शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

हिंगोली जिल्ह्यातील १०९ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 00:49 IST

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील आठवीतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी एनएमएमएस परीक्षा घेतली जाते. यावर्षी जिल्ह्यातील एकूण १०९ विद्यार्थी एनएनएमएस शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र ठरले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील आठवीतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी एनएमएमएस परीक्षा घेतली जाते. यावर्षी जिल्ह्यातील एकूण १०९ विद्यार्थी एनएनएमएस शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र ठरले आहेत. केंद्रशासनामार्फत राष्टÑीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण नवी दिल्ली यांनी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी सदर परीक्षा सुरू केली आहे.आर्थिक दुर्बल घटकांतील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन शिकाऊ बुद्धीमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळावे, व त्याला विज्ञान विषयात आवड निर्माण व्हावी, यासाठी शासनाकडून दरवर्षी एनएमएमएस परीक्षा घेण्यात येते. परीक्षा उतीर्ण करून निवड झालेल विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य केले जाते. अखिल भारतीय पातळीवर एनएमएमएस शिष्यवृत्तीची संख्या १ लाख आहे. राज्यासाठी ११६८२ इतका कोटा निश्चित करून दिलेला आहे. या कोट्यानुसार व राज्याच्या संवर्गनिहाय आरणानुसार गुणवत्तेच्या आधारे जिल्हा व संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. सदर परीक्षेसाठी जिल्ह्यातील ७७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७६५ जणांनी परीक्षा दिली तर ८ विद्यार्थी अनुपस्थित होते. यात ३०० विद्यार्थी उतीर्ण झाले होते. त्यापैकी एकूण १०९ विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. पात्र विद्यार्थ्यांना यापुर्वी ६ हजार रूपये शिष्यवृत्ती दिली जात असे, आता रक्कमेत वाढ करण्यात आली असून सदर पात्र विद्यार्थ्यांना वार्षिक १२ हजार रूपये रक्कम दिली जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी आॅनलाईन नुतनीकरण करणे बंधनकारक आहे. नुतनीकरणाशिवाय शिष्यवृत्ती योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना दिला जाणार नाही. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत वार्षिक रु. १२०० हजार रूपये दिली जाते. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या लाभासाठी ९ वी व ११ वीमध्ये किमान ५५ टक्के गुण आवश्यक आहेत. तर एसटी, एससी, व्हिजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ओबीसी, एसबीसी आरक्षित विद्यार्थ्यांना किमान ५५ टक्के गुणांची आवश्यकता असते.आवश्यक कागदपत्रे...परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आई व वडिलाचे दोघांचे वार्षिक उत्पन्न १ लाख ५० हजारापेक्षा कमी असावे. तर नोकरीत असलेल्यांनी आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदार व तलाठ्याचा उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागतो. सातवीमध्ये सर्वसाधारण संवगार्साठी किमान ५५ टक्के तर आरक्षित संवगार्साठी किमान ५० टक्के गुण आवश्यक असतात. परीक्षेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यामध्ये जातीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, वर्ग ७ ची गुणपत्रिका व फोटो असे आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थीScholarshipशिष्यवृत्ती