शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

संकल्प का हुकतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 12:19 IST

भूतकाळातील अपयश, चुका किंवा अपूर्ण उद्दिष्टे मागे टाकून नववर्षात पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची संधी म्हणून अनेक लोक एका वर्षापासून दुसऱ्या वर्षीच्या संक्रमणाकडे पाहतात.

डॉ. शुभांगी पारकर, ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ 

वर्षाचा शेवट ही अशी वेळ आहे, जेव्हा लोक एकत्रितपणे चांगल्या भविष्यासाठी आत्मपरिवर्तन आणि ध्येय गाठण्यासाठी लागणाऱ्या क्रियाकलापांमध्ये व्यस्त असतात. लोक वर्ष संपताना त्यांची अपुरी स्वप्ने, आव्हाने आणि सुधारणेच्या क्षेत्रांवर विचार करतात. नवीन वर्षाची सुरुवात ही आयुष्याची नवीन सुरुवात करण्याची प्रतीकात्मक संधी म्हणून पाहिली जाते. 

भूतकाळातील अपयश, चुका किंवा अपूर्ण उद्दिष्टे मागे टाकून नववर्षात पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची संधी म्हणून अनेक लोक एका वर्षापासून दुसऱ्या वर्षीच्या संक्रमणाकडे पाहतात. नवीन वर्ष हे ध्येय निश्चित करण्याच्या प्रक्रियेतील नैसर्गिक मैलाचा दगड आहे. लोक त्यात सवयीने गुंतत जातात. हा काळ नावीन्याचा असतो. 

वार्षिक संकल्प करताना लोक उदात्त ध्येये निवडतात. नवीन वर्ष सुरू झाल्यापासून काही महिन्यांत दहा किलो वजन कमी करण्याचा, पंधरा-वीस सिगारेट ओढायची सवय अचानक सोडून द्यावयाचा, आदर्श जीवनसाथी शोधण्याचा किंवा स्वप्नातील नोकरी मिळवण्याची शपथ घेऊ शकतात. यासारख्या मोठ्या संकल्पनेचे शिवधनुष्य पेलताना दोन विशिष्ट प्रकारची आव्हाने समोर उभी राहतात, ती या उद्दिष्टांची तोडफोड करतात. पहिले आव्हान, मोठी झेप घेण्यासाठी तितकीच ठाम इच्छाशक्ती लागते. म्हणून, ते टिकवणे कठीण आहे. दुसरे आव्हान, पण एकदम मोठमोठी पावले उचलली की, अपयशाची भीती आणि नाकारले जाण्याची भीती लोकांना पराभूत करते.

वजन कमी करणे असो, कर्जातून बाहेर पडणे असो, एखादा आवडता छंद जोपासणे असो किंवा इतर काही असो, अनेकांसाठी नवीन वर्षाचे संकल्प करणे, हा उत्सवाचा व आनंदाचा भाग असतो. प्रत्यक्षात नवीन वर्षाचे ९० टक्क्यांपेक्षा जास्त संकल्प काही महिन्यांतच हुकतात. बहुसंख्य लोक सुरुवातीच्या एक ते सहा आठवड्यांच्या आतच संकल्प सोडून देतात आणि यापैकी बऱ्याच संकल्पांची वर्षानुवर्षे पुनरावृत्ती होते. आपण ते का पूर्ण करू शकत नाही, याची काही कारणे जाणून घेऊया. 

अतिमहत्त्वाकांक्षी संकल्प किंवा अवास्तव ध्येये ठेवल्याने व्यक्तीस लवकर निराशा येऊ शकते. बरेच लोक संकल्प कसे साध्य करता येतील यासाठी ठोस योजना न बनवता हवेत ठराव करतात. बरेच संकल्प वैयक्तिक प्रेरणेऐवजी बाह्य दबाव किंवा सामाजिक अपेक्षांद्वारे चालविलेल्या ठरावांमध्ये मोडतात. उदाहरणार्थ, वजन कमी करण्याची फॅशन व योग करायचा ट्रेंड. इतरांनी केले म्हणून आपण ठरवल्यास दीर्घकालीन यशासाठी आवश्यक असलेल्या अंतर्गत ड्राइव्हचा अभाव याठिकाणी असू शकतो. 

तोच हाेईल विजयी... -काहींना तत्काळ परिणाम हवे असतात. प्रगती वेगात न झाल्यास ते निराश होतात. दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संयम आणि चिकाटी अत्यंत महत्त्वाची आहे. नकारात्मक मानसिकता किंवा आत्मविश्वासाचा अभाव आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या प्रयत्नांना कमकुवत करू शकतो. 

संकल्प लहान भागात विभाजित करा. यामुळे प्रगती अधिक साध्य होते. संकल्प म्हणजे काय, तर तुम्ही 'काय करावे' यापेक्षा तुम्हाला काय करायला आवडेल?  

स्वतःसाठी खूप हटवादी किंवा खूप चंचल होऊ नका आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आयुष्यातील बदल आणि परिवर्तनाच्या प्रक्रियेचा आनंद घ्या. लक्षात ठेवा, विजेते आणि पराभूत यांचे ध्येय समान आहे; पण जो त्यावर निष्ठा ठेवतो तोच विजयी होतो.

टॅग्स :Healthआरोग्यNew Yearनववर्ष