शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
4
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
5
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
6
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
7
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
8
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
9
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
10
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
11
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
12
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
13
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
15
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
16
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
17
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
18
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
19
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
20
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  

आळशी लोक आळशी असण्याचे 'हे' फायदे वाचतील तर नाचत सुटतील! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 10:02 IST

आपण नेहमीच ऐकत असतो की आळस फारच वाईट असतो. यात काही प्रमाणात सत्य असलं तरी १०० टक्के खरं नाही.

(Image Credit : mirror.co.uk)

आपण नेहमीच ऐकत असतो की आळस फारच वाईट असतो. यात काही प्रमाणात सत्य असलं तरी १०० टक्के खरं नाही. कारण सायन्सचा विचार कराल तर आळशी असणं काही प्रमाणात मेंदूसाठी आणि आरोग्यासाठी चांगलं असतं. काही रिसर्चही यावर करण्यात आले आहेत. चला जाणून घेऊ आळशी असण्याच्या काही फायद्यांबाबत. मात्र, आळशी असण्याचे काही फायदे आहेत म्हणून याचा अर्थ हा होत नाही की, तुम्ही आणखी जास्त आळशी व्हावं. कारण कोणत्याही गोष्टीची अति ही वाईटच असते, हा निसर्गाचा नियम आहे.

बर्नआउट स्थितीपासून दूर

(Image Credit : betanews.com)

बर्नआउट ही ती स्थिती असते ज्यात व्यक्ती मानसिक आणि शारीरिक रूपाने इतका थकलेला असतो की, त्यांच्याकडे आणखी काही करण्याची ताकदच राहत नाही. आळशी लोकांना अशा स्थितीचा सामना कमी करावा लागतो. कारण ते सतत रिलॅक्स होण्यासाठी पर्याय शोधत राहतात.

स्ट्रेस मॅनेजमेंट

(Image Credit : parentingchaos.com)

बर्नआउटसोबत आळस स्ट्रेस मॅनेज करण्यासही मदत करतो. मुळात जे लोक आळशी लोकांच्या कॅटेगरीत येतात ते गोष्टी जास्त आरामात करतात, याने त्यांना तणाव किंवा एग्जांयटीची समस्या होण्याचा धोका कमीच असतो.

झोप न येण्याची समस्या राहते दूर

(Image Credit : mnn.com)

आळशी लोक डोक्यांने रिलॅक्स असतात, ज्याने त्यांना झोपण्यात काहीच अडचण येत नाही. त्यांना झोप चांगली येत असल्याने झोप न येण्याची समस्या आणि त्यामुळे होणाऱ्या इतर समस्याही होत नाहीत. याने त्यांच्या शरीराचं इम्यून सिस्टीम चांगलं राहतं. 

पचनक्रिया सुधारते

(Image Credit : santacruzayurveda.com)

झोप न होणे आणि स्ट्रेस याने खाण्याची इच्छा मारण्यासोबतच पचनक्रियेवरही वाईट प्रभाव पडतो. तेच आळशी लोक प्रॉपर झोप घेतात आणि स्ट्रेसपासून दूर राहतात यामुळे ते या समस्येपासून दूर राहतात.

चांगलं कॉन्सन्ट्रेशन आणि क्रिएटिविटी

(Image Credit : useoftechnology.com)

रिसर्चनुसार, आराम न करता सतत कामात असणाऱ्या लोकांच्या तुलनेत आळशी लोक जास्त फोकस असतात. इतकंच नाही तर असे लोक जास्त क्रिएटिव्हही असतात. असं डोकं शांत, रिलॅक्स असल्याकारणाने होतं. त्यामुळे त्यांचा फोकस क्लिअर असतो आणि त्यांना नविन आयडिया सुद्धा येतात.

भावनिक संतुलन

(Image Credit : increasingselfworth.com)

झोप पूर्ण होणे, स्ट्रेसपासून दूर राहणे, शरीर रिलॅक्स्ड असणे याने व्यक्तीच्या भावनाही स्टेबल राहण्यास मदत मिळते. हे वेगवेगळ्या रिसर्चमधूनही समोर आलं आहे की, ज्या लोकांना स्ट्रेस किंवा झोप कमी येण्याची समस्या असते ते लोक भावनांशी संबंधित समस्यांनीही पीडित असतात.

चांगलं रिलेशनशिप

(Image Credit : bustle.com)

इमोशनली स्टेबल असल्याकारणाने आळशी लोक रिलेशनशिपमध्येही चांगले राहतात. असं यामुळे होतं कारण आळसामुळे हे लोक नकळत का होईना आपल्या पार्टनरला स्वत:साठी पुरेसा वेळ काढण्याची संधी देतात. सोबतच एकाच जागेवर बसून तासंतास बोलणंही आळशी लोकांसाठी मोठी बाब नाही. याने त्यांना पार्टनरच्या गोष्टी लक्ष देऊन ऐकणे आणि त्यांच्यासोबत चांगल्याप्रकारे इमोशनली कनेक्ट होण्यास मदत मिळते.

टॅग्स :Personalityव्यक्तिमत्वHealth Tipsहेल्थ टिप्सMental Health Tipsमानसिक आरोग्य