ७७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७६५ जणांनी परीक्षा दिली तर ८ विद्यार्थी अनुपस्थित होते. यात ३०० विद्यार्थी उतीर्ण झाले होते. त्यापैकी एकूण १०९ विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. पात्र विद्यार्थ्यांना यापुर्वी ६ हजार रूपये शिष्यवृत्ती दिली जात असे, आता रक्कमेत वाढ करण्यात आली असून सदर पात्र विद्यार्थ्यांना वार्षिक १२ हजार रूपये रक्कम दिली जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी आॅनलाईन नुतनीकरण करणे बंधनकारक आहे. नुतनीकरणाशिवाय शिष्यवृत्ती योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना दिला जाणार नाही. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत वार्षिक रु. १२०० हजार रूपये दिली जाते. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या लाभासाठी ९ वी व ११ वीमध्ये किमान ५५ टक्के गुण आवश्यक आहेत. तर एसटी, एससी, व्हिजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ओबीसी, एसबीसी आरक्षित विद्यार्थ्यांना किमान ५५ टक्के गुणांची आवश्यकता असते.आवश्यक कागदपत्रे...परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आई व वडिलाचे दोघांचे वार्षिक उत्पन्न १ लाख ५० हजारापेक्षा कमी असावे. तर नोकरीत असलेल्यांनी आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदार व तलाठ्याचा उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागतो. सातवीमध्ये सर्वसाधारण संवगार्साठी किमान ५५ टक्के तर आरक्षित संवगार्साठी किमान ५० टक्के गुण आवश्यक असतात. परीक्षेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यामध्ये जातीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, वर्ग ७ ची गुणपत्रिका व फोटो असे आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थीScholarshipशिष्यवृत्ती