शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
2
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
3
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
4
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
5
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
6
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
7
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
8
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
9
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
10
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
11
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
12
60% हूनही अधिक घसरला ओला इलेक्ट्रिकचा शेअर, गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ!
13
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
14
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
15
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
16
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
17
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
18
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
19
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
20
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

मुलं आत्महत्या का करतात; जाणून घ्या, ताण आलाय हे कसे ओळखावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 08:16 IST

मुद्द्याची गोष्ट : लहान मुलांकडून अचानक घडणाऱ्या आत्महत्या नेहमीच मन विषण्ण करतात. वरकरणी साधी वाटणारी कारणे आत्महत्येला प्रवृत्त करतात तेव्हा जगण्यातील आशा, दिशा व हेतूच संपले असावेत की, जीवनाला घट्ट पकडून ठेवण्याइतके ताकदीचे ते कधी नव्हतेच याचा शोध घ्यावा लागतो. प्रेम, जिव्हाळा या मुलांच्या नात्यांमध्ये रुजला नाही का? जगण्याला होकार देणारा आशावाद या मनांमध्ये वाढलाच नाही का? 

डॉ. प्रदीप पाटकर, मनोविकास तज्ज्ञ, पनवेल

विस्तवासारख्या होत चाललेल्या वास्तवात, कल्पनाविश्वात अस्वस्थ येरझारांनी असह्य थकवा आलेल्या मुलांसमोर आत्महत्या हा एकमेव पर्याय म्हणून उभा राहतो आहे, ही बाब गंभीर आहे. दहशतवादी, अतिरेकी, युद्धपिपासू सत्ताधारी, जीवघेणी अणुबॉम्बसारखी,जंतू संसर्ग व रासायनिक परिणाम घडवणारी शस्त्रे, व्यसने, रोगराई या साऱ्यापेक्षा जास्त मनुष्यबळी गेल्या कित्येक शतकात आत्महत्यांनी घेतले आहेत. किशोरावस्थेतील चार पैकी एक मूल निराशाग्रस्त असू शकते, हा मानसशास्त्राचा इशारा आपण लक्षात घेऊ. घडून गेलेल्या एका आत्महत्येवेळी, जवळजवळ २७ आत्महत्येचे अयशस्वी प्रयत्न सामोरे आलेले नसतात, असेही एक रिपोर्ट सांगतो. एका आत्महत्येने सोबतीच्या किमान ५ माणसांचा मनस्ताप वाढतो,असे सांगितले जाते. 

आजवरच्या अभ्यासात आत्महत्येस कारणीभूत ठरणारी अनेक कारणे सामोरी आली आहेत. जीवनातील घटनांची वाढत चाललेली अफाट गती,असह्य ताणतणाव, व्यवहार वादात सुकत चाललेली नातीगोती, ताब्यात न राहिलेले आवेग, आसपासचे निष्ठूर जग, स्वार्थी बाजार वादात हतबल, हरवत चाललेला विवेक... निराशेत दिलासा देणारी अमूल्य नीती तत्वे कमकुवत होत चालली आहेत. आता वेळ आलेली आहे तातडीने आपले आपल्या आणि इतरही मुलांशी असलेले नाते बारकाईने अभ्यासून ते दृढ करण्याची, मनोरंजनासोबत मनोविकास साधणारा निखळ, नि:स्पृह स्नेहसेतू बांधण्याची !  

अचानक येणाऱ्या स्वनाशाच्या आवेगापोटी घडणारी आत्महत्या ही नीट ठरवून केल्या जाणाऱ्या आत्महत्येपेक्षा थोडी वेगळी,कधी कमी तीव्र असू शकते. त्यात मरण्याच्या इच्छेपेक्षा तीव्र वैताग,हतबलता जास्त असते. नीट ठरवून केल्या जाणाऱ्या आत्महत्येमध्ये डिप्रेशन सारख्या आजारांची भूमिका महत्त्वाची ठरते. तेथे अगोदर मदत अप्रत्यक्षपणे मागितलीही असेल, पण ती कुणीच समजून घेतली नसल्याचा विषाद जास्त असेल. मनात वैफल्य दाटले असेल तर इतरांचा प्रतिसाद समजणेही कठीण जाते.  

परीक्षेच्या वेळी काय होतं? छातीत धडधड वाढते, पोटात गोळा येतो, तोंडाला कोरड पडते, डोळ्यासमोर अंधारी येते, हॉलमधून पळावेसे वाटते. आधी वाचलेले आठवेनासे होते. बऱ्याचदा पेपर मिळण्याआधीच अशी स्थिती सुरू होते. कारण पेपर कसा असेल हे अनिश्चित असतं, अनपेक्षित असतं. ह्याला आपण भीती किंवा टेन्शन म्हणतो. म्हणजेच थ्रिल किवा भीती, टेन्शन देऊ शकेल अशा कोणत्याही अपेक्षित,अनपेक्षित घटनेला शरीराची ही प्रतिक्रिया सारखीच असते. अनपेक्षित घटनेला सामोरे जायला शरीर सज्ज होते एवढाच त्याचा अर्थ घ्यावा हे उत्तम!!

ताण आलाय हे कसे ओळखावे?अभ्यासात लक्ष न लागणे, अभ्यास टाळणे, पोटात गोळा उठणे, परीक्षेत किवा वर्गात प्रश्न विचारल्यास डोळ्यापुढे अंधारी येणे, डोके दुखणे, खूप घाम येणे, धडधड होणे, घाबरेघुबरे होणे, घरात चिडचिड करणे, शाळा चुकवावी वाटणे, भूक न लागणे, सतत परीक्षेची,मार्कांची भीती वाटणे, ही ताणाची काही लक्षणे आहेत. 

ताण म्हणजे काय? सगळ्यांनाच काही प्रमाणात ताण येतो, तो आवश्यकच असतो, नाहीतर आपण कदाचित काहीच प्रयत्न करणार नाही. ताण म्हणजे अनपेक्षित गोष्टीला सामोरे जाण्याची शरीराची तयारी. ते जणू काही इंजिन स्टार्ट करतं.