शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

वर्ल्ड मलेरिया डे : जाणून घ्या या आजाराची लक्षणे, कारणे आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 11:30 IST

'प्लाज्मोडियम' नावाच्या पॅरासाइटने होणारा आजार म्हणजे मलेरिया. हा आजार मादा 'एनाफिलीज' डास चावल्याने होतो.

'प्लाज्मोडियम' नावाच्या पॅरासाइटने होणारा आजार म्हणजे मलेरिया. हा आजार मादा 'एनाफिलीज' डास चावल्याने होतो, हे डास घाणेरड्या पाण्यात वाढतात. हे डास सामान्यपण रात्रीच्या वेळी अधिक चावतात. काही केसेसमध्ये मलेरिया आतल्या आत वाढत राहतो. अशात ताप जास्त न येता कमजोरी अधिक जाणवू लागते आणि एका स्टेजला रुग्णामध्ये हीमोग्लोबिनही कमी होतं. 

२५ एप्रिलला वर्ल्ड मलेरिया डे

२५ एप्रिलला जगभरात वर्ल्ड मलेरिया डे पाळला जातो. तसा तर मलेरिया सामान्यपणे पावसाळ्यात जुलै ते नोव्हेंबर दरम्यान अधिक पसरतो. मलेरियात प्रत्येक व्यक्तीचं शरीर कसं रिअॅक्ट करणार यांचं प्रमाण वेगवेगळं ठरतं. जर एखाद्या व्यक्तीचं इम्यून सिस्टीम मजबूत असेल तर कदाचित त्याला डास चावल्यावरही काही होणार नाही. पण दुसऱ्या व्यक्तीसाठी मलेरिया जीवघेणा ठरु शकतो. 

(Image Credit : Daily Star)

भारतातील स्थिती

एका रिपोर्टनुसार, भारतात दरवर्षी जवळपास १८ लाख लोकांना मलेरिया आजाराचा सामना करावा लागतो. संपूर्ण जगात मलेरियाने प्रभावित देशांपैकी ८० टक्के केसेस भारत, इथियोपिया, पाकिस्तान आणि इंडोनेशियामध्ये आढळतात. भारतात ओडिशा, छत्तीसगढ, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, त्रिपुरा आणि मेघालय राज्यांमध्ये मलेरियाची सर्वात जास्त प्रकरणे बघायला मिळतात. वर्ल्ड मलेरिया रिपोर्टनुसार, मलेरियाचे टाइप पी विवेक्समध्ये संपूर्ण जगात ८० टक्के केसेस जास्तीत जास्त तीन देशात बघायला मिळतात. त्यात भारताचाही समावेश आहे. 

(Image Credit : Duniamuslim.co)

मृत्यूच्या आकडेवारीत कमतरता

नवाभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकारच्या एका रिपोर्टनुसार, २०१४ मध्ये देशभरात मलेरियाच्या ११ लाख २ हजार २०५ केसेस समोर आल्या होत्या. २०१६ मध्ये ही संख्या १० लाख ५ हजार ९०५ इतकी झाली. पण २०१५ मध्ये ही संख्या वाढून ११ लाख ६९ हजार २६१ झाली होती. मलेरियाने मृत्यूच्या आकडेवारीवर नजर टाकली तर बघायला मिळतं की, २०१४ मध्ये मलेरियाने ५६२ मृत्यू झाले होते तर २०१५ मध्ये ३८४ आणि २०१६ मध्ये २४२ मृत्यू झाले होते. 

(Image Credit : Health Medical Treatments)

मलेरियाची लक्षणे

मलेरियामध्ये सामान्यपणे एक दिवसाआड ताप येतो आणि रुग्णाला तापासोबतच थंडीही वाजते. अजूनही काही लक्षणे बघायला मिळतात. 

- अचानक थंडी वाजून ताप येणे आणि नंतर गरमी वाटणे व ताप येणे.

- घामासोबत ताप कमी होणे आणि कमजोरी जाणवणे.

- दोन ते तीन दिवसांनी ताप येत राहणे.

कसा करावा बचाव?

- ब्लड टेस्ट करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतही औषध घेऊ नका.

- जर औषधांचा पूर्ण डोज घेतला नाही तर मलेरिया पुन्हा होण्याचा धोका असतो.

- रुग्णाला मच्छरदानीमध्ये ठेवा. कारण डास जर रुग्णाला चावून घरातील इतर कुणाला चावेल तर त्यांना हा आजार होऊ शकतो. रुग्णाला ताप आल्यावर ७ दिवसांपर्यंत शरीरात व्हायरस कायम राहतो. जर रुग्णाला व्हायरल आहे तर त्यांच्या वस्तूंचा वापर करु नका. 

(टिप : वरील सल्ले किंवा मुद्दे हे माहिती म्हणूण वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याकडे प्रोफेशनल सल्ले म्हणूण बघू नका. तुम्हाला काहीही समस्या असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य