शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

संकल्प का हुकतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 12:19 IST

भूतकाळातील अपयश, चुका किंवा अपूर्ण उद्दिष्टे मागे टाकून नववर्षात पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची संधी म्हणून अनेक लोक एका वर्षापासून दुसऱ्या वर्षीच्या संक्रमणाकडे पाहतात.

डॉ. शुभांगी पारकर, ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ 

वर्षाचा शेवट ही अशी वेळ आहे, जेव्हा लोक एकत्रितपणे चांगल्या भविष्यासाठी आत्मपरिवर्तन आणि ध्येय गाठण्यासाठी लागणाऱ्या क्रियाकलापांमध्ये व्यस्त असतात. लोक वर्ष संपताना त्यांची अपुरी स्वप्ने, आव्हाने आणि सुधारणेच्या क्षेत्रांवर विचार करतात. नवीन वर्षाची सुरुवात ही आयुष्याची नवीन सुरुवात करण्याची प्रतीकात्मक संधी म्हणून पाहिली जाते. 

भूतकाळातील अपयश, चुका किंवा अपूर्ण उद्दिष्टे मागे टाकून नववर्षात पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची संधी म्हणून अनेक लोक एका वर्षापासून दुसऱ्या वर्षीच्या संक्रमणाकडे पाहतात. नवीन वर्ष हे ध्येय निश्चित करण्याच्या प्रक्रियेतील नैसर्गिक मैलाचा दगड आहे. लोक त्यात सवयीने गुंतत जातात. हा काळ नावीन्याचा असतो. 

वार्षिक संकल्प करताना लोक उदात्त ध्येये निवडतात. नवीन वर्ष सुरू झाल्यापासून काही महिन्यांत दहा किलो वजन कमी करण्याचा, पंधरा-वीस सिगारेट ओढायची सवय अचानक सोडून द्यावयाचा, आदर्श जीवनसाथी शोधण्याचा किंवा स्वप्नातील नोकरी मिळवण्याची शपथ घेऊ शकतात. यासारख्या मोठ्या संकल्पनेचे शिवधनुष्य पेलताना दोन विशिष्ट प्रकारची आव्हाने समोर उभी राहतात, ती या उद्दिष्टांची तोडफोड करतात. पहिले आव्हान, मोठी झेप घेण्यासाठी तितकीच ठाम इच्छाशक्ती लागते. म्हणून, ते टिकवणे कठीण आहे. दुसरे आव्हान, पण एकदम मोठमोठी पावले उचलली की, अपयशाची भीती आणि नाकारले जाण्याची भीती लोकांना पराभूत करते.

वजन कमी करणे असो, कर्जातून बाहेर पडणे असो, एखादा आवडता छंद जोपासणे असो किंवा इतर काही असो, अनेकांसाठी नवीन वर्षाचे संकल्प करणे, हा उत्सवाचा व आनंदाचा भाग असतो. प्रत्यक्षात नवीन वर्षाचे ९० टक्क्यांपेक्षा जास्त संकल्प काही महिन्यांतच हुकतात. बहुसंख्य लोक सुरुवातीच्या एक ते सहा आठवड्यांच्या आतच संकल्प सोडून देतात आणि यापैकी बऱ्याच संकल्पांची वर्षानुवर्षे पुनरावृत्ती होते. आपण ते का पूर्ण करू शकत नाही, याची काही कारणे जाणून घेऊया. 

अतिमहत्त्वाकांक्षी संकल्प किंवा अवास्तव ध्येये ठेवल्याने व्यक्तीस लवकर निराशा येऊ शकते. बरेच लोक संकल्प कसे साध्य करता येतील यासाठी ठोस योजना न बनवता हवेत ठराव करतात. बरेच संकल्प वैयक्तिक प्रेरणेऐवजी बाह्य दबाव किंवा सामाजिक अपेक्षांद्वारे चालविलेल्या ठरावांमध्ये मोडतात. उदाहरणार्थ, वजन कमी करण्याची फॅशन व योग करायचा ट्रेंड. इतरांनी केले म्हणून आपण ठरवल्यास दीर्घकालीन यशासाठी आवश्यक असलेल्या अंतर्गत ड्राइव्हचा अभाव याठिकाणी असू शकतो. 

तोच हाेईल विजयी... -काहींना तत्काळ परिणाम हवे असतात. प्रगती वेगात न झाल्यास ते निराश होतात. दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संयम आणि चिकाटी अत्यंत महत्त्वाची आहे. नकारात्मक मानसिकता किंवा आत्मविश्वासाचा अभाव आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या प्रयत्नांना कमकुवत करू शकतो. 

संकल्प लहान भागात विभाजित करा. यामुळे प्रगती अधिक साध्य होते. संकल्प म्हणजे काय, तर तुम्ही 'काय करावे' यापेक्षा तुम्हाला काय करायला आवडेल?  

स्वतःसाठी खूप हटवादी किंवा खूप चंचल होऊ नका आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आयुष्यातील बदल आणि परिवर्तनाच्या प्रक्रियेचा आनंद घ्या. लक्षात ठेवा, विजेते आणि पराभूत यांचे ध्येय समान आहे; पण जो त्यावर निष्ठा ठेवतो तोच विजयी होतो.

टॅग्स :Healthआरोग्यNew Yearनववर्ष