शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

वर्ल्ड मलेरिया डे : जाणून घ्या या आजाराची लक्षणे, कारणे आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 11:25 AM

'प्लाज्मोडियम' नावाच्या पॅरासाइटने होणारा आजार म्हणजे मलेरिया. हा आजार मादा 'एनाफिलीज' डास चावल्याने होतो.

'प्लाज्मोडियम' नावाच्या पॅरासाइटने होणारा आजार म्हणजे मलेरिया. हा आजार मादा 'एनाफिलीज' डास चावल्याने होतो, हे डास घाणेरड्या पाण्यात वाढतात. हे डास सामान्यपण रात्रीच्या वेळी अधिक चावतात. काही केसेसमध्ये मलेरिया आतल्या आत वाढत राहतो. अशात ताप जास्त न येता कमजोरी अधिक जाणवू लागते आणि एका स्टेजला रुग्णामध्ये हीमोग्लोबिनही कमी होतं. 

२५ एप्रिलला वर्ल्ड मलेरिया डे

२५ एप्रिलला जगभरात वर्ल्ड मलेरिया डे पाळला जातो. तसा तर मलेरिया सामान्यपणे पावसाळ्यात जुलै ते नोव्हेंबर दरम्यान अधिक पसरतो. मलेरियात प्रत्येक व्यक्तीचं शरीर कसं रिअॅक्ट करणार यांचं प्रमाण वेगवेगळं ठरतं. जर एखाद्या व्यक्तीचं इम्यून सिस्टीम मजबूत असेल तर कदाचित त्याला डास चावल्यावरही काही होणार नाही. पण दुसऱ्या व्यक्तीसाठी मलेरिया जीवघेणा ठरु शकतो. 

(Image Credit : Daily Star)

भारतातील स्थिती

एका रिपोर्टनुसार, भारतात दरवर्षी जवळपास १८ लाख लोकांना मलेरिया आजाराचा सामना करावा लागतो. संपूर्ण जगात मलेरियाने प्रभावित देशांपैकी ८० टक्के केसेस भारत, इथियोपिया, पाकिस्तान आणि इंडोनेशियामध्ये आढळतात. भारतात ओडिशा, छत्तीसगढ, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, त्रिपुरा आणि मेघालय राज्यांमध्ये मलेरियाची सर्वात जास्त प्रकरणे बघायला मिळतात. वर्ल्ड मलेरिया रिपोर्टनुसार, मलेरियाचे टाइप पी विवेक्समध्ये संपूर्ण जगात ८० टक्के केसेस जास्तीत जास्त तीन देशात बघायला मिळतात. त्यात भारताचाही समावेश आहे. 

(Image Credit : Duniamuslim.co)

मृत्यूच्या आकडेवारीत कमतरता

नवाभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकारच्या एका रिपोर्टनुसार, २०१४ मध्ये देशभरात मलेरियाच्या ११ लाख २ हजार २०५ केसेस समोर आल्या होत्या. २०१६ मध्ये ही संख्या १० लाख ५ हजार ९०५ इतकी झाली. पण २०१५ मध्ये ही संख्या वाढून ११ लाख ६९ हजार २६१ झाली होती. मलेरियाने मृत्यूच्या आकडेवारीवर नजर टाकली तर बघायला मिळतं की, २०१४ मध्ये मलेरियाने ५६२ मृत्यू झाले होते तर २०१५ मध्ये ३८४ आणि २०१६ मध्ये २४२ मृत्यू झाले होते. 

(Image Credit : Health Medical Treatments)

मलेरियाची लक्षणे

मलेरियामध्ये सामान्यपणे एक दिवसाआड ताप येतो आणि रुग्णाला तापासोबतच थंडीही वाजते. अजूनही काही लक्षणे बघायला मिळतात. 

- अचानक थंडी वाजून ताप येणे आणि नंतर गरमी वाटणे व ताप येणे.

- घामासोबत ताप कमी होणे आणि कमजोरी जाणवणे.

- दोन ते तीन दिवसांनी ताप येत राहणे.

कसा करावा बचाव?

- ब्लड टेस्ट करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतही औषध घेऊ नका.

- जर औषधांचा पूर्ण डोज घेतला नाही तर मलेरिया पुन्हा होण्याचा धोका असतो.

- रुग्णाला मच्छरदानीमध्ये ठेवा. कारण डास जर रुग्णाला चावून घरातील इतर कुणाला चावेल तर त्यांना हा आजार होऊ शकतो. रुग्णाला ताप आल्यावर ७ दिवसांपर्यंत शरीरात व्हायरस कायम राहतो. जर रुग्णाला व्हायरल आहे तर त्यांच्या वस्तूंचा वापर करु नका. 

(टिप : वरील सल्ले किंवा मुद्दे हे माहिती म्हणूण वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याकडे प्रोफेशनल सल्ले म्हणूण बघू नका. तुम्हाला काहीही समस्या असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य